शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
3
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
4
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
5
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
6
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
7
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
8
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
9
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
10
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
11
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
12
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
13
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
14
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!
15
DPL 2025 : "नायक नहीं खलनायक हूँ मैं..." या गोलंदाजानं हॅटट्रिक घेतली त्याच ओव्हरमध्ये मॅच घालवली
16
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
17
रशियन लोकांना तुर्की आवडत नाही? दोन वर्षांत तुर्कस्तानातील रशियन लोकसंख्या अर्ध्यावर!
18
हिमालयातलं पाणी बॉटलमधून विकतेय अभिनेत्री, एका बाटलीची किंमत वाचून झोप उडेल
19
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
20
नवऱ्याशी भांडल्यावर बायकोने दीड वर्षांच्या मुलाला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं, झाला मृत्यू

आय-पास प्रणालीच्या कामकाजात जि.प.मुळे अडथळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : : जिल्हा नियोजन समितीचे कामकाज पेपरलेस करण्यासाठी व संपूर्ण निधीचा विनियोग व्हावा यासाठी आय-पास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : : जिल्हा नियोजन समितीचे कामकाज पेपरलेस करण्यासाठी व संपूर्ण निधीचा विनियोग व्हावा यासाठी आय-पास प्रणाली विकसित करण्यात आली असली तरी अद्यापही याचा जि.प.कडून वापर होत नाही. तसे पाहता आय-पासच्या अंमलबजावणीत जिल्हा अग्रेसर आहे, मात्र यंदा आय-पास प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी घोषित करण्यात आलेल्या चॅलेंज निधीचे ‘चॅलेंज’ कसे पूर्ण होणार, हे एक आव्हानच ठरणार आहे.

विविध योजनांतर्गत मंजूर करण्यात येणाऱ्या कामांच्या माहितीचे संगणकीकरण करून लोकाभिमुख पारदर्शक आणि गतिमान प्रशासन करण्याच्या दृष्टीने, जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजासाठी सर्वंकष अशा या वेब बेस्ड प्रणालीमध्ये १ एप्रिल २०२० पासून जिल्हा नियोजन समितीचे संपूर्ण कामकाज करण्यात आले. मात्र अद्यापही जि.प.च्या अनेक विभागांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणाऱ्या कामांमध्ये रस्त्यांचे व शाळा खोल्यांच्या कामांना मान्यता देणे व निधी वितरणाचे काम आय-पासद्वारे झाले. मात्र तर विभागाचे काम आय-पासमधून अजूनही झालेली नाही. यात मुख्य अडचण म्हणजे जिल्हा परिषदेकडे कायमस्वरूपी कार्यकारी अभियंता नसल्याने अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे हा मुद्दा गेल्या महिन्यात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही उपस्थित झाला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे विभाजन करण्याचा ठराव करण्यात आला.

काय आहे आय-पास प्रणाली

जिल्हा विकास निधीतून करण्यात येणारे संपूर्ण कामकाज आय-पास प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. यामध्ये कामांना प्रशासकीय मान्यता देणे, निधी मागणीदेखील या प्रणालीतूनच करणे, निधी वितरीत करणे, कामांचे कार्यारंभ आदेश, काम पूर्णत्वाचे दाखले व कामांचे फोटो अपलोड करणे ही सर्व कामे आय-पासमधून होणार आहे. या प्रणालीत कामाची प्रगती दिसून आल्यानंतर निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात येते.

२०१९-२० वर्षातील १०० टक्के कामकाज आय-पासमधून

जिल्हा नियोजन समितीचे संपूर्ण कामकाज १ एप्रिल २०२० पासून आय-पासमधून सुरू झाले. त्या पूर्वीच्या २०१९-२० या आर्थिक वर्षातील कामांची नोंददेखील जळगाव नियोजन विभागाने आय-पासमध्ये केली आहे. ३१ मार्च २०२०पर्यंत ही नोंद होऊ शकली नाही, मात्र त्यानंतर कोरोनाच्या काळात हळूहळू जिल्हा नियोजन विभागाने संपूर्ण नोंद आय-पासमध्ये करीत २०१९-२० वर्षातील १०० टक्के कामकाज आय-पासमध्ये झाली आहे.

५० कोटींच्या निधीसाठी ‘चॅलेंज’

आय-पासची राज्यभरात सर्वत्र अंमलबजावणी व्हावी यासाठी यंदाच्या नियोजन विभागाच्या बैठकीत अर्थमंत्री अजित पवार यांनी प्रत्येक विभागीय बैठकीत चॅलेंज निधीची घोषणा केली. यामध्ये जे जिल्हे संपूर्ण कामकाज या प्रणालीद्वारे करतील व १०० टक्के निधी वितरण होईल, अशा एका जिल्ह्याला विभागातून ५० कोटींचा वाढीव निधी दिला जाणार आहे. जळगाव जिल्ह्यात दीड वर्षापूर्वीपासूनच याची अंबलबजावणी झाली असून आता हे चॅलेंजदेखील जिल्ह्याने स्वीकारले आहे. जिल्ह्यात वन विभाग, सा.बां. विभाग, न.पा., जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग यासह सर्वच यंत्रणांकडून आय-पासमधून सुरू आहे. केवळ जि.प.कडून संपूर्ण कामकाज यात होत नसल्याने ५० कोटींच्या निधीसाठी यंत्रणांकडून पाठपुरावा सुरू आहे.

आय-पासचे फायदे

- जिल्ह्याचा विकास गतीने होणार

- निधी शिल्लक राहणार नाही

- वेळेत प्रशासकीय मान्यता मिळून निधीही परत जाणार नाही

- चॅलेंजनिधीमुळे संपूर्ण निधी खर्च होण्यासह वाढीव ५० कोटी मिळणार

- शाश्वत विकासाची कामे

——————

जिल्हा नियोजन समितीचे कामकाज पेपरलेस करण्यासाठी आय-पास प्रणाली विकसित करण्यात आली असून यामध्ये विविध योजनांतर्गत मंजूर करण्यात येणाऱ्या कामांच्या माहितीचे संगणकीकरण करण्यात आले आहे. या प्रणालीमध्ये २०१९-२० या वर्षातील कामकाजाचे आय-पासमध्ये १०० टक्के काम झाले आहे. आता चॅलेंज निधीसाठी प्रयत्न सुरू आहे.

- प्रतापराव पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी