शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
9
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
10
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
11
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
12
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
13
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
14
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
15
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
16
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
17
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
18
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
19
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
20
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?

‘ओजस्विनी’च्या विद्यार्थ्यांनी विनामोबदला पाच दिवसात रंगविल्या ५०० भिंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 11:29 IST

स्वच्छतेचा दिला संदेश

ठळक मुद्दे मनपाकडून घेतले नाही कुठलेही शुल्क

जळगाव : राज्य व केंद्र शासनाकडून ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ हे अभियान राबविण्यात आले असून, याबाबत जळगाव महापालिकडून देखील शहराचे मानांकन वाढावे यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. या अभियानंर्तगत शहरातील प्रमुख रस्त्यांवरील भिंतीवर स्वच्छतेचा संदेश देत भिंती रंगविल्या जात असून, ओजस्विनी कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाच दिवसात शहरातील ५०० हून अधिक भिंती रंगविल्या आहेत.९ जानेवारपासून ही मोहीम हाती घेण्यात आली. रविवारी या मोहीमेचा शेवटचा दिवस होता. रविवारपर्यंत जी.एस.ग्राउंण्ड, मनपा परिसर, टॉवर चौक, शिवाजी नगर उड्डाणपूल काव्यरत्नावली चौक, मू.जे.महाविद्यालय परिसर, खोटेनगर, दादावाडी, गणेश कॉलनी, शिवाजी नगर, आकाशवाणी चौक, महाबळ परिसरासह शहरातील विविध भागातील ५०० हून अधिक भिंतीवर स्वच्छतेबाबत जनजागृती करणारे स्लोगनचे आकर्षक चित्र रेखाटण्यात आले आहे.रंगविण्यात आलेल्या भिंतीकडे शहरातील प्रत्येक नागरिक आकर्षित होत असून, या भिंतीवर स्वच्छतेचे संदेश महात्मा गांधी यांच्यासह आई-मुले व काही जनजागृतीवरील संदेशाच्या माध्यमातून देण्यात येत असल्याने रंगविण्यात आलेल्या भिंती नागरिकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहेत.मनपाकडून देण्यात येईल विशेष प्रमाणपत्रविद्यार्थ्यांनी केलेल्या कामाबाबत मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी देखील विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी अनेक ठिकाणी स्वत: विद्यार्थ्यांची भेट घेत. चित्रांची माहिती घेतली. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना मनपाकडून विशेष प्रमाणपत्र देण्याचा निर्णय मनपाने घेतला.‘स्वच्छ सर्वेक्षण २०१९’ हे अभियान राबविण्याची जबाबदारी केवळ मनपाची नसून ती प्रत्येक जळगावकरांची आहे. त्यामुळे कोणतेही शुल्क न घेता आयुक्तांनी केलेल्या आवाहनाला साथ देवून या मोहीमेत सहभाग घेतला असल्याचे मत ओजस्विनी विभागाचे प्राचार्य अविनाश काटे यांनी व्यक्त केले. तसेच या मोहीमेत ओजस्विनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह डॉ.जी.डी.बेंडाळे महाविद्यालयाच्या कला विभागाच्या विद्यार्थिनींनी देखील आपला सहभाग घेतला.सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत केले कामबुधवारपासून घेण्यात आलेल्या या मोहिमेत ओजस्विनीच्या ७० विद्यार्थ्यांनी सलग पाच दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत भिंती रंगविण्यातच व्यस्त राहिलेले पहायला मिळाले. मनपाकडून या विद्यार्थ्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली तर रंग मनपाकडूनच पुरविण्यात आला.