नंदुरबार : जनगणनेसारखे राष्ट्रीय कार्य करण्यास शिक्षकांनी नकार दिला असून, नकार देणा:या शिक्षकांना पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. तथापि, शिक्षक संघटनेने न्यायालयाने शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये, असे म्हटले असताना प्रशासनातर्फे दबाव आणला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सन 2010-11 मध्ये जनगणनेचे काम झाल्यानंतर देशातील लोकसंख्या जाहीर करण्यात आली. दर 10 वर्षानी देशभरात लोकसंख्येचे अद्ययावतीकरण करण्यात येते. तथापि, पहिल्यांदाच पाच वर्षानी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीविषयक माहिती अद्ययावत करण्यात येत आहे. यासाठी राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर (कुटुंब पत्रक)मध्ये विविध प्रकारची माहिती भरून घ्यायची असते. यात नमुन्याच्या एका बाजूला व्यक्तीचे नाव, पत्ता, कुटुंबप्रमुखाशी नाते, जन्मतारीख, स्त्री-पुरुष, वैवाहिक स्थिती, शैक्षणिक योग्यता, त्यांचा व्यवसाय, तर नमुन्याच्या दुस:या बाजूला व्यक्तीच्या नावासोबतच जन्म ठिकाण, राष्ट्रीयत्व, सध्याचा निवासाचा पत्ता, कधीपासून राहात आहात, कायमस्वरूपी पत्ता इत्यादी माहिती भरून घ्यावयाची आहे. शहरी हद्दीत पालिकेच्या अखत्यारित ही कामे करण्यात येत आहेत. शहरातील नागरिकांकडून ही माहिती भरून घेण्यासाठी पालिकेने प्राथमिक शिक्षकांना या कामाविषयी सूचित केले. परंतु शिक्षकांनी जनगणनेचे हे काम करण्यास स्पष्ट नकार दिला. जनगणनेचे काम करण्यास नकार देणा:या अशा शहरातील 35 शिक्षकांना पालिकेने भा.दं.वि. कलम 129, 127 प्रमाणे शासन तरतुदीनुसार नोटिसा बजावल्या आहेत. जनगणनेचे काम न केल्यास कारवाईचा इशारा दिला. या नोटिसा दिल्यानंतर शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. शिक्षकांनी शिक्षक संघटनांशी संपर्क साधल्यावर संघटनांची धावपळ उडाली. संघटनांनी पालिका प्रशासनाशी संपर्क साधला. खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर संघटनेच्या म्हणण्यानुसार, मुंबई उच्च न्यायालयाने 10 ऑक्टोबर रोजी दिलेल्या निर्णयानुसार अशैक्षणिक कामांसाठी शिक्षकांवर जबरदस्ती करण्यात येऊ नये. दरम्यान, शहरात जनगणनेचे कार्य करण्यासाठी पालिकेने 172 गट नियुक्त केले आहेत. शिक्षकांनी प्रगणकाचे काम करण्यास नकार दिल्यानंतर पालिकेचे 55 कर्मचारी हे काम करीत आहेत. पर्यायी व्यवस्था म्हणून अंगणवाडी सेविकांचीही नियुक्ती केली आहे. पाच वर्षानंतर पहिल्यांदाच 4जनगणनेचे राष्ट्रीय कार्य साधारणपणे दर 10 वर्षानी करण्यात येते. परंतु यंदा प्रथमच पाच वर्षानी जनगणनेचे अद्ययावतीकरण करण्यात येत आहे. 4या जनगणनेत केवळ कुटुंबांचीच माहिती प्रगणक गोळा करणार आहेत. या वेळी संस्था पूर्णपणे वगळण्यात आल्या आहेत. 4माहिती गोळा करण्यासाठी अर्जाचा एक नमुना देण्यात आला आहे. त्याच्या दोन्ही बाजूने विविध अंगांनी माहिती प्रगणकांना भरावी लागणार आहे. 4येत्या 10 नोव्हेंबर्पयत ही माहिती प्रगणकांना शहरवासीयांकडून भरून घ्यावी लागणार आहे. जनगणनेचे काम शिक्षकांनी नाकारल्यानंतर पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या पालिकेच्या कर्मचा:यांसोबतच अंगणवाडी सेविकाही हे कार्य करीत आहेत. -गणेश गिरी, मुख्याधिकारी, नगरपालिका, नंदुरबार शिक्षकांना अशैक्षणिक कामांसाठी जबरदस्ती करू नये, असे न्यायालयाचे आदेश आहेत. आम्ही संघटनेच्या वतीने मुख्याधिका:यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. -रूपेश चौधरी, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ, नंदुरबार पाच वर्षानंतर पहिल्यांदाच 4जनगणनेचे राष्ट्रीय कार्य साधारणपणे दर 10 वर्षानी करण्यात येते. परंतु यंदा प्रथमच पाच वर्षानी जनगणनेचे अद्ययावतीकरण करण्यात येत आहे. 4या जनगणनेत केवळ कुटुंबांचीच माहिती प्रगणक गोळा करणार आहेत. या वेळी संस्था पूर्णपणे वगळण्यात आल्या आहेत. 4माहिती गोळा करण्यासाठी अर्जाचा एक नमुना देण्यात आला आहे. त्याच्या दोन्ही बाजूने विविध अंगांनी माहिती प्रगणकांना भरावी लागणार आहे. 4येत्या 10 नोव्हेंबर्पयत ही माहिती प्रगणकांना शहरवासीयांकडून भरून घ्यावी लागणार आहे.
जनगणनेस शिक्षकांची ‘ना’
By admin | Updated: October 28, 2015 00:08 IST