शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नवीन बसस्थानक बनले चोरट्यांचे ‘आगार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:28 IST

जळगाव : नवीन बसस्थानकात गेल्या काही दिवसापासून महिलांच्या पर्स, गळ्यातील मंगळसूत्र, सोनसाखळी लांबविण्यासह बॅगा व खिशातून मोबाईल, पैसे लांबविण्याच्या ...

जळगाव : नवीन बसस्थानकात गेल्या काही दिवसापासून महिलांच्या पर्स, गळ्यातील मंगळसूत्र, सोनसाखळी लांबविण्यासह बॅगा व खिशातून मोबाईल, पैसे लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ होत चालली असून हे बसस्थानक पुन्हा चोरट्यांचे आगार बनले आहे. महामंडळाचे सुरक्षा रक्षक असो की पोलीस नावालाच असून या दोन्ही यंत्रणा पुरेशी खबरदारी घेत नसल्याची ओरड प्रवाशांमधून होत आहे.

गेल्या आठवड्यातच अहमदाबाद ये‌थून आलेल्या पूनम श्रावण सोनवणे (वय २८, रा. अहमदाबाद) या महिलेची बॅग कापून त्यातील साडे सहा तोळ्याचे सोन्याचे दागिने व अडीच हजाराची रोकड लांबविल्याची घटना घडली होती. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. एस.टी.बसमध्ये चढण्यापासून जागा सांभाळणे व उतरेपर्यंत मदत करणाऱ्याने ही चोरी केली असावी असा संशय या महिलेनेच व्यक्त केला आहे. आठवडा झाला तरी या गुन्ह्याचा तपास किंवा कुठलेही धागेदोरे पोलिसांना मिळालेले नाहीत. जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात तर सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यातच टाळाटाळ केली जात असल्याचा अनुभव तक्रारदारांना येत आहे.

याआधी देखील बसस्थानकातून अनेक महिलांच्या सोनसाखळ्या चोरी झालेल्या आहेत. गेल्या महिन्यात तर प्रवाशांनी चोरट्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. मोबाईल चोरीच्याही घटना वाढलेल्या आहेत. एक तर तक्रार घ्यायलाच पोलिसांकडून आढेवेढे घेतले जातात, घेतलीच तर मोबाईल किंवा चोरटा सापडेल याची शाश्वती नाही, त्यामुळे बरेच तक्रारदार तक्रार देणेही टाळत असल्याचे अनुभव आहेत.बऱ्याचदा तर मोबाईल चोरी झालेला असतानाही पोलिसांकडून हरविल्याचा दाखल देऊन तक्रारदाराची बोळवण केली जाते.

पोलीस चौकी नाही

बसस्थानकात पूर्वी पोलीस चौकी होती, मात्र आता बसस्थानकाचे नूतनीकरण करण्यात आल्याने ही चौकी व इतर दुकाने तोडण्यात आली. गेल्या तीन ते चार वर्षापासून चौकीच नसल्याने पोलिसांना थांबायला जागाच नाही. पूर्वी पोलीस चौकीमुळे रात्रीही कर्मचारी तैनात असायचे, आता तर दिवसाही कर्मचारी दिसत नाहीत. गणवेशधारी पोलीस तैनात असले तर चोरट्यांमध्ये त्याचा धाक व वचक निर्माण होतो. घटना घडल्यानंतर येथे पोलीस येतात. दोन घटनांमध्ये प्रवाशांनी चोरट्यांना पकडून ठेवल्यानंतर पोलीस आले होते. येथील पोलीस चौकी कायमस्वरुपी सुरु करण्यात यावी.

कोट...

बसमध्ये चढताना किंवा चालत्या बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन मंगळसूत्र, मोबाईल व पाकीट चोरीच्या अनेकवेळा घटना घडतात. बसस्थानकाचे सुरक्षा रक्षक व पोलीस गर्दीच्या ठिकाणी फिरले तर संशयित चोरट्यांना चोरीची संधीच मिळणार नाही. लग्न सराई व बाजाराच्या दिवशी बसस्थानकात मोठी गर्दी असते.

-रामचंद्र धनजी पाटील, प्रवासी