शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
2
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
3
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
4
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
5
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
6
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
7
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
8
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
9
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
10
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
11
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
12
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
13
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
14
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?
15
दिल्ली नाही, टार्गेटवर होते अयोध्या-काशी; चौकशीत नवीन धक्कादायक माहिती समोर आली
16
Delhi Blast: शाहीन शाहीदचा महाराष्ट्रातील डॉ. हयात जफर सोबत घटस्फोट का झालेला, कोणत्या मुद्द्यावरून बिनसलेलं?
17
शेख हसीना बांगलादेशला परतण्यास तयार, परतीसाठीच्या अटी सांगितल्या; मोहम्मद युनूस यांच्यावर केली टीका
18
PM Modi: भूतानहून परतताच मोदींनी एलएनजेपी रुग्णालय गाठलं, दिल्ली बॉम्बस्फोटातील जखमींना भेटले!
19
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी अमोनियम नायट्रेटसह 'दुसरे शक्तिशाली' स्फोटक आढळले
20
पार्सल, मनी ऑर्डर, इन्शुरन्स प्रीमिअम : सर्व कामं एका क्लिकवर; पोस्ट ऑफिसची नवी 'सेवा' 

जलप्रबोधन व जलव्यवस्थापनासाठी नवी चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 22:00 IST

भूजल अभियानांतर्गत ‘मिशन ५०० कोटी लीटर’ स्पर्धेची सुरुवात। चाळीसगाव तालुक्यात ६० गावांचा समावेश

संजय सोनार ।चाळीसगाव : तालुक्यात जलव्यवस्थापन व प्रबोधनासाठी चळवळ उभी राहिली आहे. पाणी फाऊंडेशनने सुरू केलेल्या समृद्ध गाव योजनेत समाविष्ट असलेल्या ४० तालुक्यांमध्ये चाळीसगावचा समावेश आहे. जलमित्र परिवारातर्फे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून गावे जलसमृद्ध करण्याचा प्रयत्न सुरू असून त्यास ग्रामीण भागातून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे.गेल्या वर्षी जलसंधारणाची कामे तालुक्यात अनेक गावांमध्ये झाल्याने जागरूकता निर्माण झाली. चांगल्या प्रमाणात जलसाठा झाला. त्यामुळे भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यास मदत झाली. गेल्या वर्र्षीच्या स्पर्धेनंतर तालुका व गावागावातील जलमित्र, जलदूत व जलयोद्धे तयार झाले.डॉ.चव्हाण व गुणवंत सोनवणे यांनी आमदार मंगेश चव्हाण यांची भेट घेत या कामाबद्दल माहिती दिली व मदतीचे आवाहन केले. यातून शिवनेरी फाऊंडेशन संचलित भूजल अभियान अंतर्गत ‘मिशन ५०० कोटी लिटर’ स्पर्धेची तालुक्यात सुरुवात झाली.डॉ.उज्वलकुमार चव्हाण यांच्या माध्यमातून जलमित्र परिवारातर्फे व ‘पाच पाटील’ यांच्या माध्यमातून प्रत्येक पाच पाटलांनी पाच गावांची पाण्यासाठी जबाबदारी घेणे अशी संकल्पना मांडून ‘मिशन ५०० कोटी लिटर’ची संकल्पना त्यांनी मांडली. त्या दिशेने प्रत्येक १५ दिवसांनंतर पाच पाटलांचे चर्चासत्र आयोजित करून ते मार्गदर्शन करतात. प्रत्येक पाच पाटलांमार्फत एक या गावाची जबाबदारी घेणारा गावप्रमुख गावात नाला खोलीकरणाचे काम करण्यासाठी ३० शेतकरी तयार करील. अशा शेतकऱ्यांकडून डिझेल खर्च घेतला जाईल. या माध्यमातून गावात पोकलेन मशीनद्वारे नाला खोलीकरणासारखी कामे करण्यात येतील. डॉ.चव्हाण हे तालुक्यात साधारण ३ वर्षापासून पाणी या विषयावर ते काम करत असून त्यांनी आतापर्यंत धामणगाव, रांजणगाव, शीदवाडी, कळमडू, कुंझर येथे जलसंधरणाचे उपक्रमम राबवले आहेत.३० गावांमध्ये जलप्रबोधनगुणवंत सोनवणे यांच्या ‘समुत्कर्ष परिवारा’मार्फत मेहुणबारे परिसरातील ३० गावांमध्ये जलप्रबोधनाचे काम सुरू आहे. प्रत्येक गावाचे डिजिटल जल आराखडे तयार करण्यासाठी गावातून १ जलदूत तयार करणे, गाव पाण्यासाठी स्वावलंबी करून गावात पाण्याचे संवर्धन व वितरण करणे हा यामागचा उद्देश आहे.१५ फेब्रुवारीपासून प्रशिक्षणभूजल अभियानाची पाण्यावर पूर्ण वेळ काम करणारी १० सदस्यांची टीम आहे. त्यांच्या मार्फत ११ पोकलेन उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सध्या या स्पर्धेत ६० गावांचा समावेश केला असून या गावांचे २ दिवसीय निवासी प्रशिक्षण आभोने तांडा येथे १५ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. तरी या प्रशिक्षणाचा लाभ आपल्या गावातील ३ ते ५ सदस्यांनी घ्यावा, तसेच याबाबत माहितीसाठी विजय कोळी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.