शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

राष्ट्रीय महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 22:02 IST

अपघाताची मालिका सुरूच : चाळीसगाव - धुळे रस्त्याची अवस्था

चाळीसगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ हा चाळीसगाव ते धुळे दरम्यानचा रस्ता अक्षरश: मृत्यूचा सापळा बनला असून या महामार्गावरील वाहतूक दिवसेंदिवस जीवघेणी ठरत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे व काटेरी झुडूपांमुळे गेल्या दोन महिन्यात शेकडो अपघात होवून १५ ते २० जणांचा बळी गेला आहे. महामार्गावरील खड्डे यास बहुतांश कारणीभूत असल्याचे अपघातांच्या मालिकेवरून दिसते.चाळीसगाव-धुळे या रस्त्याची चाळण झाली असून तातडीने डांबरीकरण करण्यात यावे यासाठी प्रशासनाकडे अनेक सामाजिक संघटना व प्रवाशांनी निवेदने दिली आहेत. परंतु प्रशासनाने दखल घेतली नाही. या विभागाकडून काही ठिकाणी दगड टाकून खड्डे बुजवून बोळवण करण्यात येत आहे. दक्षिण व उत्तर भारताला जोडणारा हा प्रमुख महामार्ग असूनदेखील या रस्त्याच्या कामांकडे दुर्लक्ष केले जात आहे. वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. या मार्गावर काटेरी झुडपे व वळणे अधिक असल्याने दोन्ही बाजूंनी रस्त्याच्या कडेला काटेरी झुडपांनी रस्ता झाकला जात आहे. त्यामुळे वाहनधारकांना समोरून येणारे वाहन दिसत नाही. त्यात ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे चुकविण्याच्या नादात वाहन चालकाचे नियंत्रण सुटते आणि अपघात होतात. तसेच काटेरी झुडपांमुळेही अपघात होतात.या रस्त्याची दुरावस्था कधी संपणार, असा सवाल वाहनधारकांतून उपस्थित होत आहे.सात रोजी एक ठारसात जानेवारीला झालेला मेहुणबारे येथील अपघातही याच महामार्गावरील आहे. २८ डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता करगाव येथे कवायत घेण्यासाठी जाणा-या मेहुणबारे येथील केंद्रप्रमुख लखीचंद एकनाथ कुमावत यांना धुळे बायपासजवळ जीव गमवावा लागला होता. याआधीही असे अनेक अपघात झाल्याने या रस्त्यावरून वाहन चालविणे कठीण झाले आहे.