शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

ना संचारबंदीचे पालन, ना बाजार समितीमधील गर्दीवर नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पाच महिन्यांच्या दिलास्यानंतर कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने जिल्हा प्रशासनाच्यावतीने पुन्हा विविध आदेश काढून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पाच महिन्यांच्या दिलास्यानंतर कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने जिल्हा प्रशासनाच्यावतीने पुन्हा विविध आदेश काढून वेगवेगळ्या उपाययोजना सूचविण्यात येत आहे. यात सव्वा महिन्यात २५ आदेश निघाले खरे मात्र त्यातील बहुतांश आदेशांचे पालन होत नसल्याने संसर्ग थांबत नसल्याचे चित्र आहे. यात प्रमुख बाब पाहता रात्रीचे संचारबंदीचे आदेश असताना अनेक भागात रात्रीचे फिरणे सुरूच आहे तर बाजार समितीमध्येदेखील गर्दी कायम आहे.

कोरोनाने काढले पुन्हा डोके वर

सप्टेंबर ते साधारण फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कोरोनापासूनच चांगलाच दिलासा मिळाला. मात्र याच काळात नियमांचे पालन न झाल्याने फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून संसर्ग झपाट्याने वाढत गेला. त्यामुळे गेल्या वर्षाप्रमाणे पुन्हा विविध उपाययोजनांना वेग आला आहे. सध्या उपाययोजनांसाठी आदेश काढले जात असले तरी संबंधित यंत्रणांकडून अनेक आदेशांची अंमलबजावणी होत नसल्याने तसेच नागरिकही ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करीत नसल्याने संसर्ग थांबत नसल्याचे चित्र आहे.

कडक कारवाईचा केवळ इशारा, रात्री फिरणे सुरूच

२२ फेब्रुवारी रोजी जिल्हा प्रशासनाने आदेश काढून रात्री १० ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली. मात्र रात्रीच्या वेळी अनेक भागात नागरिक बाहेर फिरतच आहे. यात जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी अनेक जण एक सोबत बाहेर पडतात. या शिवाय रात्रीच्या वेळी दुचाकीवर तसेच इतर वाहनांमधून दररोज फिरणाऱ्यांची संख्या चांगलीच असते. यात रात्रीच्या वेळी कोणी विचारणा करायलाच नसल्याने दररोज अशा प्रकारांना आळा बसत नाही. संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला, मात्र कारवाईच होत नसल्याने फिरणाऱ्यांना हे चांगलेच फावत आहे.

बाजार समितीत गर्दी कायम

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला खरेदी करताना मोठी गर्दी होते. त्यामुळे या ठिकाणी किरकोळ विक्रेत्यांना बंदी घालण्यात आली. मात्र बाजार समितीमध्ये गर्दी कायम राहत आहे. विशेष म्हणजे या ठिकाणाहून भाजीपाला खरेदी केल्यानंतर हे विक्रेते घरोघर विक्री करीत फिरत असतात. त्यामुळे संसर्गाचा अधिक धोका वाढतो.

खाटांचे नियोजन आवश्यक

रुग्णालयांमध्ये जागा आहे, मात्र मनुष्यबळ व इतर कारणांनी खाटा मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होतात. त्यामुळे खाटांचे नियोजन करण्यासाठी उपाययोजना सूचविण्यात आल्या. यात बेड मॅनेजमेंट सुरू झाले. मात्र अनेक रुग्णालय आपला मृत्यूदर वाढू नये म्हणून गंभीर रुग्णांना घेण्यास थेट नकार देतात. त्यामुळे अशा रुग्णालयांवर कारवाई होत नाही व गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढून मृत्यूही वाढत आहे. या शिवाय लक्षणे नसलेले, सौम्य लक्षणे असलेले व इतर रुग्णांच्या नियोजनाचे आदेश देण्यात आले. मात्र रुग्णालयांकडून त्याचे पालन होत नसल्याने गंभीर रुग्ण वाऱ्यावर असल्याचा आरोप नातेवाईकांकडून होतो.

कॉलन्यांमध्ये आठवडे बाजार, निदर्शने, रॅली सुरूच

संसर्ग थांबविण्यासाठी जिल्हाभरातील आठवडे बाजार ठे‌वण्याचे तसेच मोर्चे, रॅली काढण्यास निदर्शने करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र बुधवारी असणारा पिंप्राळा येथील आठवडे बाजार असो की इतर ठिकाणचा बाजार काॅलनी भागात भरतो. या शिवाय राजकीय पक्षांकडून निदर्शने, रॅली सुरूच आहे.