शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
3
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
4
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
5
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
8
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
9
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
10
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
11
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
12
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
13
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखान्यांसाठी आर्थिक बुस्टरची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 16:09 IST

मतीन शेख मुक्ताईनगर, जि.जळगाव : साधारण १५ ऑक्टोबरनंतर राज्यातील साखर कारखान्याचे गळीत हंगाम सुरू होतात. जिल्ह्यातही याच काळात मुहूर्त ...

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : साधारण १५ ऑक्टोबरनंतर राज्यातील साखर कारखान्याचे गळीत हंगाम सुरू होतात. जिल्ह्यातही याच काळात मुहूर्त साधला जातो. गेल्या वर्षी एकमेव मुक्ताई शुगर एनर्जी साखर कारखान्याने गळीत हंगाम पूर्ण केला होता आणि यंदाही गळीतच्या तयारीला लागल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे जिल्ह्यातील उर्वरित साखर कारखान्याचे जाते येत्या गळीत हंगामात फिरणार की नाही याबाबत साशंकता आहे. सहकारी कारखाने चालू होण्यास आर्थिक बूस्टरची गरज आहे.जिल्ह्यातील साखर कारखानदारीत अग्रगण्य असलेल्या फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना आर्थिक संकटात सापडल्याने गेल्या वर्षीही बंद होता व यंदा येथेही गळीत हंगाम होईल, अशी स्थिती दिसून येत नाही.दुसरीकडे चोपडा साखर कारखानाही आर्थिक कोंडीबाहेर पडू न शकल्याने बंद आहे. चाळीसगावच्या बेलगंगा साखर कारखान्याच्या राजकारणातून अनेकांचे राजकीय भविष्य उज्वल झाले. मात्र अनेक वर्षांपासून कारखाना व कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधःकारमय आहे. रावेर कारखाना खाजगी कंपनीकडे जाऊनही चालू शकला नाही. यामुळे जिल्ह्यातील सहकारी तत्वावरची साखर कारखानदारी बुडत्या स्थितीला येऊन ठेपली आहे.शासनाने सहकारी साखर कारखाने टिकविण्यास आर्थिक मदत दिली तरच जिल्ह्यातील सहकारी साखर कारखानदारी चालू होईल. अन्यथा कारखाने आणि कर्मचारी यांचे भविष्य अंधारात आहे.अवसायनात गेलेल्या मुक्ताईनगर येथील साखर कारखाना मुक्ताई शुगर अँड एनर्जी या खासगी कंपनीकडे गेल्याने त्याला चांगले दिवस आले आहे. कारखान्याने मागील ६ गळीत हंगाम यशस्वी पूर्ण केले असून, वीज निर्मितीसह प्रकल्पही यशस्वी झाला आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात एकमेव मुक्ताईनगरचा हा कारखाना सुरू होता. करखान्याने १०.६७ चा उतारा साध्य केला होता. यंदा जिल्ह्यात ऊस आहे. मात्र मुक्ताई शुगर वगळता अन्य कारखाने सुरू होतील याबाबत साशंकता आहे. यामुळे मुक्ताई शुगर व्यवस्थापनाचा उत्साह दुणावला आहे. २५ मेट्रिक टन प्रति दिवस क्षमता असलेल्या या कारखान्यात २०२० - २१ च्या गळीत हंगामात ५ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यातून १०.५ टक्के उतारा गाठून पाच लाख २५ हजार क्विंटल साखर उत्पादन होईल तर १२ मेगा व्हॅट वीज निर्मिती होईल, असा विश्वास कारखान्याचे व्हाईस चेअरमन ऍड. रोहिणी खडसे व कार्यकारी संचालक देवरे यांनी व्यक्त केला.