शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
4
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
5
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
6
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
7
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
8
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
9
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
10
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
11
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
12
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
13
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
14
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
15
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
16
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
17
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
18
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
19
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

आठवणींचा सूर्य मावळू न देणे हे संस्कारांचं फलित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:16 IST

भुसावळ : आठवणींचा सूर्य मावळू न देणे हे संस्कारांचे खरे फलित आहे. माय-बापाच्या घामाचं मोल ज्याला कळले तो आयुष्याच्या ...

भुसावळ : आठवणींचा सूर्य मावळू न देणे हे संस्कारांचे खरे फलित आहे. माय-बापाच्या घामाचं मोल ज्याला कळले तो आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांची वाटणी करणार नाही. आई-बाप गेल्यावर जग आपले नसते हे त्रिकालाबाधित सत्य आहे. प्रत्येकाने ते हृदयात कोरून ठेवायला हवे, असा संदेश पुण्याचे ‘गदिमा’ पुरस्कारप्राप्त कवी देवा झिंजाड यांनी दिला. भुसावळच्या जय गणेश फाउंडेशनच्या ऑनलाइन द्वारकाई व्याख्यानमालेत रविवारी प्रथम पुष्प गुंफताना ते बोलत होते.

माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या मातोश्री द्वारकाबाई कालिदास नेमाडे यांच्या स्मरणार्थ घेण्यात येणाऱ्या या ऑनलाइन व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प कवी झिंजाड यांनी रविवारी गुंफले. त्यानंतर स्वरचित आठ ते दहा कविता व त्यांचा आशय संक्षिप्त स्वरूपात उलगडून सांगितला. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नागरिक बापू मांडळकर होते. प्रास्ताविक उमेश नेमाडे यांनी केले. स्वर्गीय अरुण मांडळकर यांच्या संकल्पनेतून ही व्याख्यानमाला सुरू असल्याची कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन जय गणेश फाउंडेशनचे समन्वयक गणेश फेगडे यांनी केले. तंत्रसाहाय्य पुणे बालभारतीचे सदस्य डॉ. जगदीश पाटील व काटेचा महिला महाविद्यालयाचे प्रा. डॉ. गिरीश कोळी यांचे लाभले.

आज द्वितीय पुष्प चंदनशिवे गुंफणार

द्वारकाई व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प मंगळवार, २७ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता कवठेमहांकाळ (जि. सांगली) येथील दंगलकार नितीन चंदनशिवे हे गुंफतील. ‘वेदनेचा तळ शोधणारी कविता’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे.