शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

केवळ भूमिपूजन नको, काम सुरू व्हावे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 12:38 IST

विश्लेषण

 सुशील देवकर

निवडणुका तोंडावर येतच भाजपाने विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटनांचा सपाटा लावला आहे. त्यातच शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या जोडरस्त्याच्या कामाचे भूमिपूजन सोमवार, १८ फेब्रुवारी रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होत आहे. मात्र अद्याप या कामात अनेक अडथळे बाकी आहेत. रेल्वेच्या हद्दीतील पूल रेल्वेने पाडून कामाला सुरूवात करायला हवी होती. मात्र रेल्वेचे काम मेगाब्लॉकसाठी अडले आहे. त्यातच पुलाच्या जोडरस्त्याचे काम सुरू करावयाचे तर रस्त्यावरील वाहतूक बंद करावी लागणार आहे. त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यातच नागरिकांनी या कामाला विरोध करीत न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे या विषयाला फाटे फुटण्यापूर्वीच सर्व पूर्तता करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आता सोमवारी, उड्डाणपुलाच्या जोडरस्त्याच्या कामाचे भूमिपूजन होत आहे, ही स्वागतार्ह बाब असली तरीही केवळ भूमिपूजन करून श्रेय घेण्याचे काम होऊ नये. तर काम तातडीने सुरू होऊन ठरलेल्या कालावधीतच पूर्णही व्हावे, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे. त्यादृष्टीने संबंधीत यंत्रणांना पालकमंत्र्यांनी सूचना देण्याची गरज आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी या कामास प्रत्यक्ष सुरूवात होणे आवश्यक आहे. कारण कार्यादेश दिलेले असले तरीही जर प्रत्यक्ष कामास सुरूवात झालेली नसेल तर आदर्श आचारसंहितेनुसार मक्तेदाराला कामाला सुरूवात करता येणार नाही. त्यामुळे भूमीपूजन झाल्यावर दुसऱ्या दिवसापासून काम प्रत्यक्षात सुरू होणे आवश्यक आहे. तरच हे काम मार्गी लागू शकेल. अन्यथा त्यात सातत्याने फाटे फुटण्याचीच अधिक शक्यता आहे. समांतर रस्त्यांच्या विषयात जे झाले तेच या विषयात होऊ नये, अशीच नागरिकांची अपेक्षा आहे.