शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भुयारी मार्ग नाही, तर किमान पादचारी पूल तरी द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यापासून सालारनगर आणि मिल्लतनगर या महामार्गांच्या दोन्ही बाजुूना राहणारे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यापासून सालारनगर आणि मिल्लतनगर या महामार्गांच्या दोन्ही बाजुूना राहणारे नागरिक सातत्याने भुयारी मार्ग करून देण्याची मागणी करत आहे. मात्र आता तांत्रिकदृष्ट्या हे शक्य नसल्याचे लक्षात आल्याने सालार नगरवासीयांनी भुयारी मार्ग नाही, तर किमान पादचारी पुल तरी उभारून देण्याची मागणी एका निवेदनातून केली आहे.

परिसरातील नागरिकांनी फारुक शेख यांच्या नेतृत्वात हे निवेदन पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार उन्मेश पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांच्याकडे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण झाल्यावर वाहनांचा वेगदेखील वाढतो. त्यामुळे या भागात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पादचाऱ्यांना हा रस्ता ओलांडण्यासाठी किमान पादचारी पूल तरी बांधून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

अजिंठा चौक ते इच्छादेवी या दोन्ही मार्गाचे सर्व्हिसरोड त्वरित तयार करण्यात यावे, अजिंठा चौकापासून मिल्लत हायस्कूलकडे जाणाऱ्या जुन्या अंडरपासमधून जो पाण्याचा निचरा होतो तेथील तीनपैकी एका मार्गात दोनचाकी, तीनचाकी व पायी जाणाऱ्यासाठी मार्ग उपलब्ध करून द्यावा, चेंज ऑफ स्कोपमधील शिल्लक असलेल्या दोन ते तीन कोटी रुपयांच्या रकमेतून अंडर पासच्या ठिकाणी फुटओव्हर ब्रिज उभारून देण्यता यावा, अशी मागणीदेखील या निवेदनात करण्यात आली आहे.