शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

कोरोना रुग्ण वाढल्याने तपासणी करणाऱ्यांची संख्याही वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:15 IST

जळगाव : शहरात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून नियमित बाधित येणाऱ्यांची संख्याही साडेतीनशेच्या घरात पोहोचली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता ...

जळगाव : शहरात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून नियमित बाधित येणाऱ्यांची संख्याही साडेतीनशेच्या घरात पोहोचली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता कोरोना चाचणी करणाऱ्यांचे प्रमाणही गेल्या महिनाभरात प्रचंड वाढले आहे. शासकीय तंत्रनिकेतन या केंद्रावर सकाळपासूनच नागरिकांची गर्दी होत असल्याचे चित्र आहे. या गर्दीचे नियोजन करण्यासाठी आता तंत्रनिकेतन या ठिकाणी दोन केंद्रांवर तपासणी केली जात आहे. रविवारी हे नवीन केंद्र सुरू करण्यात आले.

सरासरी ५५० चाचण्या रोज या ठिकाणी होत आहेत. सुरुवातीला काही दिवस सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नव्हते. मात्र, मध्यंतरी यंत्रणेने याचे नियोजन करून आता या केंद्रावर नागरिक शिस्तीचे पालन करीत असल्याचे चित्र आहे. शहरात गेल्या काही दिवसांत बाधितांचे प्रमाण हे झपाट्याने वाढले आहे. गेल्या तीन महिन्यांत नियमित सरासरी शंभरपर्यंत चाचण्या होत होत्या. हेच प्रमाण थेट ५५० पर्यंत गेले आहे. कधीकधी सायंकाळपर्यंत केंद्रांवर गर्दी राहत असल्याचे चित्र आहे.

ॲण्टीजेन, आरटीपीसीआर या केंद्रांवर ॲण्टीजेन व आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात आहे. मध्यंतरी, आरटीपीसीआरचे प्रमाण वाढविण्यात आले होते. त्यानंतर, ॲण्टीजेनचे प्रमाण वाढविण्यात आले असून यात अनेक जण बाधित आढळून येत आहेत. ॲण्टीजेनमध्ये बाधित येण्याचे प्रमाण या केंद्रावर ४० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

कोरोनाचे एकूण रुग्ण : ६८६६२

बरे झालेले रुग्ण : ६०५१७

एकूण कोरोना बळी : १४३२

सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण : ६७१३

दररोज तपासणी होणारे : ५५०

दोन दिवसांपासून त्रास जाणवत होता. त्यामुळे टेस्ट करण्यासाठी आलोय, गर्दी आहे. या ठिकाणी रजिस्टरमध्ये नोंदणी करून त्यानंतर पुन्हा नोंदणी करून एक क्रमांक दिला जातो. त्यानंतर टेस्ट केली जाते. अहवाल लवकर मिळतो. टेस्टिंगसाठी आलेली व्यक्ती केंद्रावर गर्दी वाढली आहे, मात्र, नागरिक दूर दूर उभे असतात. ॲण्टीजेन टेस्ट झाल्यानंतर रिपोर्ट लवकर समजत असल्याने आपण पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हे लवकर कळते.

- टेस्टिंगसाठी आलेली व्यक्ती

कोट

केंद्रावर आल्यानंतर नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे, मास्क वापरावे. गर्दी होऊ नये म्हणून तपासणीसाठी आणखी एक केंद्र शेजारीच सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनी संयम ठेवून प्रशासनास सहकार्य करावे.

- डॉ. संजय पाटील, वैद्यकीय अधिकारी, मनपा