शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

आता स्मशानभूमीतही जागा मिळेना, अंत्यविधीसाठी प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या महिनाभरापासून शहरासह जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली असून, दुसरीकडे कोरोनामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या महिनाभरापासून शहरासह जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली असून, दुसरीकडे कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे शहरातील नेरी नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जागा मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मरणानंतरही स्मशानभूमीत यातना सहन कराव्या लागत असून, अंत्यसंस्कारासाठी तासन‌्तास वाट पाहावी लागत आहे.

जिल्हा प्रशासनातर्फे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत असल्या तरी गेल्या महिनाभरापासून कोरोनाचा आलेख चढताच आहे. चालू एप्रिल महिन्यातही तशीच परिस्थिती असून १ एप्रिल रोजी १ हजार १६७ रुग्ण आढळून आले असून, त्यात एकट्या जळगाव शहरातील १०१ रुग्णांचा समावेश आहे. तसेच २ एप्रिल रोजी १ हजार २४२ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, त्यात जळगाव शहरात २४९ रुग्ण आढळून आले होते. ३ रोजी १ हजार ९४ रुग्ण आढळून आले असून, त्या मध्ये जळगावातील २३० रुग्णांचा समावेश आहे. तर ४ रोजी १ हजार १७९ रुग्ण आढळून आले असून, त्यात शहरातील बधितांची संख्या २४८ आढळून आली आहे. अशा प्रकारे शहरातील बाधितांच्या आकडेवारीचा आलेख चढताच असून, मृत्युदरही चढताच आहे. १ ते ४ एप्रिल या चार दिवसांत जळगाव शहरात तब्बल १७ कोरोना बधितांचा मृत्यू झाला आहे.

इन्फो :

जन्म-मृत्यू विभागात रांगा

-मनपातर्फे नेरी नाका स्मशानभूमी कोरोना बाधित मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी अधिग्रहित करण्यात आली आहे आहे. तर शिवाजी नगर, पिंप्राळा व मेहरूण येथील स्मशान भूमीत नैसर्गिक मृत्युमुखी पावलेल्यांचे अंत्यसंस्कार होत आहेत.

- अंत्यसंस्कारासाठी स्मशान भूमीचा परवाना मिळविण्यासाठी मनपातर्फे शहरातील प्रत्येक स्मशानभूमीतच परवाना मिळण्याची सुविधा करण्यात आली आहे. सध्या नेरी नाका स्मशानभूमीत बाधितांवर अंत्यसंस्काराची परवानगी मिळण्यासाठी नातलगांची सकाळपासूनचं गर्दी होत आहे.

- मनपातर्फे नेरी नाका स्मशानभूमीत कोरोना बाधितांवर २४ तास अंत्यसंस्काराची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामुळे हा परवाना मिळण्यासाठी गर्दीचे प्रमाण कमी झाले असल्याचेही सांगण्यात आले.

इन्फो :

दररोज ८ ते १० जणांवर अंत्यसंस्कार

- शहरात एकीकडे कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत

असतांना दुसरीकडे कोरोना बाधित मृत्युमुखी पडणाऱ्यांचेही प्रमाण वाढत आहे. दररोज नेरी नाका स्मशानभूमीत ८ ते १० जणांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.

- शहरातील रुग्णालयांमध्ये बाहेरील कोरोनाबाधित नागरिकही उपचारासाठी येत असून, उपचार सुरू असताना जर एखाद्या बाधिताचा मृत्यू झाला, तर त्या बधितावर जळगावातच अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. त्यामुळे नेरी नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्काराचे प्रमाण वाढले असल्याचे सांगण्यात आले.