शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नशिराबादकरांची निवडणुकीसाठी न्यायालयात धाव...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:17 IST

केली आहे. चार जानेवारीला त्याबाबतचा अंतिम निर्णय लागण्याची अपेक्षा आहे. शासन व निवडणूक आयोग यांच्या उदासीनतेमुळे अखेर संतप्त उमेदवारांसह ...

केली आहे. चार जानेवारीला त्याबाबतचा अंतिम निर्णय लागण्याची अपेक्षा आहे.

शासन व निवडणूक आयोग यांच्या उदासीनतेमुळे अखेर संतप्त उमेदवारांसह नागरिकांनी न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. शतकाकडे वाटचाल करणाऱ्या येथील ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली आणि इच्छुकांनी त्याची मोर्चेबांधणी सुरू केली. त्यातच नशिराबाद नगरपंचायतीची कार्यवाही शासन दरबारी सुरू असल्याने ग्रामपंचायत निवडणूक तीन महिने लांबणीवर टाकावी, अशा आशयाची मागणी नगर विकास विभागाने निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यावेळी

नगरविकास खात्याला आयोगाकडून आपण नगरपंचायतीची घोषणा करा, असे पत्र देण्यात आले होते. त्यानुसार २९ डिसेंबर रोजी नगर विकास विभागाने नशिराबाद ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रूपांतर करण्याची उद्घोषणा केली आणि त्याबाबतचे पत्र आयोगाला दिले असल्याचे सांगण्यात येते. मात्र आयोगाने याबाबत कुठलाही निर्णय घोषित न केल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेली आहे. तब्बल ८२ जणांनी आपले नशीब आजमावण्यासाठी उमेदवारी दाखल केली आहे.

याचिका दाखल......

निवडणुकीबाबतचा तिढा तत्काळ निघावा या उद्देशाने येथील इच्छुकांनी उमेदवारांनी औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये धाव घेऊन शनिवारी याचिका दाखल केली आहे. त्याचा अंतिम निर्णय ४ जानेवारी रोजी लागणे अपेक्षित आहे. दरम्यान, शेख अझरुद्दीन शेख अहमद पिंजारी, भूषण बाबुराव पाटील यांनी याचिका दाखल केली आहे. त्यासाठी माजी सरपंच पंकज महाजन, विकास पाटील, विकास धनगर, गणेश चव्हाण, दीपक खाचणे सहकार्य करीत आहेत.

माघारीसाठी सर्व उमेदवारांची वज्रमूठ?

निवडणूक आयोग व शासन यांच्याकडून अद्याप निवडणुकीबाबत तिढा सुटत नसल्यामुळे अखेर गावातील सर्व इच्छुक उमेदवारांनी सामूहिकरीत्या माघारी घेण्याच्या निर्णयाबाबत आज रविवार रोजी दुपारी ४ वाजता बैठकीचे आयोजन केले आहे, अशी माहिती माजी सरपंच पंकज महाजन यांनी ‘लोकमत’ला दिली. यामध्ये

सर्वच इच्छुक उमेदवारांनी एक मुखाने जर माघारी घेतली तर निवडणुकीचा तिढा सुटेल अशी अपेक्षा आहे. यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी व सर्व उमेदवारांना सामूहिक माघारीसाठी आवाहन करण्यात आले आहे.

चर्चांना ऊत

दिवसागणिक निवडणुकीबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. दिवसेंदिवस राजकीय समीकरणे बदलत आहे निवडणूक होणार की नाही, होणार याचा पेच यावर गल्लोगल्ली चर्चा रंगू लागल्या आहेत. निवडणूक आयोग काय निर्णय घेते, शासनाच्या उदासीन धोरणामुळे बाबत सर्वच उमेदवार आज माघारीचा झेंडा रोवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून चर्चा रंगत आहे. निवडणूक कोणती करा; मात्र गावाच्या सर्व समस्या सोडवा

नगरपंचायत करा की ग्रामपंचायत; मात्र आमची पंचायत करू नका, असे खोचक टोला मारीत चर्चा रंगत आहे.