शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

नशिराबादकरांची निवडणुकीसाठी न्यायालयात धाव...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:17 IST

केली आहे. चार जानेवारीला त्याबाबतचा अंतिम निर्णय लागण्याची अपेक्षा आहे. शासन व निवडणूक आयोग यांच्या उदासीनतेमुळे अखेर संतप्त उमेदवारांसह ...

केली आहे. चार जानेवारीला त्याबाबतचा अंतिम निर्णय लागण्याची अपेक्षा आहे.

शासन व निवडणूक आयोग यांच्या उदासीनतेमुळे अखेर संतप्त उमेदवारांसह नागरिकांनी न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. शतकाकडे वाटचाल करणाऱ्या येथील ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली आणि इच्छुकांनी त्याची मोर्चेबांधणी सुरू केली. त्यातच नशिराबाद नगरपंचायतीची कार्यवाही शासन दरबारी सुरू असल्याने ग्रामपंचायत निवडणूक तीन महिने लांबणीवर टाकावी, अशा आशयाची मागणी नगर विकास विभागाने निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यावेळी

नगरविकास खात्याला आयोगाकडून आपण नगरपंचायतीची घोषणा करा, असे पत्र देण्यात आले होते. त्यानुसार २९ डिसेंबर रोजी नगर विकास विभागाने नशिराबाद ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रूपांतर करण्याची उद्घोषणा केली आणि त्याबाबतचे पत्र आयोगाला दिले असल्याचे सांगण्यात येते. मात्र आयोगाने याबाबत कुठलाही निर्णय घोषित न केल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेली आहे. तब्बल ८२ जणांनी आपले नशीब आजमावण्यासाठी उमेदवारी दाखल केली आहे.

याचिका दाखल......

निवडणुकीबाबतचा तिढा तत्काळ निघावा या उद्देशाने येथील इच्छुकांनी उमेदवारांनी औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये धाव घेऊन शनिवारी याचिका दाखल केली आहे. त्याचा अंतिम निर्णय ४ जानेवारी रोजी लागणे अपेक्षित आहे. दरम्यान, शेख अझरुद्दीन शेख अहमद पिंजारी, भूषण बाबुराव पाटील यांनी याचिका दाखल केली आहे. त्यासाठी माजी सरपंच पंकज महाजन, विकास पाटील, विकास धनगर, गणेश चव्हाण, दीपक खाचणे सहकार्य करीत आहेत.

माघारीसाठी सर्व उमेदवारांची वज्रमूठ?

निवडणूक आयोग व शासन यांच्याकडून अद्याप निवडणुकीबाबत तिढा सुटत नसल्यामुळे अखेर गावातील सर्व इच्छुक उमेदवारांनी सामूहिकरीत्या माघारी घेण्याच्या निर्णयाबाबत आज रविवार रोजी दुपारी ४ वाजता बैठकीचे आयोजन केले आहे, अशी माहिती माजी सरपंच पंकज महाजन यांनी ‘लोकमत’ला दिली. यामध्ये

सर्वच इच्छुक उमेदवारांनी एक मुखाने जर माघारी घेतली तर निवडणुकीचा तिढा सुटेल अशी अपेक्षा आहे. यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी व सर्व उमेदवारांना सामूहिक माघारीसाठी आवाहन करण्यात आले आहे.

चर्चांना ऊत

दिवसागणिक निवडणुकीबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. दिवसेंदिवस राजकीय समीकरणे बदलत आहे निवडणूक होणार की नाही, होणार याचा पेच यावर गल्लोगल्ली चर्चा रंगू लागल्या आहेत. निवडणूक आयोग काय निर्णय घेते, शासनाच्या उदासीन धोरणामुळे बाबत सर्वच उमेदवार आज माघारीचा झेंडा रोवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून चर्चा रंगत आहे. निवडणूक कोणती करा; मात्र गावाच्या सर्व समस्या सोडवा

नगरपंचायत करा की ग्रामपंचायत; मात्र आमची पंचायत करू नका, असे खोचक टोला मारीत चर्चा रंगत आहे.