शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

निकालाच्या बाबतीत ‘उत्तर महाराष्ट विद्यापीठ’ ठरले राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 13:27 IST

उत्तर महाराष्ट विद्यापीठाकडून मार्च ते मे महिन्यात विविध विद्याशाखाच्या घेण्यात आलेल्या  ७८३ परीक्षांपैकी ५८०  परीक्षांचे निकाल ३० तर २०३ परीक्षांचे निकाल ४५ दिवसाच्या आत जाहीर करणारे उमवि हे राज्यातील अग्रेसर विद्यापीठ ठरले आहे. मुंबई विद्यापीठाचे निकाल अद्याप जाहीर झाले नसताना उमविने  वेळेच्या आत निकाल जाहीर करून आपला स्वत:चा ‘उमवि पॅटर्र्न’ निर्माण केला आहे.       

ठळक मुद्देफास्टट्रॅक पध्दतीने  ७००  हुन अधिक विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकन  उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी ११  केंद्रे   निर्माण केला ‘उमवि पॅटर्र्न’

निकालाच्या बाबतीत ‘उत्तर महाराष्ट विद्यापीठ’ ठरले राज्यात अव्वल

आॅनलाईन लोकमत,

जळगाव, दि.२३,उत्तर महाराष्ट विद्यापीठाकडून मार्च ते मे महिन्यात विविध विद्याशाखाच्या घेण्यात आलेल्या  ७८३ परीक्षांपैकी ५८०  परीक्षांचे निकाल ३० तर २०३ परीक्षांचे निकाल ४५ दिवसाच्या आत जाहीर करणारे उमवि हे राज्यातील अग्रेसर विद्यापीठ ठरले आहे. मुंबई विद्यापीठाचे निकाल अद्याप जाहीर झाले नसताना  उमविने  वेळेच्या आत निकाल जाहीर करून आपला स्वत:चा ‘उमवि पॅटर्र्न’ निर्माण केला आहे.      विद्यापीठात  विविध  विद्याशाखेअंतर्गत  मार्च ते मे महिन्यात घेण्यात आलेल्या ७८३ परीक्षांमध्ये  १ लाख ५८ हजार विद्यार्थी बसले होते. १७ मार्च ते  ६ जून या ८२ दिवसाच्या  कालावधीत या सर्व परीक्षा पार पडल्या. यामध्ये एम.ए., एम.कॉम., विधी,  अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी व पदव्युत्तर या  अभ्यासक्रमांच्या १ हजार ६६५ विषयांच्या प्रश्नपत्रिकांचे वितरण उमविकडून आॅनलाईन  पध्दतीने करण्यात आले. तर उर्वरीत अभ्यासक्र्रमांच्या प्रश्नपत्रिका  परीक्षा केंद्रावर  पोहचविण्यात आल्या. यासाठी कुलगुरु प्र्रा.पी.पी.पाटील यांनी प्रारंभापासून परीक्षांचे  निकाल वेळेवर लागावेत यासाठी प्रयत्न केले आहेत.     फास्टट्रॅक पध्दतीने  ७००  हुन अधिक विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकन  विद्यापीठाने वेळेवर  निकाल लावण्यासोबतच यंदा प्रथमच निकाल जाहीर झाल्यानंतर  पुनर्मूल्यांकनासाठी ‘फास्टट्रॅक’ पध्दतीने ७०० हुन अधिक विद्यार्थ्यांचे निकाल  पुनर्मूल्यांकन केले आहेत. अनेकदा विद्यार्थी एखाद्या विषयात नापास झाल्यास विद्यार्थ्यांचा पुनर्मूल्यांकनासाठी तीन महिन्याहून अधिक वेळ जायचा  यामुळे  विद्यार्थ्यांचा निकाल उत्तीर्ण लागल्यावर देखील विद्यार्थ्यांचे वर्ष वाया  जात होते. मात्र विद्यापीठाने यंदा ‘फास्टट्रॅक’ पध्दतीने  पुनर्मूल्यांकन करून विद्यापीठाने विद्यार्थ्यांचा  हिताचा निर्णय घेतला आहे.     उत्तरपत्रिका मूल्यांकनासाठी ११  केंद्रे  परीक्षांचे निकाल वेळेवर लागावेत यासाठी विद्यापीठाकडून परीक्षा  व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.डी.एन.गुजराथी यांच्या सहकार्याने उत्तरपत्रिकांचे मूल्यांकनासाठी खान्देशात  विविध ठिकाणी ११  केंद्रे  निश्चित केली. यामध्ये  धुळे जिल्ह्यात ६, नंदुरबार जिल्ह्यात व जळगावमध्ये ४ केंद्राचा समावेश  आहे. विद्यापीठामध्ये होत असलेल्या या बदलांचे विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे.