शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

प्रवासी कितीही संतापात असला तरी, गोड बोलूनच शांत करता येते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:13 IST

जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या जळगाव आगारात सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत प्रवाशांची वर्दळ सुरू असते. प्रवाशांच्या तक्रारी सोडविण्यासाठी स्थानकातील चौकशी केंद्रावर ...

जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या जळगाव आगारात सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत प्रवाशांची वर्दळ सुरू असते. प्रवाशांच्या तक्रारी सोडविण्यासाठी स्थानकातील चौकशी केंद्रावर दोन वाहतूक नियंत्रकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना आगारातून जाणाऱ्या व बाहेरगावाहून येणाऱ्या बसेसची नोंदणी करणे, वेळेनुसार बाहेरगावी बस सोडणे, प्रवाशांना बस लागल्याची माहिती ध्वनिक्षेपकाद्वारे देणे, चौकशीसाठी आलेल्या प्रवाशांना बसच्या वेळेची माहिती देणे, बाहेरगावाहून आलेल्या गाड्यांची वेळ नोंद करणे आदी कामे या कर्मचाऱ्यांना करावी लागतात.

इन्फो :

...तर काही प्रवाशांना समजावताना येते नाकीनऊ :

चौकशीसाठी येणारे काही प्रवासी नियमित प्रवास करणारे असतात, तर काही गरज पडल्यावर बसने प्रवास करणारे असतात. हे कधीकाळी बसने प्रवास करणारे प्रवासी वेळेवर गाडी लागली नाही, तर लगेच चौकशीसाठी येतात. बाहेरगावाहून बस येत असल्यामुळे रस्त्यावरील वाहतूककोंडी आणि रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे बसला १० ते १५ मिनिटे उशीर होतोच. मात्र, हे प्रवासी वेळ झाल्यावरही गाडी का लागली नाही, ती गाडी केव्हा येईल, आगार प्रशासनाचे काही नियोजन आहे का, मग दुसरी बस सोडा यासह काही प्रवासी तर मोठ्या आवाजात आमच्या कामाची पद्धतही काढतात. अशा वेळी संतप्त प्रवाशांना बसच्या विलंबाने होत असलेल्या कारणांंबाबत समजावताना नाकीनऊ येत असल्याचेही बोदवडे यांनी सांगितले.

इन्फो :

मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी वर्षातून एकदा शिबिर :

दररोज जळगाव आगारात ड्युटीच्या वेळेत दोन ते तीन हजार प्रवाशांशी संवाद साधला जातो. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रवासी भेटतात. एक मिनिटाची चौकशी असली तरी, तासभर चौकशी करतात. यामुळे कधीकधी संताप येतो, राग येतो. मात्र, तो प्रवाशांवर, कधी कुटुंबांवर काढत नाही. प्रवाशांशी गोड बोलून तक्रारींचे निवारण करण्याची सवयच झाली आहे. मात्र, आमचे मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी आगार प्रशासनातर्फे दरवर्षी पुणे येथे `चिंतामु्क्त आरोग्य शिबिर` घेण्यात येत असल्याचेही बोदवडे यांनी सांगितले.