शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी मुख्यमंत्री व बहुजनांचे सरकार ही काळाची गरज- मुक्ताईनगर येथे पत्रकार परिषदेत माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 18:57 IST

महाराष्ट्रात ५२ टक्के ओबीसी समुदाय असतानादेखील आजपर्यंत एकही मुख्यमंत्री हा ओबीसींचा झालेला नाही. त्यामुळे ५२ टक्के समाजाचा ओबीसी मुख्यमंत्री व्हावा आणि बहुजनांचे सरकार महाराष्ट्रात यावा, अशी मागणी लोकजागर अभियानाचे अध्यक्ष प्रा.ज्ञानेश वाकुडकर यांनी रविवारी मुक्ताईनगर येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देमहाराष्ट्रात ५२ टक्के ओबीसी समाज असून, आतापर्यंत एकही मुख्यमंत्री झाला नाही.नोकºयांमध्ये ओबीसींचा मोठा अनुशेषओबीसींवर अनेक वर्षांपासून अन्याय

मुक्ताईनगर, जि.जळगाव : महाराष्ट्रात ५२ टक्के ओबीसी समुदाय असतानादेखील आजपर्यंत एकही मुख्यमंत्री हा ओबीसींचा झालेला नाही. त्यामुळे ५२ टक्के समाजाचा ओबीसी मुख्यमंत्री व्हावा आणि बहुजनांचे सरकार महाराष्ट्रात यावा, अशी मागणी लोकजागर अभियानाचे अध्यक्ष प्रा.ज्ञानेश वाकुडकर यांनी रविवारी मुक्ताईनगर येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत केली.याप्रसंगी वाकुडकर यांच्यासोबत लोकजागरचे संयोजक बाबासाहेब भोयर, गोविंद पाटील, शिवचरण उज्जैनकर, धनंजय सापधरे, नितीन भोंबे, प्रमोद पिवटे, जयवंत बोदडे, रा.का.ढोले, प्रवीण बडगुजर, विजय शुरपाटणे, गणेश बुडूकले तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.महाराष्ट्रात ५२ टक्के ओबीसी समाज असून, आतापर्यंत एकही मुख्यमंत्री झाला नाही. तसेच आरक्षणदेखील त्यांना केवळ १६ टक्के मिळत आहे. नोकऱ्यांमध्ये ओबीसींचा मोठा अनुशेष असून, ओबीसींचे लचके तोडले जात असल्याचा आरोप वाकुडकर यांनी केला. त्यासाठी विदर्भव्यापी लोकजागर यात्रा काढण्यात येत आहे. झिरो बजेट लोकशाही, गाव तिथे उद्योग, कृषी धर्म व कृषी संस्कृती, सामाजिक उद्योग, सामाजिक सरकार, मोफत शिक्षण, मोफत आरोग्य, एक गाव एक परिवार, युवा भारत नवा भारत, गतिशील न्यायालय व पारदर्शी न्याय या आठ विषयांवर महाराष्ट्र व्यापी यात्रेची वाकुडकर यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली. 

टॅग्स :PoliticsराजकारणMuktainagarमुक्ताईनगर