शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

४३ कर्मचाऱ्यांना नोटीस तर मक्तेदाराच्या ३९ गैरहजर कर्मचाऱ्यांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - इच्छादेवी चौफुली ते डी मार्ट पर्यंत रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्याच्या डागडुजीचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - इच्छादेवी चौफुली ते डी मार्ट पर्यंत रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरू करण्यासाठी अतिक्रमण हटविणे आवश्यक आहे. अतिक्रमण विभागाने कारवाई तात्काळ सुरू करावी अशा सूचना महापौर भारती सोनवणे यांनी केल्या. महापौरांच्या महास्वच्छता अभियानातंर्गत शुक्रवारी मेहरुण, गणपती नगर भागात भेट दिली. यावेळी विविध प्रश्न व समस्या जाणून घेतल्या.

महास्वच्छता अभियानात महापौर भारती सोनवणे, यांनी शुक्रवारी प्रभात क्रमांक १६ ते १८ मध्ये पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत उपमहापौर सुनील खडके, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, नगरसेवक कैलास सोनवणे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सदाशिव ढेकळे, मनोज आहुजा, ज्योती चव्हाण, सुरेखा तायडे, अमित काळे, विशाल त्रिपाठी, चेतन सनकत यांच्यासह मनपातील अधिकाऱ्यांचा ताफा उपस्थित होता. गणपती नगरात ३-३ दिवस रस्त्यांची साफसफाई नसते, परिसरातील अनेक पथदिवे बंद आहे, धोकादायक झाडे केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे, काही खाजगी मोकळ्या प्लॉटवर घाण टाकण्यात येते अशा तक्रारी नागरिकांनी केल्या. महापौरांनी संबंधित अधिकारी आणि आरोग्य निरीक्षक यांना सूचना केल्या. तसेच समस्या न सुटल्यास नागरिकांनी फोन करावा असेही त्यांनी सांगितले. डी मार्टच्या बाजूला तांबापुरा समोरील रस्त्यावर नागरिक शौचास बसतात अशी तक्रारी नगरसेविका यांनी केली. महापौरांनी सूचना देत उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर कारवाई करण्याचा सूचनाही महापौरांनी दिल्या.

मुख्य रस्त्यावरील गटारीच्या कामासाठी 'नही'च्या अधिकाऱ्यांशी चर्चा

शिरसोली मुख्य रस्त्यावर कब्रस्थान समोर असलेल्या मोठ्या गटारीचा स्लॅब काढण्यात आला असून अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच गटार अरुंद झाल्याने गटारीचे पाणी रस्त्यावरून वाहते अशी तक्रार नागरीक व नगरसेवकांनी केली. शिरसोली रस्ता महामार्ग विभागाच्या अखत्यारीत येतो अशी माहिती मनपा अधिकाऱ्यांनी दिली. महापौरांनी यांनी लागलीच 'नही'च्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधता गटारीवरील स्लॅब कल्व्हर्ट, पाईप काढून गटारीची रुंदी वाढवण्याचा सूचना दिल्या महास्वच्छता अभियानादरम्यान मनपाच्या ४३ गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली तर मक्तेदाराच्या ३९ गैरहजर कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५०० रुपये दंड करण्यात आला आहे.