शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

न्याय व समता टिकविण्यासाठी एकत्र लढा देण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 23:23 IST

मेधा पाटकर । संविधान वाळवी लागल्यासारखे पोखरले जातेय याची खंत

अमळनेर : संविधानात असलेल्या न्यायपूर्ण, समाजवादी, समतावादी अधिकारांवर गदा येत असून शब्दांना असलेले मूल्य संपत चालले आहे. म्हणून संविधान धोक्यात असून कायद्याची विल्हेवाट लावणे सुरू आहे. संविधानातील एक एक भाग वाळवी लागल्यासारखा पोखरला जात आहे, अशी खंत सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केली.राष्ट्रसेवा दल, छात्रभारती, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पुरोगामी विचार मंचाच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्यांच्या स्मरणार्थ विवेक जागर कार्यक्रमांतर्गत ‘भारतीय संविधान धोक्यात?’ या विषयावर छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. अनेक वर्षांनंतर प्रथमच मेधा पाटकर व प्रतिभा शिंदे एकत्र आल्या.रमेश लंकेश्वर, राजेंद्र चौधरी, प्रा.राजेंद्र वैद्य, दिनेश संकलेच, दिनेश वाल्हे, गुलाब शिंगाणे, उदय कापुरे, अजित शेख, जगदीश तावडे या चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या समरणार्थ व्यख्यान आयोजित केले होते.पाटकर पुढे म्हणाल्या की, संविधानातील मूल्ये जपण्यासाठी व कर्तव्ये पार पाडण्यासाठी आपण एकत्र येत आहोत. संविधानातील लिहिलेल्या गोष्टींचे पालन होत नसेल तर आपल्याला लढावेच लागेल. शिक्षणातील व्यापक विचारांवरील हल्ल्यांबाबत गांभीर्याने विचार करावा लागेल. हे सरकार १४४ कायदे रद्द करू पाहत आहे. म्हणून एकता आणि एकजूट ठेवावी. तसेच २९ रोजी बहुजन क्रांती मेर्चातर्फे भारत बंद व ३० रोजी अहिंसा साखळी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. आमदार अनिल पाटील, माजी उपजिल्हाधिकारी एच.टी. माळी, साहित्यिक कृष्णा पाटील, सानेगुरुजी वाचनालायचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, कामगार संघटनेचे सोमचंद संदनशिव, एस.डी. देशमुख, बन्सीलाल भागवत, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, भारती गाला, गो.पी.लांडगे, रत्नदीप सिसोदिया, वीज कर्मचारी संघटनेचे पी.वाय. पाटील, वसुंधरा लांडगे, मंगला पवार, प्रदीप पाटील, डॉ. रवींद्र पाटील, धनगर पाटील, डॉ.जयश्री पाटील, रणजित शिंदे, उदय खैरनार, गौतम सपकाळे, कैलास बहारे, रवी पांडे, प्रा.लीलाधर पाटील, सानेगुरुजी स्मारक समितीच्या कार्यवाह दर्शना पवार यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होत्या.