शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
2
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
3
रेल्वे रुळावर बाईक पेटवली, रीलच्या नादात जीवघेणी स्टंटबाजी तरुणाला महागात पडली!
4
अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय; आता हवे तेवढे टेरिफ लावू शकतात...
5
Sonam Raghuvanshi : "सोनमकडे २ फोन होते, सतत चॅटिंगमध्ये बिझी असायची"; राजाच्या वहिनीचा धक्कादायक खुलासा
6
शस्त्र परवाना मिळवण्यासाठी सादर केलेला भाडे करार खोटा; शशांकला १४ जूनपर्यंत पोलीस कोठडी
7
BLOG: ‘बुलेट’ येईलच हो, पण आधी लोकल ‘ट्रॅक’वर आणा! इतके जीव जातात, तरी काहीच कसं वाटत नाही?
8
'सिद्धू मुसेवालाची हत्या करण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता'; गोल्डी ब्रारने सांगितले हत्या करण्याचे कारण
9
WTC Final : रबाडाच्या भेदक माऱ्यानंतर चर्चेत आला बुमराह; जाणून घ्या त्यामागचं कारण
10
रेल्वेनं तिकीट बुकिंगचा नियम बदलला, आता आधारशिवाय बुक होणार नाही तत्काळ तिकीट; १ जुलैपासून लागू होणार नियम
11
सोनमच्या ‘बेवफाई’चा मेघालयला आर्थिक फटका, राजाच्या हत्येनंतर अनेकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
हमराज मुव्हीची स्टोरी अन् शिलाँगला निघण्यापूर्वी राजाचे व स्वत:चे केलेले वजन; राजाच्या भावाचा सोनमबाबत मोठा दावा
13
३ राज्यातील ७ जिल्ह्यांना मोदी सरकारचं गिफ्ट; ६४०० कोटींच्या रेल्वे प्रकल्पांना मान्यता
14
इंडिया आघाडीला धक्का; बिहार निवडणुकीत AAP ची स्वबळाची घोषणा, सर्व जागांवर लढणार
15
शुभांशू शुक्ला अंतराळात घेऊन जाणार होते आमरस अन् शिरा! पण हे पदार्थ खराब नाही होणार का? जाणून घ्या
16
RCB टीम खरेदी करणार का? डीके शिवकुमार यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, "मी रॉयल चॅलेंजर पीत नाही..."
17
Trigrahi Yoga 2025: १५ जून रोजी त्रिग्रही योगात पाच राशींना आर्थिक लाभ तसेच पदोन्नतीची संधी!
18
सुधाकर बडगुजरांची कोंडी! CM फडणवीसांसमोर भाजप आमदार, माजी नगरसेवकांनी मांडली गुन्ह्यांची कुंडली
19
तुम्हालाही याचा त्रास होणार..; लादेनचा उल्लेख करत जयशंकर यांनी पाश्चिमात्य देशांना फटकारले
20
हे आहेत सर्वाधिक हिंदू लोकसंख्या असलेले टॉप १० देश, ५ मुस्लीम बहुल देशांचाही समावेश; आफ्रिकेतील हिंदू लोकसंख्येनं चकित केलं 

मतपत्रिकेवर मतदान टाळण्यासाठी नवीन ईव्हीएम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 12:43 IST

एका मतदार संघात उभे राहू शकणार ३८४ उमेदवार

सुशील देवकर जळगाव : देशभरात ईव्हीएमवरील मतदान घेण्यास विरोधकांकडून विरोध होत असतानाच अधिक उमेदवार उभे करून मतपत्रिकेवर मतदान घेण्यास भाग पाडण्याची हालचाल काही उमेदवारांनी सुरू केली होती. मात्र शासनाने अत्याधुनिक ईव्हीएमचा वापर सुरू केला असून त्यामुळे एका मतदार संघात ३८४ उमेदवार उभे राहिले तरी ईव्हीएमवर मतदान घेणे शक्य होणार आहे. त्यामुळे ईव्हीएमविरोधातील हालचालींना खीळ बसली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.लोकसभा निवडणुकीत राज्यात अनेक ठिकाणी ६४ उमेदवार क्षमतेचे ईव्हीएम वापरले गेले होते. मात्र विधानसभेला सर्वच ठिकाणी अत्याधुनिक एम-३ ईव्हीएम वापरण्यावर भर जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानात घोळ होत असल्याचा विषय देशपातळीवर चर्चिला जात आहे. त्यासाठी काही मतदार संघांमधील विजयी व पराभूत उमेदवारांच्या मतांमधील फरकाचे आकडे देखील सारखे असल्याचे उदाहरणे दिली जात आहेत. निवडणूक आयोगाने हे सर्व आरोप फेटाळत मतपत्रिकांवर निवडणूक घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे विरोधकांकडून मतपत्रिकेवर निवडणूक व्हावी यासाठी वेगळीच शक्कल लढविली जात आहे.माजी आमदार अनिल गोटे यांनी ईव्हीएमला आव्हान देत मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी एकाच मतदारसंघातून थेट ३८५ उमेदवार रिंगणात उतरविण्याची तयारी चालविली आहे. त्यांची यादी देखील तयार असल्याचे समजते.३८५ उमेदवार उभे करण्याची तयारीएका ईव्हीएम मशिनवर १६ उमेदवारांसाठी मतदान होऊ शकते. त्यात उमेदवार वाढल्यास त्यास आणखी ३ मशिन जोडता येत होती. म्हणजे चार मशिन जोडून ६४ उमेदवारांसाठी ईव्हीएमद्वारेच मतदान घेणे शक्य होते. २०१४च्या निवडणुकीत ही ६४ उमेदवारांसाठी मतदान घेण्याची क्षमता असलेले ‘एम-२’ग्रेडची यंत्रच वापरण्यात आली होती. मात्र त्यावेळी या मतदानयंत्रांबाबत राजकारण्यांमध्ये फारशी सजगता नव्हती. मात्र जेव्हा ईव्हीएमला विरोध सुरू झाला तेव्हा ६५ उमेदवार उभे करून मतपत्रिकेवर मतदान घेणे भाग पाडले जाऊ शकते, हे लक्षात आल्याने ही मर्यादा ३८४ उमेदवारांपर्यंत वाढवलेले ‘एम-३’ दर्जाचे आधुनिक ईव्हीएम गत लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आले. मात्र ही संख्या पुरेशी नसल्याने सोलापूरसह अनेक जिल्ह्यात जुनी एम-२ दर्जाची ईव्हीएम वापरण्यात आली. आता विधानसभा निवडणुकीसाठी देशभरातून अत्याधुनिक ईव्हीएम आणून त्याद्वारेच मतदान घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे २४ ईव्हीएम जोडले जाऊ शकतात. त्यामुळे ईव्हीएम विरोधकांना एका मतदारसंघात ३८५ उमेदवार उभे करावे लागणार आहेत.ईव्हीएमची क्षमता ३८४ उमेदवारांची असून ३८५ उमेदवार उभे केल्यास मतपत्रिकेवर मतदान होऊ शकते. त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. -अनिल गोटे,माजी आमदार, धुळे.पूर्वी १६ उमेदवार क्षमतेचे ४ मशिन जोडून एका मतदार संघात ६४ उमेदवारांसाठी ईव्हीएमद्वारे मतदान घेतले जाऊ शकत होते. मात्र आधुनिक एम-३ प्रकारच्या ईव्हीएममध्ये २४ मशिन जोडून ३८४ उमेदवारांसाठी मतदान घेणे शक्य आहे. मतपत्रिका असो अथवा ईव्हीएम प्रशासनाला निवडणूक आयोगाच्या आदेशानुसारच निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.-डॉ.अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव