शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

राष्ट्रवादीने उपराष्ट्रपती नायडूंच्या प्रतिमेला काळे फासले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 20:52 IST

राज्यसभेत शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणाबाजी केली असता त्यास उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी विरोध केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गुरुवारी शिवतीर्थ मैदानाजवळ घोषणाबाजी करुन नायडूंच्या प्रतिमेवर शाई फेकून काळे फासत त्यांचा निषेध नोंदविला तर शिवसेनेनेही घोषणाबाजी व निदर्शने करुन नायडूंचा निषेध नोंदविला. दरम्यान, याप्रकरणी राष्टÑवादीच्या ९ तर शिवसेनेच्या ७ अशा १६ जणांविरुध्द जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आंदोलनकर्त्यांना अटक करुन लागलीच सोडण्यात आले.

ठळक मुद्देशिवसेनेची निदर्शने१६ जणांविरुध्द गुन्हा  अटक व सुटका

जळगाव : राज्यसभेत शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणाबाजी केली असता त्यास उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी विरोध केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गुरुवारी शिवतीर्थ मैदानाजवळ घोषणाबाजी करुन नायडूंच्या प्रतिमेवर शाई फेकून काळे फासत त्यांचा निषेध नोंदविला तर शिवसेनेनेही घोषणाबाजी व निदर्शने करुन नायडूंचा निषेध नोंदविला. दरम्यान, याप्रकरणी राष्टÑवादीच्या ९ तर शिवसेनेच्या ७ अशा १६ जणांविरुध्द जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आंदोलनकर्त्यांना अटक करुन लागलीच सोडण्यात आले. राष्टÑवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक शांताराम पाटील, युवक अध्यक्ष स्वप्नील प्रकाश नेमाडे, अ‍ॅड.कुणाल बन्सीलाल पवार, डॉ.रिजवान इसा खाटीक, कौसर शेख हारुण काकर, किरण कडू वाघ, अनिल मोहन पवार, हर्षवर्धन दीपक खैरनार, अकील अहमद गुलाम दस्तगीर पटेल यांच्यासह इतर ५ ते ७ जणांविरुध्द तर शिवसेनेचे महानगरप्रमुख शरद श्यामराव तायडे, मनपाचे विरोधी पक्षनेते सुनील सुपडू महाजन, विजय लक्ष्मण बांदल, पूनम रायसिंग राजपूत, जितेंद्र रामकृष्ण मुंदडा, रईस शेख रशीद शेख व जाकीर पठाण यांच्यासह ७ ते ८ जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला असून जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे गोपनीयचे कर्मचारी उमेश दंगलराव पाटील यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.

राज्यसभेत सदस्यत्त्वाची शपथ घेतल्यानंतर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’, अशी घोषणाबाजी केली. त्यामुळे संतप्त होऊन उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी विरोध केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला विरोध करणे, ही बाब मराठी माणसांच्या अस्मितेला ठेच पोहचवणारी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपराष्ट्रपती नायडू यांच्या वर्तवणुकीचा निषेध नोंदवण्यात आला आहे. शहरातील शिवतीर्थाजवळ एकत्र येत दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी नायडू यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन त्यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले. लोकसभा निवडणुकीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन त्यांनी मते मिळवली. आता मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला विरोध करून भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संपूर्ण भारताची अस्मिता आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रकार कदापि खपवून घेणार नाही, असे यावेळी राष्टÑवादी अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक व महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी सांगितले.