शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
2
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
3
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
4
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
5
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
6
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
7
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
8
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
9
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
10
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
11
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
12
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
13
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
14
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
15
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
16
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
17
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
18
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
19
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
20
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 

शिवाजीनगर उड्डाणपुलाबाबत मनपा रेल्वेला देणार प्रस्ताव

By admin | Updated: April 20, 2017 01:18 IST

रेल्वे उड्डाणपुलाचे काम रेल्वे व राज्य शासनाने निम्मा-निम्मा खर्च उचलून करण्यास मुख्यमंत्र्यांनी व रेल्वेमंत्र्यांनी मंगळवारी मंजुरी दिली.

जळगाव : १०४ वर्ष जुन्या ब्रिटीशकालीन रेल्वे उड्डाणपुलाचे काम रेल्वे व राज्य शासनाने निम्मा-निम्मा खर्च उचलून करण्यास मुख्यमंत्र्यांनी व रेल्वेमंत्र्यांनी मंगळवारी मंजुरी दिली. त्यामुळे या कामाला गती येणार असून या पुलाचे डिझाईन कसे असावे? यासाठी मनपाचे मत विचारात घेतले जाणार असल्याने मनपाकडून प्रस्ताव तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी सकाळी आयुक्त जीवन सोनवणे यांनी अधिकाºयांसह शिवाजीनगर उड्डाणपूल परिसरात भेट देऊन पाहणी केली. ममुराबाद रस्त्याला पुलाचा रस्ता जोडण्याचा प्रस्ताव देणारमनपाने २०१२ मध्ये या पुलाच्या नकाशांना रेल्वेकडून मंजुरी मिळविली होती. त्यात सध्या अस्तित्वात असलेल्या  डाव्या हाताने शिवाजीनगर, दूध संघाकडे जाणाºया रस्त्यासोबतच समोर थेट खाली शिवाजीनगरात आणखी एक रस्ता उतरविण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र त्यापेक्षा डाव्या हाताला जाणाºया रस्तासोबतच उजव्या बाजूने थेट ममुराबाद रस्त्याला पुलाचा रस्ता जोडण्याचे प्रस्तावित करण्यात येणार आहे. ख्रिश्चन धर्मियांची दफनभूमी या ठिकाणी असल्याने त्यांच्याशी चर्चा करून केवळ तीन पिलर टाकण्यासाठी जागा मागितली जाणार आहे. या पाहणीप्रसंगी नगररचना सहायक संचालक के.पी. बागुल, शहर अभियंता दिलीप थोरात आदी उपस्थित होते....तर शासनाची व रेल्वेची बदनामी होईलमनपाची आर्थिक स्थिती बिकट असल्याने अनेक वर्षांपासून शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचा विषय रखडला होता. रेल्वेने हा पूल धोकादायक झालेला असल्याने तो कोसळून जिवीत हानी होण्याची भिती असल्याने त्वरित नवीन उड्डाण पूल बांधण्याचे अथवा त्यावरील वाहतूक बंद करण्याचे पत्र मनपाला दिले होते. मनपाने त्यानुसार अवजड वाहतूक बंदही केली. मात्र तरीही हा पूल कोसळून रेल्वेवर पडल्यास जिवीत हानी होण्याची भिती कायम होती. त्यामुळे रेल्वेनेच राज्य शासनाच्या नगरविकास विभागाला पत्र लिहून शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूलाची स्थिती धोकादायक आहे. सर्वंकष विचार करून या पुलासाठी निधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. जर काही अनुचित घडले तर रेल्वे व शासनावरच टीका होऊन प्रतिमा खराब होईल, असे पत्र दिले                   होते. मनपाने देखील राज्य शासनाला रेल्वे मंत्री तसेच मुख्यमंत्री यांच्या बैठकीच्या पाश्वभूमीवर पाठविलेल्या अहवालात हे पत्र जोडून त्यातील हा मुद्दा ठळक करून पाठविला होता. त्यामुळेही शासनाने याबाबत सकारात्मक भूमिका दाखविल्याचे मानले जात आहे.