शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
4
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
5
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
6
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
7
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
8
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
9
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
10
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
11
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
12
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
13
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
14
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
15
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
16
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
17
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
18
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
19
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
20
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ

राष्ट्रवादीने उपराष्ट्रपती नायडूंच्या प्रतिमेला काळे फासले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 20:52 IST

राज्यसभेत शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणाबाजी केली असता त्यास उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी विरोध केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गुरुवारी शिवतीर्थ मैदानाजवळ घोषणाबाजी करुन नायडूंच्या प्रतिमेवर शाई फेकून काळे फासत त्यांचा निषेध नोंदविला तर शिवसेनेनेही घोषणाबाजी व निदर्शने करुन नायडूंचा निषेध नोंदविला. दरम्यान, याप्रकरणी राष्टÑवादीच्या ९ तर शिवसेनेच्या ७ अशा १६ जणांविरुध्द जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आंदोलनकर्त्यांना अटक करुन लागलीच सोडण्यात आले.

ठळक मुद्देशिवसेनेची निदर्शने१६ जणांविरुध्द गुन्हा  अटक व सुटका

जळगाव : राज्यसभेत शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणाबाजी केली असता त्यास उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी विरोध केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गुरुवारी शिवतीर्थ मैदानाजवळ घोषणाबाजी करुन नायडूंच्या प्रतिमेवर शाई फेकून काळे फासत त्यांचा निषेध नोंदविला तर शिवसेनेनेही घोषणाबाजी व निदर्शने करुन नायडूंचा निषेध नोंदविला. दरम्यान, याप्रकरणी राष्टÑवादीच्या ९ तर शिवसेनेच्या ७ अशा १६ जणांविरुध्द जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आंदोलनकर्त्यांना अटक करुन लागलीच सोडण्यात आले. राष्टÑवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक शांताराम पाटील, युवक अध्यक्ष स्वप्नील प्रकाश नेमाडे, अ‍ॅड.कुणाल बन्सीलाल पवार, डॉ.रिजवान इसा खाटीक, कौसर शेख हारुण काकर, किरण कडू वाघ, अनिल मोहन पवार, हर्षवर्धन दीपक खैरनार, अकील अहमद गुलाम दस्तगीर पटेल यांच्यासह इतर ५ ते ७ जणांविरुध्द तर शिवसेनेचे महानगरप्रमुख शरद श्यामराव तायडे, मनपाचे विरोधी पक्षनेते सुनील सुपडू महाजन, विजय लक्ष्मण बांदल, पूनम रायसिंग राजपूत, जितेंद्र रामकृष्ण मुंदडा, रईस शेख रशीद शेख व जाकीर पठाण यांच्यासह ७ ते ८ जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला असून जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे गोपनीयचे कर्मचारी उमेश दंगलराव पाटील यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.

राज्यसभेत सदस्यत्त्वाची शपथ घेतल्यानंतर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’, अशी घोषणाबाजी केली. त्यामुळे संतप्त होऊन उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी विरोध केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला विरोध करणे, ही बाब मराठी माणसांच्या अस्मितेला ठेच पोहचवणारी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपराष्ट्रपती नायडू यांच्या वर्तवणुकीचा निषेध नोंदवण्यात आला आहे. शहरातील शिवतीर्थाजवळ एकत्र येत दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी नायडू यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन त्यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. लोकसभा निवडणुकीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन त्यांनी मते मिळवली. आता मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला विरोध करून भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संपूर्ण भारताची अस्मिता आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रकार कदापि खपवून घेणार नाही, असे यावेळी राष्टÑवादी अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक व महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी सांगितले.