शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

मतपत्रिकेवर मतदान टाळण्यासाठी नवीन ईव्हीएम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 12:43 IST

एका मतदार संघात उभे राहू शकणार ३८४ उमेदवार

सुशील देवकर जळगाव : देशभरात ईव्हीएमवरील मतदान घेण्यास विरोधकांकडून विरोध होत असतानाच अधिक उमेदवार उभे करून मतपत्रिकेवर मतदान घेण्यास भाग पाडण्याची हालचाल काही उमेदवारांनी सुरू केली होती. मात्र शासनाने अत्याधुनिक ईव्हीएमचा वापर सुरू केला असून त्यामुळे एका मतदार संघात ३८४ उमेदवार उभे राहिले तरी ईव्हीएमवर मतदान घेणे शक्य होणार आहे. त्यामुळे ईव्हीएमविरोधातील हालचालींना खीळ बसली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.लोकसभा निवडणुकीत राज्यात अनेक ठिकाणी ६४ उमेदवार क्षमतेचे ईव्हीएम वापरले गेले होते. मात्र विधानसभेला सर्वच ठिकाणी अत्याधुनिक एम-३ ईव्हीएम वापरण्यावर भर जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.ईव्हीएमद्वारे झालेल्या मतदानात घोळ होत असल्याचा विषय देशपातळीवर चर्चिला जात आहे. त्यासाठी काही मतदार संघांमधील विजयी व पराभूत उमेदवारांच्या मतांमधील फरकाचे आकडे देखील सारखे असल्याचे उदाहरणे दिली जात आहेत. निवडणूक आयोगाने हे सर्व आरोप फेटाळत मतपत्रिकांवर निवडणूक घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे विरोधकांकडून मतपत्रिकेवर निवडणूक व्हावी यासाठी वेगळीच शक्कल लढविली जात आहे.माजी आमदार अनिल गोटे यांनी ईव्हीएमला आव्हान देत मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी एकाच मतदारसंघातून थेट ३८५ उमेदवार रिंगणात उतरविण्याची तयारी चालविली आहे. त्यांची यादी देखील तयार असल्याचे समजते.३८५ उमेदवार उभे करण्याची तयारीएका ईव्हीएम मशिनवर १६ उमेदवारांसाठी मतदान होऊ शकते. त्यात उमेदवार वाढल्यास त्यास आणखी ३ मशिन जोडता येत होती. म्हणजे चार मशिन जोडून ६४ उमेदवारांसाठी ईव्हीएमद्वारेच मतदान घेणे शक्य होते. २०१४च्या निवडणुकीत ही ६४ उमेदवारांसाठी मतदान घेण्याची क्षमता असलेले ‘एम-२’ग्रेडची यंत्रच वापरण्यात आली होती. मात्र त्यावेळी या मतदानयंत्रांबाबत राजकारण्यांमध्ये फारशी सजगता नव्हती. मात्र जेव्हा ईव्हीएमला विरोध सुरू झाला तेव्हा ६५ उमेदवार उभे करून मतपत्रिकेवर मतदान घेणे भाग पाडले जाऊ शकते, हे लक्षात आल्याने ही मर्यादा ३८४ उमेदवारांपर्यंत वाढवलेले ‘एम-३’ दर्जाचे आधुनिक ईव्हीएम गत लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आले. मात्र ही संख्या पुरेशी नसल्याने सोलापूरसह अनेक जिल्ह्यात जुनी एम-२ दर्जाची ईव्हीएम वापरण्यात आली. आता विधानसभा निवडणुकीसाठी देशभरातून अत्याधुनिक ईव्हीएम आणून त्याद्वारेच मतदान घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे २४ ईव्हीएम जोडले जाऊ शकतात. त्यामुळे ईव्हीएम विरोधकांना एका मतदारसंघात ३८५ उमेदवार उभे करावे लागणार आहेत.ईव्हीएमची क्षमता ३८४ उमेदवारांची असून ३८५ उमेदवार उभे केल्यास मतपत्रिकेवर मतदान होऊ शकते. त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. -अनिल गोटे,माजी आमदार, धुळे.पूर्वी १६ उमेदवार क्षमतेचे ४ मशिन जोडून एका मतदार संघात ६४ उमेदवारांसाठी ईव्हीएमद्वारे मतदान घेतले जाऊ शकत होते. मात्र आधुनिक एम-३ प्रकारच्या ईव्हीएममध्ये २४ मशिन जोडून ३८४ उमेदवारांसाठी मतदान घेणे शक्य आहे. मतपत्रिका असो अथवा ईव्हीएम प्रशासनाला निवडणूक आयोगाच्या आदेशानुसारच निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.-डॉ.अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव