शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

भुयारी मार्ग नाही, तर किमान पादचारी पूल तरी द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यापासून सालारनगर आणि मिल्लतनगर या महामार्गांच्या दोन्ही बाजुूना राहणारे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यापासून सालारनगर आणि मिल्लतनगर या महामार्गांच्या दोन्ही बाजुूना राहणारे नागरिक सातत्याने भुयारी मार्ग करून देण्याची मागणी करत आहे. मात्र आता तांत्रिकदृष्ट्या हे शक्य नसल्याचे लक्षात आल्याने सालार नगरवासीयांनी भुयारी मार्ग नाही, तर किमान पादचारी पुल तरी उभारून देण्याची मागणी एका निवेदनातून केली आहे.

परिसरातील नागरिकांनी फारुक शेख यांच्या नेतृत्वात हे निवेदन पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार उन्मेश पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांच्याकडे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झाल्यावर वाहनांचा वेगदेखील वाढतो. त्यामुळे या भागात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पादचाऱ्यांना हा रस्ता ओलांडण्यासाठी किमान पादचारी पूल तरी बांधून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

अजिंठा चौक ते इच्छादेवी या दोन्ही मार्गाचे सर्व्हिसरोड त्वरित तयार करण्यात यावे, अजिंठा चौकापासून मिल्लत हायस्कूलकडे जाणाऱ्या जुन्या अंडरपासमधून जो पाण्याचा निचरा होतो तेथील तीनपैकी एका मार्गात दोनचाकी, तीनचाकी व पायी जाणाऱ्यासाठी मार्ग उपलब्ध करून द्यावा, चेंज ऑफ स्कोपमधील शिल्लक असलेल्या दोन ते तीन कोटी रुपयांच्या रकमेतून अंडर पासच्या ठिकाणी फुटओव्हर ब्रिज उभारून देण्यता यावा, अशी मागणीदेखील या निवेदनात करण्यात आली आहे.