शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
4
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
5
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
7
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
8
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
9
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
10
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
11
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
12
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
13
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
14
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
15
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
16
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
17
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
18
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
19
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
20
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचा दौरा अन् संघटनावाढीचे स्वातंत्र्य...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:27 IST

राज्यात महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे तीन पक्ष एकत्रित सत्तेत आहेत; मात्र स्थानिक पातळ्यांवर व्यक्तीपरत्वे राजकारण बदलत असते. ...

राज्यात महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे तीन पक्ष एकत्रित सत्तेत आहेत; मात्र स्थानिक पातळ्यांवर व्यक्तीपरत्वे राजकारण बदलत असते. त्यामुळे स्थानिक राजकारण हे राज्य आणि केंद्राच्या राजकारणापेक्षा वेगळे असते. असे असल्याने स्थानिक पातळ्यांवर स्वतंत्र आपला पक्ष वाढावा, संघटना मजबूत व्हावी, असे स्वातंत्र्य प्रत्येक पक्षाला आहे...राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या विविध विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या आढावा बैठकांमुळे हा मुद्दा चर्चेत येत आहे. ‘नेते भरपूर, कार्यकर्ते नाही’, अशी एक ओळख निर्माण झाल्यानंतर पक्षाला संघटनावाढीसाठी झटावे लागते, काँग्रेस हे जिल्ह्यात त्याचे उदाहरण आहे. राष्ट्रवादीचीही त्याच मार्गावर वाटचाल सुरू आहे का? असा प्रश्न सहाजिकच पडतो. फैजपूर येथेही राष्ट्रवादी आढावा बैठक घेणार आहे. हा दौरा पक्षाचा परिवार संवाद या कार्यक्रमांतर्गत आहे. त्यामुळे महाविकासच्या अन्य दोन पक्षांचा यात समावेश नाही. आघाडी होते नव्हते, शिवाय ऐन निवडणुकांच्या तोंडावर जागा वाटपांचा वाद अन् स्वतंत्र लढण्याची कोणताही पक्ष केव्हाही भूमिका घेऊ शकतो, अशा स्थितीत आगामी काळात प्रत्येक मतदारसंघात पक्ष स्वतंत्ररीत्या मजबूत असावा, असे सर्वच पक्षांना वाटते आणि याचे त्यांना स्वातंत्र्य आहे. मित्रपक्षाचा मतदासंघ आहे म्हणून त्या ठिकाणी पक्ष वाढवू नये, असा विचार करणे आता परवडणारे नाही, त्यामुळे राष्ट्रवादीही सर्वत्र व काँग्रेस, शिवसेनाही सर्वत्र आपला पक्ष वाढविण्यावर भर देत आहे. त्याचाच भाग ही परिवार संवाद यात्रा असल्याचे त्याकडे बघितले जात आहे.

नवीन समीकरणे अपेक्षित

राजकारणात मोठ्या नेत्यांच्या पक्षांतरानंतर नवीन समीकरणे अपेक्षितच असतात किंबहुना तशी समीकरणे समोर आली नाहीत तर आश्चर्य व्यक्त होते आणि चर्चा सुरू होतात. माजी मंत्री एकनाथ खडसे आणि माजी आमदार मनिष जैन यांची भेट, पक्षाच्या कार्यक्रमात एकत्र येऊन एकमेकांबद्दल आदराने बोलणे, केक भरविणे हे नवीन समीकरणही अपेक्षितच होते... प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दौऱ्यापूर्वी संघटना मजबुतीचा प्राथमिक संदेश मात्र या कार्यक्रमांमधून पोहोचविण्यात पदाधिकारी यशस्वी झाले आहेत.