शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
2
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
3
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
4
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
5
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
6
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
7
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
8
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
9
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
10
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
11
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
12
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
13
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
14
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
15
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
16
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
17
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
18
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
19
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
20
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर

राष्ट्रीय महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 22:02 IST

अपघाताची मालिका सुरूच : चाळीसगाव - धुळे रस्त्याची अवस्था

चाळीसगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ हा चाळीसगाव ते धुळे दरम्यानचा रस्ता अक्षरश: मृत्यूचा सापळा बनला असून या महामार्गावरील वाहतूक दिवसेंदिवस जीवघेणी ठरत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे व काटेरी झुडूपांमुळे गेल्या दोन महिन्यात शेकडो अपघात होवून १५ ते २० जणांचा बळी गेला आहे. महामार्गावरील खड्डे यास बहुतांश कारणीभूत असल्याचे अपघातांच्या मालिकेवरून दिसते.चाळीसगाव-धुळे या रस्त्याची चाळण झाली असून तातडीने डांबरीकरण करण्यात यावे यासाठी प्रशासनाकडे अनेक सामाजिक संघटना व प्रवाशांनी निवेदने दिली आहेत. परंतु प्रशासनाने दखल घेतली नाही. या विभागाकडून काही ठिकाणी दगड टाकून खड्डे बुजवून बोळवण करण्यात येत आहे. दक्षिण व उत्तर भारताला जोडणारा हा प्रमुख महामार्ग असूनदेखील या रस्त्याच्या कामांकडे दुर्लक्ष केले जात आहे. वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. या मार्गावर काटेरी झुडपे व वळणे अधिक असल्याने दोन्ही बाजूंनी रस्त्याच्या कडेला काटेरी झुडपांनी रस्ता झाकला जात आहे. त्यामुळे वाहनधारकांना समोरून येणारे वाहन दिसत नाही. त्यात ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे चुकविण्याच्या नादात वाहन चालकाचे नियंत्रण सुटते आणि अपघात होतात. तसेच काटेरी झुडपांमुळेही अपघात होतात.या रस्त्याची दुरावस्था कधी संपणार, असा सवाल वाहनधारकांतून उपस्थित होत आहे.सात रोजी एक ठारसात जानेवारीला झालेला मेहुणबारे येथील अपघातही याच महामार्गावरील आहे. २८ डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता करगाव येथे कवायत घेण्यासाठी जाणा-या मेहुणबारे येथील केंद्रप्रमुख लखीचंद एकनाथ कुमावत यांना धुळे बायपासजवळ जीव गमवावा लागला होता. याआधीही असे अनेक अपघात झाल्याने या रस्त्यावरून वाहन चालविणे कठीण झाले आहे.