शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी-मराठा छुपा संघर्ष सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 12:39 IST

ओबीसी-मराठा छुपा संघर्ष सुरू झाला असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते माजी खासदार अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ठळक मुद्देमनुवादी संविधान आणण्याचा आरएसएसचा डाव

जळगाव : ओबीसींना मिळालेले आरक्षण व फडणवीस सरकारने मराठा समाजाला दिलेले सामाजिक व शैक्षणिक मागासले- पणासाठीचे १६ टक्के आरक्षण यांचा पाया एकच असून त्या दोन्ही आरक्षणांसाठी वेगळे जात प्रमाणपत्र देण्याची तरतूदही शासनाने केलेली नाही. त्यामुळे ओबीसी-मराठा छुपा संघर्ष सुरू झाला असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते माजी खासदार अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.मुक्ताईनगर वंचित बहुजन आघाडी सत्ता संपादन मेळाव्यासाठी जाण्यापूर्वी गुरूवारी, १४ रोजी सकाळी ११ वाजता अ‍ॅड.आंबेडकर यांनी अजिंठा विश्रामगृहात यावेळी भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, ज्येष्ठ सल्लागार व माजी मंत्री डॉ.दशरथ भांडे, जिल्हा निरीक्षक शरद वसतकर, भारिपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष भारत ससाणे, एमआयएमचे अध्यक्ष जिया बागवान, महानगराध्यक्ष रेयान जहागीरदार, विवेक ठाकरे उपस्थित होते. अ‍ॅड.आंबेडकर म्हणाले की, ओबीसींना मंडल आयोगाकडून मिळालेले २७ टक्के आरक्षण व त्यासोबच फडणवीस सरकारने मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण यांचा मूळ आधार सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणच आहे. या आधारावर जे जात प्रमाणपत्र आहे ते एकच असेल. त्यामुळे ओबीसींना आपले २७ टक्के आरक्षण धोक्यात आल्याची भिती वाटत आहे. कुणी मराठा पुढाऱ्याने पुढाकार घेऊन मंडल आयोगाचे आरक्षण तर फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण ‘ब’ असे स्वतंत्र करून जात प्रमाणपत्र देण्यासाठी प्रयत्न केल्यास भांडण मिटेल.भाजपाला फटकाच बसणारवंचीत बहुजन आघाडीमुळे भाजपाला फायदा होईल, अशी चर्चा केली जात आहे. त्याबाबत विचारणा केली असता अ‍ॅड.आंबेडकर म्हणाले की, ओबीसींनी आतापर्यंत भाजपाला मतदान केले. तो काँग्रेसचा बेस नाही, मराठा समाज राष्टÑवादी व काँग्रेसकडे आहे.आरएसएसबाबत आराखडा द्यावा२०२४ मध्ये संविधान बदलविण्याची भाषा करणाºया राष्टÑीय स्वयंसेवक संघाकडून सुरू आहे. मात्र संविधान का बदलणार याबाबत वक्तव्य नाही. तरीही त्यांचे जे लिखाण दिसते आहे त्यावरून त्यांना मनुवादी संविधान देशात आणायचे आहे.राष्टÑवादी कॉँग्रेसवर टीकायावेळी आंबेडकर यांनी राष्टÑवादी कॉग्रेसवरही टीका केली. या पक्षाचे राजकारण ‘अवसरवादी’ असल्याची टीकाही त्यांनी केली.

ओबीसी-मराठा छुपा संघर्ष सुरूप्रकाश आंबेडकर : मनुवादी संविधान आणण्याचा आरएसएसचा डावजळगाव : ओबीसींना मिळालेले आरक्षण व फडणवीस सरकारने मराठा समाजाला दिलेले सामाजिक व शैक्षणिक मागासले- पणासाठीचे १६ टक्के आरक्षण यांचा पाया एकच असून त्या दोन्ही आरक्षणांसाठी वेगळे जात प्रमाणपत्र देण्याची तरतूदही शासनाने केलेली नाही. त्यामुळे ओबीसी-मराठा छुपा संघर्ष सुरू झाला असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते माजी खासदार अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.मुक्ताईनगर वंचित बहुजन आघाडी सत्ता संपादन मेळाव्यासाठी जाण्यापूर्वी गुरूवारी, १४ रोजी सकाळी ११ वाजता अ‍ॅड.आंबेडकर यांनी अजिंठा विश्रामगृहात यावेळी भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, ज्येष्ठ सल्लागार व माजी मंत्री डॉ.दशरथ भांडे, जिल्हा निरीक्षक शरद वसतकर, भारिपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष भारत ससाणे, एमआयएमचे अध्यक्ष जिया बागवान, महानगराध्यक्ष रेयान जहागीरदार, विवेक ठाकरे उपस्थित होते. अ‍ॅड.आंबेडकर म्हणाले की, ओबीसींना मंडल आयोगाकडून मिळालेले २७ टक्के आरक्षण व त्यासोबच फडणवीस सरकारने मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण यांचा मूळ आधार सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणच आहे. या आधारावर जे जात प्रमाणपत्र आहे ते एकच असेल. त्यामुळे ओबीसींना आपले २७ टक्के आरक्षण धोक्यात आल्याची भिती वाटत आहे. कुणी मराठा पुढाऱ्याने पुढाकार घेऊन मंडल आयोगाचे आरक्षण तर फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण ‘ब’ असे स्वतंत्र करून जात प्रमाणपत्र देण्यासाठी प्रयत्न केल्यास भांडण मिटेल.भाजपाला फटकाच बसणारवंचीत बहुजन आघाडीमुळे भाजपाला फायदा होईल, अशी चर्चा केली जात आहे. त्याबाबत विचारणा केली असता अ‍ॅड.आंबेडकर म्हणाले की, ओबीसींनी आतापर्यंत भाजपाला मतदान केले. तो काँग्रेसचा बेस नाही, मराठा समाज राष्टÑवादी व काँग्रेसकडे आहे.आरएसएसबाबत आराखडा द्यावा२०२४ मध्ये संविधान बदलविण्याची भाषा करणाºया राष्टÑीय स्वयंसेवक संघाकडून सुरू आहे. मात्र संविधान का बदलणार याबाबत वक्तव्य नाही. तरीही त्यांचे जे लिखाण दिसते आहे त्यावरून त्यांना मनुवादी संविधान देशात आणायचे आहे.राष्टÑवादी कॉँग्रेसवर टीकायावेळी आंबेडकर यांनी राष्टÑवादी कॉग्रेसवरही टीका केली. या पक्षाचे राजकारण ‘अवसरवादी’ असल्याची टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :Politicsराजकारण