शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय नवसंशोधन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:15 IST

विकेंद्रीकरण, पर्यावरणपूरकता, उपयोगी व शाश्वत संशोधनाच्या माध्यमातून गाव-खेड्यांना स्वयंपूर्ण बनविण्याचे व ग्राम स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न गांधीजींनी पाहिले होते. ...

विकेंद्रीकरण, पर्यावरणपूरकता, उपयोगी व शाश्वत संशोधनाच्या माध्यमातून गाव-खेड्यांना स्वयंपूर्ण बनविण्याचे व ग्राम स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न गांधीजींनी पाहिले होते. याच संकल्पनेचे बीजारोपण विद्यार्थीदशेत विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण व्हावे म्हणून या स्पर्धेचे आयोजन आहे. पाचवी ते सातवी- प्रथम गट, आठवी ते दहावी- द्वितीय गट अशा दोन गटात स्पर्धा घेतल्या जातील. स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य असून, स्पर्धेत शाळेचा सहभाग नसला तरी विद्यार्थी वैयक्तिकरीत्या स्वतंत्रपणे किंवा संघ रूपात (ग्रुप) स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. विद्यार्थ्यांना आपल्या मॉडेल / संशोधनाचा व्हिडिओ दिलेल्या लिंकवर पाठवायचा आहे. स्पर्धेसाठी पर्यावरण, ऊर्जा, सूचना व दळणवळण, स्वच्छता, रोजगार व ग्रामोदय, कृषी, शिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रयोगांना प्राधान्य दिले जाईल. ३० जानेवारीपर्यंत प्रवेश पाठविण्याची अंतिम तारीख आहे. तर मॉडेल तथा संकल्पना सादर करण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी असेल. या स्पर्धेचा निकाल २८ फेब्रुवारी म्हणजे राष्ट्रीय विज्ञानदिनी जाहीर केला जाईल. प्रत्येक गटातील पहिल्या तीन स्पर्धकांना अनुक्रमे (प्रथम) ₹३१०००/-, (द्वितीय) ₹२१०००/-, (तृतीय) ₹१५०००/- आणि प्रोत्साहनपर ₹५०००/ मूल्याचे शैक्षणिक साहित्य प्रदान केले जाईल. पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा दोन गटात होणाऱ्या या स्पर्धेसाठी पहिल्या तीन स्पर्धकांना भरघोस पारितोषिके तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

या स्पर्धेसाठी मार्गदर्शन आणि निवड समितीमध्ये डॉ. अनिल काकोडकर, (अध्यक्ष, गांधी रिसर्च फाउंडेशन) डॉ. सुदर्शन आयंगार, (संचालक, गांधी रिसर्च फाउंडेशन) प्रो.जे. बी.जोशी, (अध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद) डॉ. विपिन कुमार, (संचालक, राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठान) अनंत देशपांडे, (कार्यवाह, मराठी विज्ञान परिषद) या मान्यवरांचा समावेश आहे. स्पर्धकांनी ३० जानेवारीपर्यंत http://gandhifoundation.net/NICF/index.htm या लिंकवर नोंदणी करावी, असे आवाहन जीआरएफ व मराठी विज्ञान परिषदेने केले आहे.