शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

साखर कारखान्यांसाठी आर्थिक बुस्टरची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 16:09 IST

मतीन शेख मुक्ताईनगर, जि.जळगाव : साधारण १५ ऑक्टोबरनंतर राज्यातील साखर कारखान्याचे गळीत हंगाम सुरू होतात. जिल्ह्यातही याच काळात मुहूर्त ...

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : साधारण १५ ऑक्टोबरनंतर राज्यातील साखर कारखान्याचे गळीत हंगाम सुरू होतात. जिल्ह्यातही याच काळात मुहूर्त साधला जातो. गेल्या वर्षी एकमेव मुक्ताई शुगर एनर्जी साखर कारखान्याने गळीत हंगाम पूर्ण केला होता आणि यंदाही गळीतच्या तयारीला लागल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे जिल्ह्यातील उर्वरित साखर कारखान्याचे जाते येत्या गळीत हंगामात फिरणार की नाही याबाबत साशंकता आहे. सहकारी कारखाने चालू होण्यास आर्थिक बूस्टरची गरज आहे.जिल्ह्यातील साखर कारखानदारीत अग्रगण्य असलेल्या फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना आर्थिक संकटात सापडल्याने गेल्या वर्षीही बंद होता व यंदा येथेही गळीत हंगाम होईल, अशी स्थिती दिसून येत नाही.दुसरीकडे चोपडा साखर कारखानाही आर्थिक कोंडीबाहेर पडू न शकल्याने बंद आहे. चाळीसगावच्या बेलगंगा साखर कारखान्याच्या राजकारणातून अनेकांचे राजकीय भविष्य उज्वल झाले. मात्र अनेक वर्षांपासून कारखाना व कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधःकारमय आहे. रावेर कारखाना खाजगी कंपनीकडे जाऊनही चालू शकला नाही. यामुळे जिल्ह्यातील सहकारी तत्वावरची साखर कारखानदारी बुडत्या स्थितीला येऊन ठेपली आहे.शासनाने सहकारी साखर कारखाने टिकविण्यास आर्थिक मदत दिली तरच जिल्ह्यातील सहकारी साखर कारखानदारी चालू होईल. अन्यथा कारखाने आणि कर्मचारी यांचे भविष्य अंधारात आहे.अवसायनात गेलेल्या मुक्ताईनगर येथील साखर कारखाना मुक्ताई शुगर अँड एनर्जी या खासगी कंपनीकडे गेल्याने त्याला चांगले दिवस आले आहे. कारखान्याने मागील ६ गळीत हंगाम यशस्वी पूर्ण केले असून, वीज निर्मितीसह प्रकल्पही यशस्वी झाला आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात एकमेव मुक्ताईनगरचा हा कारखाना सुरू होता. करखान्याने १०.६७ चा उतारा साध्य केला होता. यंदा जिल्ह्यात ऊस आहे. मात्र मुक्ताई शुगर वगळता अन्य कारखाने सुरू होतील याबाबत साशंकता आहे. यामुळे मुक्ताई शुगर व्यवस्थापनाचा उत्साह दुणावला आहे. २५ मेट्रिक टन प्रति दिवस क्षमता असलेल्या या कारखान्यात २०२० - २१ च्या गळीत हंगामात ५ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यातून १०.५ टक्के उतारा गाठून पाच लाख २५ हजार क्विंटल साखर उत्पादन होईल तर १२ मेगा व्हॅट वीज निर्मिती होईल, असा विश्वास कारखान्याचे व्हाईस चेअरमन ऍड. रोहिणी खडसे व कार्यकारी संचालक देवरे यांनी व्यक्त केला.