शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

गाळेधारकांच्या हक्कासाठी आता कुटुंबातील महिला आंदोलनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:12 IST

जळगाव : गेल्या सहा दिवसांपासून गाळेधारकांनी मनपा प्रशासनाविरोधात साखळी उपोषण पुकारले असून, रविवारीदेखील गाळेधारक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून बसले ...

जळगाव : गेल्या सहा दिवसांपासून गाळेधारकांनी मनपा प्रशासनाविरोधात साखळी उपोषण पुकारले असून, रविवारीदेखील गाळेधारक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून बसले होते. विशेष म्हणजे आता गाळेधारकांच्या हक्कासाठी गाळेधारकांच्या कुटुंबातील महिलादेखील आता या आंदोलनात उतरल्या असून, रविवारी साखळी उपोषणाच्या ठिकाणी आंदोलनात सहभाग घेऊन, महिलांनी मनपा प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी अनेक महिलांना गाळेधारकांच्या व्यथा सांगताना अश्रूदेखील अनावर झाले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहा दिवसांपासून गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी साखळी उपोषण पुकारले आहे. सहाव्या दिवशीदेखील डॉ.शांताराम सोनवणे, पांडुरंग काळे, राजस कोतवाल, तेजस देपुरा, युवराज वाघ, वसीम काझी, सुजित किनगे, पंकज मोमाया, शिरीष थोरात उपस्थित होते. आता मनपा प्रशासन जर का लक्ष देणार नाही तर मुलं-बाळांनादेखील या आंदोलनात सहभागी करून हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा गाळेधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. रविवारी ॲड. विजय पाटील, लोकसंघर्ष मोर्चाचे सचिन धांडे, माजी नगरसेवक सुनील माळी, ताहेर शेख, माजी मुख्याधिकारी प्रभाकर सोनवणे, एस.टी. को-ऑपरेटिव्ह बँकचे कर्मचारी संचालक प्रदीप सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला.

मनपाने मुद्दामहून सोडविला नाही प्रश्न

गाळे कराराचा तिढा सोडवणे शक्य असूनही गाळेधारकांकडून मोठे आर्थिक घबाड मिळेल या अपेक्षेने गेल्या ९ वर्षांपासून हा प्रश्न मनपाने सुटू दिला नाही असा आरोप गाळेधारकांनी केला आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून अवाजवी बिलांची रक्कम गाळेधारकांच्या माथी मारून, गाळेधारकांवर अन्याय करण्याची भूमिका मनपाने घेतली आहे. मात्र, गाळेधारकांच्या एकीकडे मनपाला हे शक्य झाले नसून, मनपाने कारवाई केली असती तर आतापर्यंत शेकडो गाळेधारकांच्या आत्महत्या झाल्या असत्या, असेही गाळेधारक संघटनेकडून काढण्यात आलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. दरम्यान, गाळेधारकांच्या व्यथा मांडताना, अनेक महिलांना अश्रू अनावर झाले होते. यामध्ये प्रभा परदेशी, संजीवनी कोल्हे, पुष्पा भारंबे, सुशीला चौधरी, हर्षा बोरोले, राजकुमारी भाटिया, कला भामरे यांचा समावेश होता.

मनपा प्रशासन मात्र आता कारवाईवर ठाम

एकीकडे गाळेधारकांचे आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असताना, दुसरीकडे मात्र मनपा प्रशासनानेदेखील आता वसुलीसाठी तयारी सुरू केली आहे. मनपा प्रशासनाने शहरातील मुदत संपलेल्या मार्केटमधील मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार केली आहे. सुरुवातीला या मोठ्या थकबाकीदारांना मनपाकडून टार्गेट केले जाणार असल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे. तसेच महासभेने देखील एकप्रकारे पाठिंबा दिला असल्याने मनपाकडून आता कारवाई होणे अटळ आहे.