शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा... एक लाख नागरिकांना पुरेल इतके पाणी जाते दररोज वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरातील सुमारे एक लाख नागरिकांना पुरेल इतके पाणी दररोज गळतीमुळे वाया जात आहे. एकीकडे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - शहरातील सुमारे एक लाख नागरिकांना पुरेल इतके पाणी दररोज गळतीमुळे वाया जात आहे. एकीकडे पाणी दरवाढीबाबत शासनाचा विचार सुरू असताना दुसरीकडे दररोज वाया जाणाऱ्या हजारो लिटर पाण्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. मनपाकडून दरवर्षी ४० लाख रुपयांचा खर्च शहरातील पाइपलाइनच्या गळत्यांवर होत आहे. यावर कायमचा तोडगा काढण्यासाठीही मनपाकडून कोणत्याही उपाययोजना होत नाहीत. अमृत योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून, अमृतचे काम पूर्ण झाल्यानंतरच वाया जाणाऱ्या पाण्याची काही प्रमाणात बचत होण्याची शक्यता आहे.

शहरातील वितरण व्यवस्था ४० वर्षांपेक्षा जुनी आहे. मनपाच्या आकडेवारीनुसार शहरात ४०० हून अधिक ठिकाणी लहान-मोठ्या गळत्या आहेत. त्यामुळे पाणीपुरवठ्यादरम्यान हजारो लिटर पाणी वाया जाते. वितरणादरम्यान सुमारे ४७ टक्के पाणी वाया जाते. याबाबतचा अहवाल सुजल निर्मल अभियानांतर्गत नेमलेल्या नागपूरच्या कंपनीने सादर केला होता. शहरातील अनेक गळत्या या काही वर्षांपासून जशाच्या तशा आहेत. त्या गळत्यांची किमान दुरुस्ती देखील मनपाकडून होत नाही.

शहरातील पाणीपुरवठ्याचे वार्षिक बजेट

१० कोटी

पाणीपुरवठ्याचे वर्षाचे बिल

७ कोटी

पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी

३५०

लिकेजमुळे २० टक्के पाणी वाया

शहराच्या लोकसंख्येनुसार दरडोई १३० लिटर ७० मिलियन लिटर्स पाण्याची आवश्यकता जळगावकरांना लागते. शहराला वाघूर धरणावरून पाणीपुरवठा केला जातो. या ठिकाणाहून ९६ एमएलडी पाणी दररोज घेतले जाते. शुद्धीकरण करून ७६ एमएलडी पाणी गिरणा टाकीत सोडले जाते. शुद्धीकरणादरम्यान २० एमएलडी पाणी वाया जाते तसेच गळत्यांमुळेही दररोज २० टक्के पाणी वाया जात आहे.

दोन वर्षांपासूनची गळती

माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयासमोरील रस्त्यालगत गेल्या दोन वर्षांपासून गळती कायम असून, मनपाकडून अनेकवेळा दुरुस्ती करून देखील ही गळती दुरुस्त होऊ शकलेली नाही.

वारंवार दुरुस्ती करूनही गळती कायम

छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल परिसरातील गळती देखील एक-दीड वर्षांपासून कायम आहे. याठिकाणी दर महिन्याला मनपाकडून दुरुस्ती करण्यात येत असते. मात्र, दुरुस्ती केल्यानंतर काही दिवसांतच पुन्हा याठिकाणी पाणी गळती सुरू असते. याबाबत मनपाने कायमची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.