शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

भडगाव तहसील कार्यालयात पासर्डीचे ग्रामस्थ झाले आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 15:43 IST

दुकानाचा परवानाच रद्द करण्याची मागणी

कजगाव, ता. भडगाव : येथून जवळच असलेल्या पासर्डी ता.भडगाव येथील स्वस्त धान्य दुकानदाराच्या मनमानी कारभारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. ६ रोजी भडगाव येथील तहसील कार्यालयाकडून काही अधिकारी आले होते. त्यांच्या समोरच या असंतोषाचा भडका उडाला.येथील स्वस्त धान्य दुकानदारास ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. स्वस्त धान्य दुकानदार राजू मिस्तरी व ग्रामस्थांमध्ये हुज्जत झाली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.पासर्डी येथील रेशन दुकानदार राजू मिस्तरी स्वस्त धान्य दुकानाचा माल काळ्या बाजारात विकत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला त्यामुळे येथील अनेक नागरिकांना स्वस्त धान्यापासून वंचीत रहावे लागत होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात पासर्डी गावात मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला होता.कार्यवाही सुरू असतानाच दुकानदार व ग्रामस्थांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे गावात काही काळ तणावग्रस्त स्थिती होती. या दुकानदारावर तत्काळ कारवाई करून त्याच्या कडील स्वस्त धान्य दुकान त्वरित काढून टाकावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली.प्रसंगी भडगाव येथील पुरवठा निरीक्षक किशोर महाले कजगावचे तलाठी बी. एम.परदेशी, पासर्डीचे सरपंच बाळू पाटील, ग्रामसेवक उमेश परदेशी, कोतवाल नितीन कोळी, माजी सरपंच वासुदेव पाटील, ग्रा. प. सदस्य सुनील सोनवणे, मंगलबाई सोनवणे, विकासो चेअरमन प्रताप पाटील, छावा संघटनेचे भगवान पाटील, मनसेचे कैलास जाधव, जयराम पाटील, राजेंद्र पाटील, वाल्मिक कोळी, नामदेव वाघ व शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.दरम्यान, या घटनेची पासर्डी मोठी चर्चा सुरू आहे. ग्रामस्थांना धान्य मिळाले पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी याठिकाणी दाखल होत नागरिकांची समजूत काढली.दुकानदार दोषी आढळल्यास कारवाईगावातील एका नागरिकाने वरिष्ठस्थरावर तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेवून पाचोरा उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी पासर्डी गावाला भेट दिली व योग्य त्या सूचना पुरवठा व संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. त्या प्रमाणे पुरवठा विभागाचे अधिकारी यांनी पासर्डी गावाला भेट दिली व दुकानदार व ग्रामस्थ यांच्याशी चर्चा केली. रेशन दुकानदार दोषी आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन ग्रामस्थांना दिले. तरीदेखील ग्रामस्थांचा असंतोष कमी झाला नव्हता. त्यांनी दुकानाचा परवानाच रद्द करण्याची मागणी अधिकाºयांकडे केली.त्यामुळे वातावरण आणखी तापले होते.