शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पॉझिटिव्ह असतानाही बेधडकपणे फिरतायत बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मनपा व जिल्हा प्रशासनाने कमी लक्षणे असलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मनपा व जिल्हा प्रशासनाने कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणाची मुभा दिली असली तरी अनेक पॉझिटिव्ह रुग्ण सर्रासपणे बाहेर फिरून कोरोना वाटत फिरत असल्याची धक्कादायक स्थिती ‘लोकमत’ने केलेल्या सर्व्हेक्षणातून समोर आली आहे.

लोकमत च्या टीमने अभियांत्रिकी महाविद्यालयातील तपासणी केंद्रावरून बाधित झालेल्या रुग्णांचा विशेष करून ज्या रुग्णांना मनपा प्रशासनाने विलगीकरणची सूट दिली अशा रुग्णांचा काहीवेळ पाठलाग करून परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अनेक रुग्ण पॉझिटिव्ह असतानाही थेट घरी न जाता आधी मेडिकल, किराणा दुकान, भाजीपाला खरेदी, पेट्रोल पंप अशा ठिकाणी जाऊन कोरोनाचा संसर्ग वाढवीत असल्याचे निदर्शनास आले. तर काही ग्रामीण भागातील बाधित व्यक्ती महापालिका प्रशासन किंवा जिल्हा प्रशासनाची परवानगी न घेताच, पॉझिटिव्हचा रिपोर्ट घेऊन थेट घरी रवाना झाल्याचेही पहावयास मिळाले. अशा बेजबाबदार नागरिकांमुळे शहरात व जिल्हाभरात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे.

घरी जाताना केली फळांची खरेदी

अभियांत्रिकी महाविद्यालयातून एक दाम्पत्य पॉझिटिव्ह आल्यानंतर, संबंधितांनी थेट कोरोना सेंटरमध्ये भरती न होता महाविद्यालयातून बाहेर पडले, तसेच ख्वाॅजामिया चौकातून एका फळ विक्रेत्याकडून काही फळांची खरेदी केली. यासह एका मेडिकल स्टोअरवर जाऊन काही औषधी देखील घेतली. यानंतर संबंधित दाम्पत्य एकाच मोटरसायकल वरून खोटे नगर भागातील त्यांचा घरी परतले. या दाम्पत्याने मास्क लावला असला तरी संबंधित व्यक्तीमुळे फळ विक्रेत्याला व मेडिकल स्टोअर्स वरील एका व्यक्तीला कोरोना होण्याची भीती वाढली आहे.

निगेटिव्ह असलेल्या मित्रासोबत झाला रवाना

अभियांत्रिकी महाविद्यालयात एक तीस वर्षाचा युवक कोरोना बाधित आला. या युवकाने देखील कोरोना सेंटरमध्ये भरती न होता आपल्या निगेटिव्ह असलेल्या मित्राला बोलावले. तसेच सोशल डिस्टन्सिंगचा नियम न पाळता थेट त्या मित्राच्या मोटारसायकलवरून दोघेही जण रवाना झाले. तसेच एका दुधाच्या बूथवर देखील दोन्ही मित्र थांबले. त्याठिकाणी कोरोना बाधित युवकाचे काही मित्र देखील त्यावेळी जमा झाले. सुमारे अर्धा तास संबंधित युवक बाधित असतानादेखील त्या दुधाच्या बूथवर थांबून होता.

या बेजबाबदारांना कोण आवरणार

- शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, जिल्हा व मनपा प्रशासनाने रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळावे यासाठी तीन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. मात्र नागरिकच बेजबाबदारपणे वागत असतील तर लॉकडाऊन जाहीर केल्यावर देखील फारसा उपयोग होणार नसल्याचे पहावयास मिळत आहे.

- आरटीपीसीआरची चाचणी केल्यानंतर दोन दिवसानंतर अहवाल प्राप्त होतात. मात्र अहवालाची प्रतीक्षा न करताच अनेकजण तपासणी केल्यानंतर घरी न थांबता थेट बाहेर फिरतात. यामुळे कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे.

- मनपा प्रशासनाने अशाप्रकारे कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी काही पथके नेमली आहेत. मात्र, या पथकांकडून देखील अशा बेजबाबदार नागरिकांना आवर घालण्यास अपयश येत आहे. याबाबत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

एकूण रुग्ण

८६ हजार ६८८

बरे झालेले रुग्ण

७३ हजार ६६५

सध्या उपचार घेत असलेले रुग्ण

११ हजार ४२६

गृह विलगीकरण असलेले रुग्ण

७ हजार १११