शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
2
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
3
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
4
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
5
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
6
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
8
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
9
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
10
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
11
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
12
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
13
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
14
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
15
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
16
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
17
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
18
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
19
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
20
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO

शिवाजीनगर उड्डाणपुलाबाबत मनपा रेल्वेला देणार प्रस्ताव

By admin | Updated: April 20, 2017 01:18 IST

रेल्वे उड्डाणपुलाचे काम रेल्वे व राज्य शासनाने निम्मा-निम्मा खर्च उचलून करण्यास मुख्यमंत्र्यांनी व रेल्वेमंत्र्यांनी मंगळवारी मंजुरी दिली.

जळगाव : १०४ वर्ष जुन्या ब्रिटीशकालीन रेल्वे उड्डाणपुलाचे काम रेल्वे व राज्य शासनाने निम्मा-निम्मा खर्च उचलून करण्यास मुख्यमंत्र्यांनी व रेल्वेमंत्र्यांनी मंगळवारी मंजुरी दिली. त्यामुळे या कामाला गती येणार असून या पुलाचे डिझाईन कसे असावे? यासाठी मनपाचे मत विचारात घेतले जाणार असल्याने मनपाकडून प्रस्ताव तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी सकाळी आयुक्त जीवन सोनवणे यांनी अधिकाºयांसह शिवाजीनगर उड्डाणपूल परिसरात भेट देऊन पाहणी केली. ममुराबाद रस्त्याला पुलाचा रस्ता जोडण्याचा प्रस्ताव देणारमनपाने २०१२ मध्ये या पुलाच्या नकाशांना रेल्वेकडून मंजुरी मिळविली होती. त्यात सध्या अस्तित्वात असलेल्या  डाव्या हाताने शिवाजीनगर, दूध संघाकडे जाणाºया रस्त्यासोबतच समोर थेट खाली शिवाजीनगरात आणखी एक रस्ता उतरविण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र त्यापेक्षा डाव्या हाताला जाणाºया रस्तासोबतच उजव्या बाजूने थेट ममुराबाद रस्त्याला पुलाचा रस्ता जोडण्याचे प्रस्तावित करण्यात येणार आहे. ख्रिश्चन धर्मियांची दफनभूमी या ठिकाणी असल्याने त्यांच्याशी चर्चा करून केवळ तीन पिलर टाकण्यासाठी जागा मागितली जाणार आहे. या पाहणीप्रसंगी नगररचना सहायक संचालक के.पी. बागुल, शहर अभियंता दिलीप थोरात आदी उपस्थित होते....तर शासनाची व रेल्वेची बदनामी होईलमनपाची आर्थिक स्थिती बिकट असल्याने अनेक वर्षांपासून शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचा विषय रखडला होता. रेल्वेने हा पूल धोकादायक झालेला असल्याने तो कोसळून जिवीत हानी होण्याची भिती असल्याने त्वरित नवीन उड्डाण पूल बांधण्याचे अथवा त्यावरील वाहतूक बंद करण्याचे पत्र मनपाला दिले होते. मनपाने त्यानुसार अवजड वाहतूक बंदही केली. मात्र तरीही हा पूल कोसळून रेल्वेवर पडल्यास जिवीत हानी होण्याची भिती कायम होती. त्यामुळे रेल्वेनेच राज्य शासनाच्या नगरविकास विभागाला पत्र लिहून शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूलाची स्थिती धोकादायक आहे. सर्वंकष विचार करून या पुलासाठी निधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. जर काही अनुचित घडले तर रेल्वे व शासनावरच टीका होऊन प्रतिमा खराब होईल, असे पत्र दिले                   होते. मनपाने देखील राज्य शासनाला रेल्वे मंत्री तसेच मुख्यमंत्री यांच्या बैठकीच्या पाश्वभूमीवर पाठविलेल्या अहवालात हे पत्र जोडून त्यातील हा मुद्दा ठळक करून पाठविला होता. त्यामुळेही शासनाने याबाबत सकारात्मक भूमिका दाखविल्याचे मानले जात आहे.