शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

तिसऱ्या रेल्वे मार्गाला शिव कॉलनी उड्डाणपुलाच्या जागेचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:19 IST

जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे जळगाव ते शिरसोली दरम्यान सध्या तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे; मात्र या मार्गाला शिव ...

जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे जळगाव ते शिरसोली दरम्यान सध्या तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे; मात्र या मार्गाला शिव कॉलनी उड्डानपुलाच्या खाली जागा नसल्यामुळे, रेल्वे प्रशासनातर्फे तिसरा रेल्वे मार्ग जळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या मुख्य रेल्वे मार्गाला जोडण्यासाठी १२ आणि १७ ऑगस्ट रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे दोन वर्षांपूर्वी जळगावातील पिंप्राळा रेल्वे गेटपासून तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून, शिरसोलीपर्यंतच्या पहिल्या टप्प्यात ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. तर विद्युतीकरण करणे, सिग्नल यंत्रणा उभारणे व मुख्य म्हणजे शिवकॉलनी उड्डाणपुलाच्या खाली तिसरी रेल्वे मार्गाचे रूळ टाकण्यासाठी जागा नसल्यामुळे हे काम रखडले आहे. या पुलाच्या खाली असलेल्या जागेत एक मुंबईकडे जाणारा आणि दुसरा मुंबईकडून येणारा (अप आणि डाऊन) असे दोनच मार्ग आहेत. दोन्ही बाजूने तिसऱ्या रेल्वे मार्गाचे रूळ टाकण्यासाठी जागा नाही. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम या ठिकाणी रखडले होते. त्यावर उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने तिसऱ्या रेल्वे मार्गाला मुख्य रेल्वे मार्गाला जोडण्यासाठी रूळ जोडणीचे काम करण्यात येणार आहे. यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना तिसऱ्या रेल्वे मार्गावरूनही जाता येणार आहे.

इन्फो :

१२ आणि १७ ऑगस्ट रोजी मेगाब्लॉक :

तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या या महत्त्वाच्या कामासाठी रेल्वे प्रशासनातर्फे १२ आणि १७ ऑगस्ट रोजी प्रत्येकी ५ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यात १२ रोजीचा मेगाब्लॉक हा सकाळी पावणे आठला सुरू होऊन, दुपारी पाऊणपर्यंत राहणार आहे. या मेगाब्लॉकच्या काळात सुरत-मुंबईकडून येणाऱ्या गाड्या विविध स्टेशनवर अर्धा ते एक तासापर्यंत थांबविण्यात येणार आहे. यात भागलपूर-सुरत एक्स्प्रेसही दहा मिनिटे जळगाव स्टेशनवर थांबविण्यात येणार आहे. तसेच (गाडी क्रमांक ०२१०३) गोरखपूर एक्स्प्रेस ही गाडी एक तास शिरसोली स्टेशनवर तर गाडी क्रमांक (०२१६५) एलटीटी -गोरखपूर एक्स्प्रेस ही गाडीही एक तास म्हसावद स्टेशनला थांबविण्यात येणार आहे, तसेच हावडा एक्स्प्रेस माहेजी स्टेशनला तर कर्नाटक एक्स्प्रेस व काशी एक्स्प्रेस पाचोरा स्टेशनवर थांबविण्यात येणार आहे.

तर १७ रोजीच्या मेगाब्लॉकमध्ये मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्या भुसावळ व सावदा या स्टेशनवर थांबविण्यात येणार आहेत.

इन्फो :

तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामासाठी शिवकॉलनी उड्डाणपुलाच्या खाली पुरेसी जागा नाही. त्यामुळे या ठिकाणी तिसरा रेल्वे मार्ग मुख्य रेल्वे मार्गाला जोडण्यासाठी कट आणि कनेक्शनचे तांत्रिक काम हाती घेण्यात येणार आहे. उपलब्ध असलेल्या जागेत तिसऱ्या मार्गाचे रूळ टाकून हा मार्ग मुंबईकडे जाणाऱ्या मुख्य रेल्वे मार्गाला जोडण्यात येणार आहे.

पंकज डावरे, उप मुख्य अभियंता, भुसावळ विभाग.