शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
6
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
7
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
8
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
9
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
10
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
11
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
13
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
14
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
15
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
16
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
17
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
18
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
19
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
20
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”

अरे देवा... एक लाख नागरिकांना पुरेल इतके पाणी जाते दररोज वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरातील सुमारे एक लाख नागरिकांना पुरेल इतके पाणी दररोज गळतीमुळे वाया जात आहे. एकीकडे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - शहरातील सुमारे एक लाख नागरिकांना पुरेल इतके पाणी दररोज गळतीमुळे वाया जात आहे. एकीकडे पाणी दरवाढीबाबत शासनाचा विचार सुरू असताना दुसरीकडे दररोज वाया जाणाऱ्या हजारो लिटर पाण्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. मनपाकडून दरवर्षी ४० लाख रुपयांचा खर्च शहरातील पाइपलाइनच्या गळत्यांवर होत आहे. यावर कायमचा तोडगा काढण्यासाठीही मनपाकडून कोणत्याही उपाययोजना होत नाहीत. अमृत योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून, अमृतचे काम पूर्ण झाल्यानंतरच वाया जाणाऱ्या पाण्याची काही प्रमाणात बचत होण्याची शक्यता आहे.

शहरातील वितरण व्यवस्था ४० वर्षांपेक्षा जुनी आहे. मनपाच्या आकडेवारीनुसार शहरात ४०० हून अधिक ठिकाणी लहान-मोठ्या गळत्या आहेत. त्यामुळे पाणीपुरवठ्यादरम्यान हजारो लिटर पाणी वाया जाते. वितरणादरम्यान सुमारे ४७ टक्के पाणी वाया जाते. याबाबतचा अहवाल सुजल निर्मल अभियानांतर्गत नेमलेल्या नागपूरच्या कंपनीने सादर केला होता. शहरातील अनेक गळत्या या काही वर्षांपासून जशाच्या तशा आहेत. त्या गळत्यांची किमान दुरुस्ती देखील मनपाकडून होत नाही.

शहरातील पाणीपुरवठ्याचे वार्षिक बजेट

१० कोटी

पाणीपुरवठ्याचे वर्षाचे बिल

७ कोटी

पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी

३५०

लिकेजमुळे २० टक्के पाणी वाया

शहराच्या लोकसंख्येनुसार दरडोई १३० लिटर ७० मिलियन लिटर्स पाण्याची आवश्यकता जळगावकरांना लागते. शहराला वाघूर धरणावरून पाणीपुरवठा केला जातो. या ठिकाणाहून ९६ एमएलडी पाणी दररोज घेतले जाते. शुद्धीकरण करून ७६ एमएलडी पाणी गिरणा टाकीत सोडले जाते. शुद्धीकरणादरम्यान २० एमएलडी पाणी वाया जाते तसेच गळत्यांमुळेही दररोज २० टक्के पाणी वाया जात आहे.

दोन वर्षांपासूनची गळती

माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयासमोरील रस्त्यालगत गेल्या दोन वर्षांपासून गळती कायम असून, मनपाकडून अनेकवेळा दुरुस्ती करून देखील ही गळती दुरुस्त होऊ शकलेली नाही.

वारंवार दुरुस्ती करूनही गळती कायम

छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल परिसरातील गळती देखील एक-दीड वर्षांपासून कायम आहे. याठिकाणी दर महिन्याला मनपाकडून दुरुस्ती करण्यात येत असते. मात्र, दुरुस्ती केल्यानंतर काही दिवसांतच पुन्हा याठिकाणी पाणी गळती सुरू असते. याबाबत मनपाने कायमची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.