शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

नशिराबादकरांना पाणी टंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:15 IST

तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून नशिराबादचा लौकिक आहे. मात्र नियोजनाअभावी दरवर्षी पाणीटंचाईला ग्रामस्थ तोंड देत आहेत. गेल्या वीस ते पंचवीस ...

तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून नशिराबादचा लौकिक आहे. मात्र नियोजनाअभावी दरवर्षी पाणीटंचाईला ग्रामस्थ तोंड देत आहेत. गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थ करीत आहेत. निवडणुकीत ग्रामस्थांना पाणी समस्येवर आश्वासने दिली जातात मात्र आजपर्यंत कायमस्वरूपी पाणी योजना कार्यान्वित झालेले नाही. पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थांच्या पाचवीलाच पुजलेला आहे जानेवारीपासूनच टंचाईची झळ ग्रामस्थांना बसत असते.

जल पातळी खालावल्याने हालअपेष्टा

सध्या गावात बेळी वाघूर, मुर्दापूर, नशिराबाद पेठ या ठिकाणाहून पाणी पुरवठा होत आहे त्यातच गेल्या गेल्या काही दिवसांपासून बेळी येथील वाघूर नदीपात्रातील विहिरीतील पातळी खोल गेल्याने पाणी टंचाईत भर पडली आहे. आता तब्बल नवव्या दिवशी ग्रामस्थांना पाणी मिळते. दरम्यान मुर्दापूर धरणाजवळील विहिरीची जलपातळी वाढत्या उन्हाचे तीव्रतेने खोल जाण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे पाणी टंचाईची भीषणता वाढण्याची शक्यता आहे.

१६ कोटींची योजना पाण्यात...

गावाच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा म्हणून सोळा कोटी रुपयांची पाणी योजना मोठा गाजावाजा करीत कार्यान्वित करण्यात आली मात्र सुरुवातीपासून आतापर्यंत अनेक अडथळ्यांची विघ्न आल्याने शुद्ध पाण्यापासून ग्रामस्थ वंचितच राहिले काही वर्ष ही योजना मर्जीप्रमाणे हाताळली. आता ही योजना ग्रामपंचायतीच्या ताब्यात घेण्यात आली आहे. मात्र या योजनेसाठी लाखो रुपयांची वीज वापरली जाणार असल्यामुळे या योजनेची बिल ग्रामपंचायतीला परवडणारे नाही. त्यामुळे योजना ग्रामपंचायतीला परवडणारी नाही असे म्हटले जात आहे. नाकापेक्षा मोती जड अशी योजना ग्रामस्थांना ठरली आहे.