शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
6
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
7
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
8
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
9
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
10
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
11
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
12
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
13
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
14
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
15
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
16
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
17
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
18
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
19
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
20
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)

वार्तापत्र क्राईम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:42 IST

तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला पोटचा गोळा अचानक सोडून गेल्यानंतर त्या मातेची काय अवस्था होते हे फक्त ती माताच सांगू शकते...एखादी ...

तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला पोटचा गोळा अचानक सोडून गेल्यानंतर त्या मातेची काय अवस्था होते हे फक्त ती माताच सांगू शकते...एखादी अल्पवयीन मुलगी गायब झाली असेल तर तिच्याबाबतीत अनुचित प्रकार घडला तर काय अवस्था होते, याचे महत्व मातेप्रमाणे खाकीच सांगू शकते. अशाच तीन नाजूक प्रकरणात मातांच्या ह्दयाची सुरु असलेली धगधग पाहता खाकीलाही माणुसकीचा पाझर फुटला अन‌् या मातापित्यांच्या जीव भांड्यात टाकण्याचे कार्य स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी केले आहे. गेल्या १९ महिन्यापासून जन्मदातीला सोडून पलायन केलेल्या तरुणीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी जळगाव शहरातून ताब्यात घेतले. इतकेच काय पालकत्वाची भूमिका निभावून तिचे समुपदेशन केले. नागपूर येथून घ्यायला आलेला मामा भाचीला पाहून ढसाढसा रडला. बहिणीचे कुंकू आधीच पुसले गेले आहे, त्यात पोटचा गोळा १९ महिन्यापासून गायब झाल्याने तिची अवस्था म्हणजे मरणासन्न झालेली असताना जळगाव पोलिसांनी या मुलीला तिच्या मामांच्या स्वाधीन केले. मुलीच्या आईला आनंदाची वार्ता कळविली. पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, शरद भालेराव व नरेंद्र वारुळे या तिघांना भावनिक साद घालून मामाने जळगाव पोलीस दलाचे आभार मानायला शब्दच नसल्याचे सांगितले. हा प्रसंग म्हणजे चित्रपटात शोभेल असाच होता. याआधी देखील दोन तरुणांनी पळवून नेलेल्या बोदवडच्या अल्पवयीन मुलीला पोलिसांनी शोधून काढले व इंदूर येथून तिला ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन केले. अवघ्या १२ वर्षाची मुलगी असल्याने या प्रकरणात जन्मदात्यांसह पोलीसही चिंतेत पडले होते. डोळ्यासमोर बोरखेड्याचे चित्र असल्याने पोलिसांची धाकधूक वाढली होती. खुद्द पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनीच या प्रकरणात लक्ष घातले. मुलगी सुखरुप मिळाल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. याआधी देखील चाळीसगाव तालुक्यातील अशाच प्रकरणात पोलिसांनी संयमाने प्रकरण हाताळून पुण्यातून मुलीला ताब्यात घेऊन पालकांसमोर आणले. संवेदनशील प्रकरणे पोलिसांनी गांभीर्याने घेऊन हाताळले. खून, चोऱ्या, घरफोड्या यापेक्षाही भावनिक प्रश्न महत्वाचे असून त्यांना खाकीने स्पर्श करुन खाकीतील माणुसकीचे दर्शन घडविले. हे मोजक्या प्रकरणात झालेले असले तरी जिल्ह्यात असे खूप प्रकरणे आहेत, त्यात त्या-त्या अमलदारांनी गांभीर्यपूर्वक लक्ष घातले तर नक्कीच पोलिसांविषयी समाजात वेगळे चित्र निर्माण होईल.