शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
3
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
4
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
5
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
6
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
7
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
8
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
9
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
10
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
11
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
12
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
13
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
14
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
15
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
16
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
17
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
18
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
19
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
20
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?

ना 'मान' ना 'धन'...प्राध्यापकाला विकावे लागतेय चिकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या दहा वर्षांपासून विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करतोय...२०१८ मध्ये सेट उत्तीर्ण झालो, दोन महिन्यात पीएच.डी. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या दहा वर्षांपासून विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करतोय...२०१८ मध्ये सेट उत्तीर्ण झालो, दोन महिन्यात पीएच.डी. पूर्ण होईल, मात्र, प्राध्यापक भरती बंद असणे व कामाचा मोबदला न मिळणे याबाबींमुळे आर्थिक कोंडीत सापडलोय आणि गेल्या वर्षभरापासून मासे व चिकन विक्री करून कुटुंबाचा रहाटगाडा ओढत असल्याची व्यथा प्रा. विनोद नाईक यांनी मांडली आहे. त्यांनी बुधवारी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन विनाअनुदानित महाविद्यालयात काम करणाऱ्या प्राध्यापकांचे दु:ख मांडले.

प्रा. नाईक हे चोपडा तालुक्यातील सुंदरगढी येथील रहिवासी, आदिवासी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. चोपड्यातच त्यांनी एम.ए.पर्यंतचे शिक्षण घेतले. २०१० पासून ते विविध महाविद्यालयात तासिका तत्त्वावर विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत आहेत. तासिका तत्त्वावर कामे करणाऱ्या एकाच महाविद्यालयात काम करावे लागेल आणि त्यांना १८ हजार रुपये मासिक मानधन मिळेल, असा शासन निर्णय असताना आजपर्यंत इतके मानधन मिळाले नाही. अगदी तुटपुंज्या मानधनावर वर्षानुवर्ष कामे केली. त्यात गेल्या कोरोनाच्या काळानंतर मानधनच मिळाले नाही. आर्थिक घडी विस्कटल्याने सकाळी अध्यापन आणि सायंकाळी चिकन विक्री असा दिनक्रम चालवून कुटुंब चालवावे लागत आहे. कुटुंबात आई-वडील, दोन मुले आहेत. कुटुंब पूर्णत: आपल्यावर अवलंबून आहे.

जयंत पाटलांसमोर अश्रू अनावर

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासमोर प्रा.नाईक यांनी सर्व प्राध्यापकांच्या या व्यथा मांडल्या. आदिवासी समाजातील एक व्यक्ती शिक्षण घेऊन पुढारलेल्या समाजासोबत चालू इच्छितो मात्र, लोक स्वीकारत नाही, दोन मिनिटे वेळ देत नाहीत, असा मोठ्याने आवाज दिल्यानंतर जलसंपदा मंत्र्यांशी बोलता आले, अन्यथा त्यांच्याशी बोलू दिले जात नव्हते. त्यांच्याशी बोलताना अखेर अश्रू अनावर झाले, असे प्रा. नाईक यांनी सांगितले.

कोट

स्थानिक भाषा बोलणारा मी आज इंग्लिश बोलू शकतो, शिकवू शकतो. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मी दहा वर्षांपासून रात्रंदिवस मेहनत घेतोय, मात्र, अशा स्थितीत समाज माझा काय आदर्श घेणार आहे. प्राध्यापकांचा आवाज शासनाच्या कानापर्यंत कधी जाईल, त्यांच्या व्यथा शासन कधी समजून घेईल.

- प्रा. विनोद नाईक