शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

जलप्रबोधन व जलव्यवस्थापनासाठी नवी चळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 22:00 IST

भूजल अभियानांतर्गत ‘मिशन ५०० कोटी लीटर’ स्पर्धेची सुरुवात। चाळीसगाव तालुक्यात ६० गावांचा समावेश

संजय सोनार ।चाळीसगाव : तालुक्यात जलव्यवस्थापन व प्रबोधनासाठी चळवळ उभी राहिली आहे. पाणी फाऊंडेशनने सुरू केलेल्या समृद्ध गाव योजनेत समाविष्ट असलेल्या ४० तालुक्यांमध्ये चाळीसगावचा समावेश आहे. जलमित्र परिवारातर्फे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून गावे जलसमृद्ध करण्याचा प्रयत्न सुरू असून त्यास ग्रामीण भागातून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे.गेल्या वर्षी जलसंधारणाची कामे तालुक्यात अनेक गावांमध्ये झाल्याने जागरूकता निर्माण झाली. चांगल्या प्रमाणात जलसाठा झाला. त्यामुळे भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यास मदत झाली. गेल्या वर्र्षीच्या स्पर्धेनंतर तालुका व गावागावातील जलमित्र, जलदूत व जलयोद्धे तयार झाले.डॉ.चव्हाण व गुणवंत सोनवणे यांनी आमदार मंगेश चव्हाण यांची भेट घेत या कामाबद्दल माहिती दिली व मदतीचे आवाहन केले. यातून शिवनेरी फाऊंडेशन संचलित भूजल अभियान अंतर्गत ‘मिशन ५०० कोटी लिटर’ स्पर्धेची तालुक्यात सुरुवात झाली.डॉ.उज्वलकुमार चव्हाण यांच्या माध्यमातून जलमित्र परिवारातर्फे व ‘पाच पाटील’ यांच्या माध्यमातून प्रत्येक पाच पाटलांनी पाच गावांची पाण्यासाठी जबाबदारी घेणे अशी संकल्पना मांडून ‘मिशन ५०० कोटी लिटर’ची संकल्पना त्यांनी मांडली. त्या दिशेने प्रत्येक १५ दिवसांनंतर पाच पाटलांचे चर्चासत्र आयोजित करून ते मार्गदर्शन करतात. प्रत्येक पाच पाटलांमार्फत एक या गावाची जबाबदारी घेणारा गावप्रमुख गावात नाला खोलीकरणाचे काम करण्यासाठी ३० शेतकरी तयार करील. अशा शेतकऱ्यांकडून डिझेल खर्च घेतला जाईल. या माध्यमातून गावात पोकलेन मशीनद्वारे नाला खोलीकरणासारखी कामे करण्यात येतील. डॉ.चव्हाण हे तालुक्यात साधारण ३ वर्षापासून पाणी या विषयावर ते काम करत असून त्यांनी आतापर्यंत धामणगाव, रांजणगाव, शीदवाडी, कळमडू, कुंझर येथे जलसंधरणाचे उपक्रमम राबवले आहेत.३० गावांमध्ये जलप्रबोधनगुणवंत सोनवणे यांच्या ‘समुत्कर्ष परिवारा’मार्फत मेहुणबारे परिसरातील ३० गावांमध्ये जलप्रबोधनाचे काम सुरू आहे. प्रत्येक गावाचे डिजिटल जल आराखडे तयार करण्यासाठी गावातून १ जलदूत तयार करणे, गाव पाण्यासाठी स्वावलंबी करून गावात पाण्याचे संवर्धन व वितरण करणे हा यामागचा उद्देश आहे.१५ फेब्रुवारीपासून प्रशिक्षणभूजल अभियानाची पाण्यावर पूर्ण वेळ काम करणारी १० सदस्यांची टीम आहे. त्यांच्या मार्फत ११ पोकलेन उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सध्या या स्पर्धेत ६० गावांचा समावेश केला असून या गावांचे २ दिवसीय निवासी प्रशिक्षण आभोने तांडा येथे १५ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. तरी या प्रशिक्षणाचा लाभ आपल्या गावातील ३ ते ५ सदस्यांनी घ्यावा, तसेच याबाबत माहितीसाठी विजय कोळी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.