शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

‘अमृत’मुळे खड्ड्यांचा ताप, त्यात भर म्हणून चिखलाचा मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या अमृत योजनेच्या कामामुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या अमृत योजनेच्या कामामुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यात मनपाकडून रस्त्यांची दुरुस्ती केवळ नावापुरतीच होते. आता भुयारी गटार योजनेच्या कामाला वेग आला असून, रस्ते मोठ्या प्रमाणात फोडले जात आहेत. त्यातच बुधवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे खोदकाम झालेल्या ठिकाणी चिखल झाला आहे. यामुळे चिखलात खड्डे व खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनांवरच काय पायी चालणेदेखील कठीण झाले आहे.

शहरातील असा कोणताच रस्ता शिल्लक नाही की ज्या ठिकाणी खड्डे नाहीत. यामुळे जळगावकर आता या खड्ड्यांना पूर्णपणे वैतागलेले दिसून येत आहेत. एकीकडे सर्वत्र रस्ते खोदण्यात आले असले तरी ज्या भागात अमृतचे काम झाले आहे. त्या भागात नवीन रस्ते तयार करा, अशी मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे. शहरातील खराब रस्त्यांमुळे उपनगरातून मुख्य शहरात काही वस्तू किंवा भाजीपाला घ्यायला येण्यासही आता नागरिकांना धाक पडत आहे. मात्र, मनपा प्रशासन किंवा सत्ताधाऱ्यांना जळगावकरांच्या व्यथा का दिसत नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ढीगभर समस्यांना द्यावे लागत आहे तोंड

१. खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग कमी असतो, तसेच अनेक मोठी वाहने चाऱ्यामध्ये फसत असल्याने मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या नित्याची झाली आहे.

२. खड्ड्यांची दुरुस्ती मनपाकडून चांगल्या प्रकारे होत नसल्याने या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने सर्वच रस्ते चिखलमय झाले आहे.

मनपाच्या चुकांचा फटका

मनपा प्रशासनाने भुयारी गटार योजनेची निविदा काढल्यानंतर त्यात रस्त्याचे खोदकाम झाल्यानंतर त्या खोदलेल्या चाऱ्या दुरुस्त करण्याची जबाबदारी मक्तेदारावर सोपविलेली नाही. मनपाच्या या चुकांचा फटका जळगावकरांना भोगावा लागत आहे. मक्तेदारावर जबाबदारी सोपविली नसल्याने ही दुरुस्ती करेल तरी कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. खोदलेल्या चाऱ्या दुरुस्तीच्या कामासाठी सुमारे ३० कोटींचे बजेट आवश्यक आहे. मात्र, ते बजेटदेखील मनपा प्रशासनाकडे नाही. यामुळे मनपाची एक चूक जळगावकरांसाठी महागात पडत आहे.

चिखलामुळे दुचाकीस्वार घसरले

भुयारी गटार योजनेच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात रस्ते खोदण्यात आले आहेत. त्यात खोदकाम झाल्यानंतर दुरुस्तीदेखील होत नसल्याने आता पाऊस नसल्यास त्या ठिकाणी खडीची समस्या निर्माण होते. बुधवारी झालेल्या पावसामुळे रस्त्यावर पसरलेल्या मातीने मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. चिखलात दुचाकी घसरून अनेक जण जखमी झाले आहेत. शहरातील फुले मार्केट, टॉवर चौक, आर.आर. विद्यालय, बसस्थानकामागील परिसरात चिखलामुळे दुचाकीस्वार घसरून जखमी झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. बसस्थानकामागील गल्लीत एकाच ठिकाणी पाच दुचाकीस्वार घसरले होते. त्यानंतर स्थानिक दुकानदारांनी त्या ठिकाणी खोके ठेवून रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना सावध करण्याचे काम केले.

मनपाचाच रस्ता केला बंद

महापालिकेसमोरच खोदकाम करण्यात आले असून, मनपा कार्यालयात जाण्याचा मार्गदेखील या खोदकामामुळे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे गोलाणीच्या बाजूने मनपात प्रवेश करावा लागत आहे. विशेष म्हणजे खोदकाम झाल्यानंतरही तत्काळ दुरुस्ती केली जात नसून, अनेक दिवस खोदकाम झालेल्या चाऱ्या तशाच ठेवून दिल्या जातात. या चाऱ्यांमध्ये पावसाचे पाणी जमा होत असल्याने अनेक ठिकाणी वाहने या चाऱ्यांमध्ये फसत आहेत.

कोट..

पाणीपुरवठा योजनेचे काम फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यासाठी काम वेगाने सुरू आहे. यामुळे रस्त्यांचे खोदकाम केले जात आहे, तर भुयारी गटार योजनेचे कामदेखील गतीने सुरू आहे. ही दोन्ही कामे लवकरात लवकर संपविण्याचा प्रयत्न आहे. ही कामे संपली तर शहरातील रस्त्यांची कामेदेखील सुरू करता येऊ शकतील.

-अरविंद भोसले, शहर अभियंता, मनपा