शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

आता हे शेतकऱ्यांचे कैवारी की वैरी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 12:32 IST

एकीकडे योगदानाचे कौतुक करीत असताना दुसरीकडे खच्चीकरण, एकमेकांवर जबाबदारी ढकलण्यात केंद्र व राज्य सरकार व्यग्र, विमा, मका खरेदीतून शेतकऱ्यांपेक्षा व्यापारी, कंपन्यांचे उखळ पांढरे

मिलिंद कुलकर्णीपंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन्ही शीर्षस्थ नेते नेहमी शेतकºयांच्या योगदानाचा अभिमानपूर्वक उल्लेख करीत असतात. अगदी कोरोना काळातसुद्धा सगळीकडे लॉकडाऊनची स्थिती असताना बळीराजा मात्र खरीप हंगामावर लक्ष केंद्रित करीत आहे. यंदा उद्दिष्टापेक्षा अधिक पेरणी झाली आहे. असे असताना केंद्र व राज्य सरकार शेतकºयांच्या हिताच्या योजना राबविताना त्याच्यावर अन्याय होईल आणि व्यापारी, व्यावसायिक कंपन्या यांचे उखळ पांढरे होईल, असा निर्णय का घेतात? सरकार कोणाचेही असो, पक्ष कोणताही असो, शेतकºयांचे अहित पाहण्याचे धोरण वर्षानुवर्षे तेच आहे.शेतकºयांशी निगडित अलिकडचे चार प्रमुख विषय घेतले तरी सरकारचे धोरण शेतकरी विरोधी कसे आहे, हे स्पष्ट होते. पहिले उदाहरण हे सदोष सोयाबिन बियाण्याचे. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशात सोयाबिन बियाणे उगवलेच नसल्याच्या अनेक तक्रारी आल्या. राज्य सरकारने आता चौकशीचा फार्स चालवला आहे. इतर व्यवसाय आणि शेती व्यवसाय यातील फरक लक्षात घ्यायला हवा. बोगस बियाण्याची भरपाई मिळेल तेव्हा मिळेल, पण हंगाम हातचा जाऊ नये म्हणून शेतकºयाला दुसरे बियाणे पुन्हा विकत घ्यावे लागलेच. पेरणीसाठी दुसºयांदा श्रम व मोल लागलेच. मनस्ताप झाला, तो वेगळाच.दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शेती हा एकमेव असा व्यवसाय आहे की, उत्पादकाला त्याचा भाव ठरविण्याची संधी नाही. चार-सहा महिने कष्ट तो करतो आणि कमाई मात्र व्यापाºयाची होते. व्यापाºयाची नियत चांगली असेल तर ठीक, अन्यथा तिथेही फसवणूक झाली, तर शेतकरी देशोधडीला लागतो. गेल्या आठवड्यात कापूस व्यापाºयांनी फसविल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या. गेल्या आठवड्यात झालेले दूध आंदोलन हे शेतकºयाच्या दयनीय स्थितीचे बोलके उदाहरण आहे. शेतकºयाकडून सहकारी दूध संघ विकत घेतो तो दर आणि ग्राहकाला विकतो तो दर यात केवढा फरक आहे. दळणवळण, प्रक्रिया असा खर्च गृहित धरला तरी केवढी लूट सुरू आहे, हे स्पष्ट होते. तीच स्थिती कापूस व मका खरेदीची आहे. गेल्यावर्षीचा कापूस शेतकºयाच्या घरात पडून आहे. मक्याची तीच स्थिती आहे. आठवड्याची मुदतवाढ देताना केंद्र सरकारने अडीच लाख क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट दिले आहे. एकट्या जळगाव जिल्ह्यात १० लाख क्विंटल मका शेतकºयाच्या घरात पडून आहे. राज्यात २५ लाख क्विंटल मका पडून असल्याचा अंदाज आहे. शेतकºयाची केवढी थट्टा?हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेचा गाजावाजा करीत असताना केळी व डाळिंबाच्या निकषात बेमालूमपणे बदल केला आहे. हा बदल शेतकºयापेक्षा विमा कंपनीचा फायदा बघणारा आहे. उन्हाळा, हिवाळा आणि वादळी वाºयाच्या काळात होणारे पिकांचे नुकसान लक्षात घेऊन ही विमा योजना राबविण्यात आली. मात्र गेल्या वर्षापेक्षा यंदा निकषात खूप मोठे बदल करण्यात आले. थंडी किंवा ऊन हे सलग ३ ते ५ दिवस सारखे राहण्याची अट आता ५ ते १४ दिवसांपर्यंत केली आहे. नुकसान भरपाई ३३ हजार ते ६६ हजारादरम्यान होती, ती ९ ते ५० हजार रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. अन्यायकारक निकषाचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. १५ जुलैपर्यंत या समितीने अहवाल द्यायला हवा होता. पण अद्याप तो सादर झाला नाही. अहवालातील तरतुदी लक्षात घेऊन केंद्र सरकारला सुधारित प्रस्ताव पाठवला तरच योजनेच्या निकषात बदल होतील. पण सगळा आनंदीआनंद आहे.शेतकºयांचे आम्हीच खरे कैवारी असे प्रत्येक राजकीय पक्ष म्हणतो. सत्तेतील सगळेच मंत्री भूमिपुत्र असल्याचा गौरवाने उल्लेख करतात. मग शेतकºयांचे हाल त्यांना का दिसत नाही? सदोष सोयाबिनचे बियाणे कसे हाती पडते?घरात कापूस व मका पडलेला असतानानव्या हंगामाची पेरणी करणाºया शेतकºयाची मनोवस्था कुणाला कळणार आहे काय? नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले तर विमा योजनेतून नुकसानभरपाई मिळण्याचा हक्कदेखील हिरावला जात असताना त्याने काय करणे अपेक्षित आहे? स्वत:च्या उत्पादनाचा दर ठरवू शकत नाही, असे एकमेव शेती क्षेत्र आहे. तरीही सगळे स्वत:ला कैवारी म्हणवतात.

टॅग्स :Jalgaonजळगाव