शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

राष्टÑवादीने आक्रमक होण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 18:24 IST

विश्लेषण

सुशील देवकर

जळगाव-लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर नैराश्य व मरगळ आलेल्या राष्टÑवादी काँग्रेसने जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक होण्याची गरज आहे. मात्र जिल्ह्यात आजही राष्टÑवादीत सुस्ती असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच विधानसभेसाठी इच्छुकांच्या मुलाखती मात्र २४ जुलै रोजी होत आहेत. जनतेच्या प्रश्नांवर काम न करताच मत मागण्यास गेल्यास निवडणुका राष्टÑवादीसाठी केवळ एक उत्सव ठरण्याची भिती व्यक्त होत आहे.मागील विधानसभा निवडणुकीत राष्टÑवादीचे जिल्ह्यातील संख्याबळ ५ वरून १ वर आले. मात्र तरीही पक्षातील गटबाजी संपलेली नाही. पक्षाच्या जिवावर मोठे झालेल्या नेते, कार्यकर्त्यांना स्वत:च्या अस्तित्वासाठी तरी पक्ष टिकवून ठेवण्याची धडपड करावी, असे वाटताना दिसत नाही. त्याचाच फटका लोकसभा निवडणुकीत बसला. डॉ.सतीश पाटील यांच्या राजीनाम्यानंतर अ‍ॅड.रविंद्र पाटील यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. मितभाषी असलेल्या अ‍ॅड.पाटील यांच्याकडून सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र त्यासोबतच आक्रमकपणाची जोड देण्याची नितांत आवश्यकता आहे.लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्विकारत राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रविंद्र पाटील यांनी पक्षाकडे पदाचा राजीनामा पाठविला होता. मात्र त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. निवडणुकांना जेमतेम दीड-दोन महिन्यांचा कालावधी उरला असल्याने पक्षाला बदल करायचाच असेल तर तो तातडीने करणे आवश्यक आहे. मात्र युवक, ज्येष्ठ अशा सगळ्यांनाच सोबत घेण्याची व जनतेचे प्रश्न आक्रमकपणे मांडण्याची गरज आहे. मात्र शहरातील जनतेच्या समस्यांवर देखील एकही पदाधिकारी आवाज उठविताना दिसत नसल्याचे चित्र आहे. ते बदलण्याची गरज आहे.जनतेचे प्रश्न आक्रमकपणे आंदोलन करून मांडले, सोडविले तरच मतदार पक्षाकडे वळेल. युवा मतदारही पक्षासोबत येईल. मात्र अपवाद वगळता राष्टÑवादीकडून जिल्ह्यातील जनतेच्या प्रश्नांवर आंदोलन झाल्याचे दिसून आलेले नाही. याउलट शहरात नावालाच अस्तित्व उरलेल्या काँग्रेसकडून खराब रस्ते, खड्डे व जनतेच्या प्रश्नांवर मनपासमोर धरणे, आंदोलन केले जात आहे. राष्टÑवादीच्या काही महिला पदाधिकाऱ्यांनीही काँग्रेसच्या आंदोलनात सहभाग घेत जनतेच्या प्रश्नावर आवाज उठविल्याचे दिसून आले. असे असताना राष्टÑवादी मात्र आंदोलन करण्यास किंवा जनतेचे प्रश्न मांडण्यास का कचरतेय? असा प्रश्न आता राष्टÑवादीच्याच पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पडायला लागलाय. अगदी सोशल मिडियावर देखील व आपसातही हे कार्यकर्ते याबाबत चर्चा करून खंत व्यक्त करताना दिसतात. पक्षाला गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर राष्टÑवादीच्या नेतृत्वाने याची वेळीच दखल घेण्याची गरज आहे.