शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श भारत घडविण्यासाठी संघटित युवापिढीची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:58 IST

जळगाव : आजच्या युवक-युवतींना दिन विशेषांचे महत्त्व माहिती असेल का, असा प्रश्न सहज पडतो. कुठलीही माहिती हवी असेल, ...

जळगाव : आजच्या युवक-युवतींना दिन विशेषांचे महत्त्व माहिती असेल का, असा प्रश्न सहज पडतो. कुठलीही माहिती हवी असेल, तर हातात मोबाइल घेऊन ही पिढी गुगल सर्च करते, पण प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी युवक-युवतींनी प्रजासत्ताक दिनाचा अर्थच नव्हे, तर या दिनाचे महत्त्व विशद केले. त्यातच आदर्श भारत घडविण्यासाठी संघटीत युवापिढीची आवश्यकता असल्याचा सूर युवक-युवतींमधून उमटला.

मंगळवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. ‘लोकमत’ने लोकशाहीतील प्रजासत्ताकाचे महत्त्व, संविधान आदी प्रश्नांबाबत विद्यार्थांची मते जाणून घेतले. त्यावर विद्यार्थी भरभरून बोलले.

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. खरे तर हा प्रतिज्ञेचा दिवस आहे. प्रत्येक भारतीयाने या महत्त्वाच्या दिवशी देशासाठी देशहितकारक कार्य करण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे. त्यानुसार, वागायला हवे.

- संजना वानखेडे, विद्यार्थिनी

०००००००००००००००००००००००००

प्रजासत्ताक दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे. या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे आपण सर्व एकत्र येऊ शकत नसलो, तरीही आपण घराघरातून प्रजासत्ताक दिन साजरा करायला हवा.

- रितेश महाजन, विद्यार्थी

०००००००००००००००००००००००००

७२ वर्षांपूर्वी देशाने संविधानाचा स्वीकार करून, लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. आपला देश विविधता आणि संस्कृतीसाठी ओळखला जातो. गेल्या काही वर्षांत आपल्या देशाला विविध प्रकारे दुखापत झाली, पण तरीही आपण कायम आपल्या संस्कृतीचा आदर्श ठेवून वाटचाल करत आलोय. माझ्या या भारत देशाचा मला प्रचंड अभिमान आहे.

- चैतन्य बोरसे, विद्यार्थी

००००००००००००००००००००००००००

प्रजासत्ताक दिनाला ७२ वर्षे जरी पूर्ण झाली असली, तरी आजही भारतामध्ये अनेक संकटे, समस्या निर्माण झाल्या आहेत. एकीकडे भारताने विज्ञान क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतली, तर दुसरीकडे समस्यांना सामोरे जातोय. या समस्यांना लढा देण्यासाठी व आदर्श भारत घडविण्यासाठी ध्येयनिष्ठ, कर्तव्यदक्ष, मार्गशील व संघटित युवापिढीची आवश्यकता आहे.

- भूमिका कानडे, विद्यार्थिनी

०००००००००००००००००००००००००

खरा प्रजासत्ताक तेव्हाच साजरा होईल, जेव्हा संविधान कागदावर न राहता, त्यातील प्रत्येक अधिकार सामान्य माणसाला बजावता येईल आणि संविधानातील प्रत्येक कर्तव्याची जाण सामान्यांना असेल. आपण सर्वांनी मिळून त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

- सौरभ भोई, विद्यार्थी