शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
2
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
3
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
4
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
5
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
6
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
7
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
8
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
9
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
10
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
11
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
12
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
13
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
14
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
15
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
16
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
17
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
18
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
19
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
20
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं

जळगाव व भुसावळ तालुक्यातील वनजमिन विक्री घोटाळ्यातील दोषींपर्यंत पोहोचण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 16:09 IST

विश्लेषण

ठळक मुद्देसमिती करतेय चौकशी मात्र तक्रारदार पुढे येईना खरेदीखत नोंदीची माहिती मागवून कारवाईची गरज

सुशील देवकरजळगाव: जिल्ह्यातील जळगाव व भुसावळ तालुक्यातील भागपूर, कंडारी, उमाळे शिवार व परिसरातील वनविभागाच्या जमिनींची परस्पर विक्री केल्याचे प्रकार घडले असून आतापर्यंत सुमारे २२८८ एकर जमिनची अशाप्रकारे विल्हेवाट लावल्याचा संशय आहे. मात्र या घोटाळ्यात अद्याप कुणीही तक्रारदार पुढे आलेला नाही. चौकशी समिती चाकोरीत चौकशी करून अहवाल निपटण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र खऱ्या दोषींपर्यंत पोहोचून या १०० कोटींपेक्षा अधिक रक्कमेच्या घोटाळ्याची पाळेमुळे खणून काढण्याची गरज आहे.वनविभागाच्या जमिनी २०१३ च्या दरम्यान तत्कालीन तलाठी, सर्कल, तहसीलदार यांच्याशी संगनमत करून वनविभागाचाच गट नंबर, सर्व्हेनंबर वापरून ती जमीन अल्पभूधारक दर्शविलेल्या व्यक्तीच्या नावाची असल्याचे महसूल विभागाचा बोगस सातबारा उतारा तयार करून दर्शविले जायचे. त्यानंतर काही महिन्यातच त्या जमिनीची संबंधीताने दुसºयाला विक्री करून नफा मिळवायचा. त्यानंतर दुसºयाने ती तिसºयाला विकायची. या सर्व व्यवहारांमध्ये मात्र दलाल, तलाठी, सर्कल, तहसीलदार व माफिया अशी कॉमन साखळी असायची. एकरी १ लाखापासूनचा नफ्याचा व्यवहार १६ लाखांपर्यंत गेल्याचे समजते. सरासरी ४ ते ५ लाख रूपये एकरी दर धरला तरीही हा घोटाळा १०० कोटींच्या आसपास आहे. प्रत्यक्षात किंमत अधिक असल्याने हा शेकडो कोटींचा घोटाळा असल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे शहर व तालुक्यातील काही बड्या राजकारण्यांसह सुमारे ५५ जणांचा यात समावेश असल्याची उघड चर्चा सुरू आहे. मात्र तरीही चौकशी समिती चाकोरीबद्धरितीनेच तपास करीत आहे. केवळ तलाठ्याची चौकशी करून त्यावरच कारवाई करून काहीही होणार नाही. चौकशी समितीने स्वत:हून या घोळाचे धागेदोरे शोधण्याची गरज आहे. महसूलच्या रेकॉर्डमधील नोंदींमध्ये बदल केलेले नसले तरीही बनावट सातबाराच्या आधारे खरेदी-विक्रीचे व्यवहार नोंदविले गेले आहेत. त्याची माहिती चौकशी समितीने दुय्यम निबंधक कार्यालयाकडून मागवून सर्वप्रथम वनजमिनीच्या सातबारा ज्यांच्या नावाने झाला, त्या सर्वांना नोटीस देऊन चौकशीसाठी बोलविण्याची व त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची गरज आहे. मात्र चौकशी समिती चाकोरीबद्धरितीने चौकशी करून काम टाळत असल्याची चर्चा आहे. आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी या खरेदी-विक्री व्यवहारांची माहिती मागविली आहे. त्यामुळे त्यांनी पाठपुरावा सुरू ठेवला तरच या घोटाळ्यातील दोषी समोर येऊ शकतील.