शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

आता ग्राहक पंचायतीचे जिल्हास्तरावर एक कोटींपर्यंतचे दावे चालतील- प्र. ह. दलाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 00:38 IST

आॅनलाईन व टेलिशॉपिंग कंपन्यासुद्धा आता नवीन ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत आल्या आहेत. त्यामुळे आॅनलाईन खरेदीत होणाऱ्या ग्राहकांच्या फसवणुकीविरुद्धही दावे दाखल दाखल होऊ शकतील, असे ग्राहक पंचायत, महाराष्टÑ या ग्राहक संघटनेच्या जळगाव शाखेचे जिल्हाध्यक्ष प्र.ह.दलाल यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

ठळक मुद्देलोकमत संडे स्पेशल मुलाखतचर्चेतील व्यक्तीशी थेट संवादआॅनलाईन कंपन्याही ग्राहक संरक्षण कायद्यात

रवींद्र मोराणकर ।भुसावळ, जि.जळगाव : आॅनलाईन व टेलिशॉपिंग कंपन्यासुद्धा आता नवीन ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत आल्या आहेत. त्यामुळे आॅनलाईन खरेदीत होणाऱ्या ग्राहकांच्या फसवणुकीविरुद्धही दावे दाखल दाखल होऊ शकतील, असे ग्राहक पंचायत, महाराष्टÑ या ग्राहक संघटनेच्या जळगाव शाखेचे जिल्हाध्यक्ष प्र.ह.दलाल यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.देशभरात २० जुलै २०२० पासून नवीन सुधारित ग्राहक संरक्षण कायदा लागू झाला आहे. यासंदर्भात ते आपली भूमिका मांडत होते.प्रश्न : नवीन कायद्यात नेमक्या कोणत्या सुधारणा झाल्या आहेत?जिल्हा तक्रार निवारण मंचाकडे आता एक कोटी रुपयांपर्यंतचे दावे चालू शकतील. यापूर्वी ही मर्यादा २० लाखांपर्यंत होती. राज्य आयोगाकडे १० कोटी रुपयांपर्यंत दावे चालतील.प्रश्न : आता ग्राहकांचे शोषण थांबेल?मुळीच नाही. पण त्यास काही प्रमाणात तरी प्रतिबंध मात्र निश्चित होईल. केवळ कायदे करून अन्याय निवारण किंवा शोषणमुक्ती किंवा सुधारणाही होत नसते तर ज्याच्यासाठी कायदे आहेत त्याने ते समर्थपणे वापरलेही पाहिजेत. तरच कायद्याचा हेतू सफल होतो. त्यासाठी ग्राहकांचे प्रबोधन होणे अत्यावश्यक आहे.प्रश्न- ग्राहकांचे शोषण म्हणजे नेमके काय?ग्राहकाची अडवणूक, फसवणूक होणे म्हणजे त्याचे शोषण होणे होय. दुय्यम प्रतीची वस्तू मिळणे, अवाजवी किंमत आकारणे, वजन मापात लुबाडणे, बिल न देणे, भेसळ मिळणे, कालबाह्य तारखेत खाडाखोड करणे या वा अन्य मार्गाने ग्राहकाला फसविणे, नाडणे म्हणजे त्याचे शोषण होय.प्रश्न- हा कायदा कधी अस्तित्वात आला?ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी २४ डिसेंबर १९८६ रोजी हा कायदा अस्तित्वात आला. १२ जानेवारी १९७४ रोजी पुण्यात कै.बिंदुमाधव जोशी यांनी ग्राहक पंचायतीची स्थापना केली. ग्राहक संरक्षण कायद्याचे प्रणेतेही तेच आहेत. या कायद्यामुळेच ग्राहकांना काही हक्क प्राप्त झाले.ग्राहकाभिमुखया कायद्यामुळेच ग्राहकांना काही हक्क प्राप्त झाले. ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना झाली. अभ्यासक्रमात ग्राहक संरक्षण विषयाचा समावेश झाला. सोप्या पद्धतीने ९० दिवसात ग्राहकाला न्याय देण्यासाठी जिल्हा स्तरावर ग्राहक मंचही (कोर्ट) निर्माण झाले.ग्राहक पंचायतीची त्रिसूत्रीउत्पादनात वाढ, वितरणात समानता आणि उपभोगावर संयम ही ग्राहक पंचायतीची त्रिसूत्री आहे. ही चळवळ स्वस्त किमतीसाठी नाही तर वस्तू प्रमाणित व योग्य किमतीत मिळाव्यात म्हणून आहे. संघटनेचा लढा व्यापारी वर्गाविरुद्ध नाही, तर अनुचित व्यापारी प्रथांविरुद्ध आहे.ग्राहक सेलग्राहक मेडिकेशन सेलची स्थापना हे आणखी एक या कायद्याचे वैशिष्ट्य सांगता येईल.तोडफोड नव्हेग्राहकांनी देशासाठी चालविलेली ग्राहकांची चळवळ म्हणजे ग्राहक पंचायत होय. कायदेभंग बंद, जला दो, फेक दो तोड दो हे ग्राहक पंचायतीला मान्य नाही, असेही प्र.ह.दलाल यांनी शेवटी मुलाखतीत सांगितले.

टॅग्स :consumerग्राहकBhusawalभुसावळ