शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

साखर कारखान्यांसाठी आर्थिक बुस्टरची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 16:09 IST

मतीन शेख मुक्ताईनगर, जि.जळगाव : साधारण १५ ऑक्टोबरनंतर राज्यातील साखर कारखान्याचे गळीत हंगाम सुरू होतात. जिल्ह्यातही याच काळात मुहूर्त ...

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : साधारण १५ ऑक्टोबरनंतर राज्यातील साखर कारखान्याचे गळीत हंगाम सुरू होतात. जिल्ह्यातही याच काळात मुहूर्त साधला जातो. गेल्या वर्षी एकमेव मुक्ताई शुगर एनर्जी साखर कारखान्याने गळीत हंगाम पूर्ण केला होता आणि यंदाही गळीतच्या तयारीला लागल्याचे चित्र आहे, तर दुसरीकडे जिल्ह्यातील उर्वरित साखर कारखान्याचे जाते येत्या गळीत हंगामात फिरणार की नाही याबाबत साशंकता आहे. सहकारी कारखाने चालू होण्यास आर्थिक बूस्टरची गरज आहे.जिल्ह्यातील साखर कारखानदारीत अग्रगण्य असलेल्या फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना आर्थिक संकटात सापडल्याने गेल्या वर्षीही बंद होता व यंदा येथेही गळीत हंगाम होईल, अशी स्थिती दिसून येत नाही.दुसरीकडे चोपडा साखर कारखानाही आर्थिक कोंडीबाहेर पडू न शकल्याने बंद आहे. चाळीसगावच्या बेलगंगा साखर कारखान्याच्या राजकारणातून अनेकांचे राजकीय भविष्य उज्वल झाले. मात्र अनेक वर्षांपासून कारखाना व कर्मचाऱ्यांचे भविष्य अंधःकारमय आहे. रावेर कारखाना खाजगी कंपनीकडे जाऊनही चालू शकला नाही. यामुळे जिल्ह्यातील सहकारी तत्वावरची साखर कारखानदारी बुडत्या स्थितीला येऊन ठेपली आहे.शासनाने सहकारी साखर कारखाने टिकविण्यास आर्थिक मदत दिली तरच जिल्ह्यातील सहकारी साखर कारखानदारी चालू होईल. अन्यथा कारखाने आणि कर्मचारी यांचे भविष्य अंधारात आहे.अवसायनात गेलेल्या मुक्ताईनगर येथील साखर कारखाना मुक्ताई शुगर अँड एनर्जी या खासगी कंपनीकडे गेल्याने त्याला चांगले दिवस आले आहे. कारखान्याने मागील ६ गळीत हंगाम यशस्वी पूर्ण केले असून, वीज निर्मितीसह प्रकल्पही यशस्वी झाला आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात एकमेव मुक्ताईनगरचा हा कारखाना सुरू होता. करखान्याने १०.६७ चा उतारा साध्य केला होता. यंदा जिल्ह्यात ऊस आहे. मात्र मुक्ताई शुगर वगळता अन्य कारखाने सुरू होतील याबाबत साशंकता आहे. यामुळे मुक्ताई शुगर व्यवस्थापनाचा उत्साह दुणावला आहे. २५ मेट्रिक टन प्रति दिवस क्षमता असलेल्या या कारखान्यात २०२० - २१ च्या गळीत हंगामात ५ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यातून १०.५ टक्के उतारा गाठून पाच लाख २५ हजार क्विंटल साखर उत्पादन होईल तर १२ मेगा व्हॅट वीज निर्मिती होईल, असा विश्वास कारखान्याचे व्हाईस चेअरमन ऍड. रोहिणी खडसे व कार्यकारी संचालक देवरे यांनी व्यक्त केला.