शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
3
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
4
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
5
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
6
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
7
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
8
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
9
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
10
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
11
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
12
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
13
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
14
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
15
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
16
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
17
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
18
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
19
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ

नशिराबादला राजकीय खिचडीला बुडबुडे....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:50 IST

नगरपंचायतीची उद्घोषणा झाली आहे, पण सरकारी काम अन् महिनाभर थांब अशी स्थिती आहे. वॉर्ड रचना, विस्तार हद्द, करप्रणाली कशी ...

नगरपंचायतीची उद्घोषणा झाली आहे, पण सरकारी काम अन् महिनाभर थांब अशी स्थिती आहे. वॉर्ड रचना, विस्तार हद्द, करप्रणाली कशी ठरणार, पुन्हा लोकसंख्या सर्व्हे होणार , या सर्व सरकारी आवश्यक बाबी पूर्ण होण्यासाठी निदान सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागणार. प्रत्यक्षात नगरपंचायत सुरू होण्यासाठी व निवडणुकीसाठी किती महिने जाणार. तो पर्यंत पाणी, रस्ते, पथदीप, बांधकाम परवानगी आदी कामे खोळंबण्याची शक्यता आहे. सद्य:स्थितीत प्रशासक असले तरी त्यांच्याकडे अन्य गावांचा कारभार आहे. त्यात पूर्णतः गावाच्या रचनेची माहिती नाही. जिल्ह्यात मोठे गाव असले तरी वर्षानुवर्षांपासूनचा पाणीप्रश्न सुटला नाही. दर वर्षी जानेवारी ते पाऊस येईपर्यंत पाणीटंचाईशी सामना करावा लागतो. गावात करवसुली कशी होणार, कर्मचारीचे पगार या सर्व प्रश्नांची उत्तर प्रश्नांकित आहे. गाव मोठे, समस्या मोठ्या अशी स्थिती आहे. त्यामुळे दोन वर्षे का होईना ग्रामपंचायत निवडणूक झाली असती तर वॉर्डा वॉर्डात सदस्यांनी कामे मार्गी लावले असते, अशी चर्चा होत आहे.

गाव विकासासाठी एकत्र येतील ना?

ग्रामपंचायत ऐवजी नगरपंचायतीची निवडणूक व्हावी यासाठी मतभेद मनभेद विसरून राजकारण बाजूला सारून गावातील सर्वपक्ष व गावपुढारी एकत्र आले. तसे ग्रामविकासासाठी कायमस्वरूपी एकत्रित येतील ना? असा प्रश्न आणि चर्चा आता रंगू लागले आहे. माघारीच्या नाट्यमय घडामोडी सामूहिक माघारीचा ऐतिहासिक निर्णय याबाबतची खलबते आता होत आहे.

बिनविरोध झालो असतो रे भो.....

८२ पैकी ८१ जणांनी सामूहिक माघारीमध्ये सहभाग घेऊन इतिहास रचला. त्यामुळे ग्रामपंचायतीत एक जागा बिनविरोध झाली असून, १६ जागा रिक्त असल्याने पोटनिवडणूक होईल का तुल्यबळ संख्या नसल्याने होणार नाही ? अशा अनेक शंका व चर्चांना ऊत आलेला आहे. त्यासोबतच अनेक जण मी पण माघारी घेतली नसती तर आज मी पण बिनविरोध झालो असतो अशा चर्चा रंगत आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर विविध वॉर्डात बिनविरोध होण्यासाठी अनेकांनी सुरुवातीला खूप प्रयत्न केले अनेकांची मनधरणी केली मात्र ऐनवेळी सामूहिक माघारीने सर्वांच्या पदरात मात्र निराशा आली.

पोटनिवडणुकीसाठी आता प्रयत्न ?

ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक व्हावी यासाठी आता गावातील काही गट प्रयत्न करीत आहे. त्यासंदर्भात बैठकीचे नियोजन करून शासनाकडे पाठपुरावा करण्याची तयारी दर्शवित आहे. त्यामुळे आता नेमके होते काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र या नाट्यमय घडामोडींमुळे राजकीय चर्चांना बुडबुडे येऊ लागले आहेत. नेमकं होणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, संभ्रमावस्था पुन्हा नव्याने वाढू लागली आहे. यंदाच्या निवडणुकीत अनेक नवे चेहरे निवडणुकीच्या रिंगणात होते. विजयाची माळ आपलीच असे प्रत्येकाच्या मनामनात होते. मात्र गाव हितासाठी सर्वांनीच माघारी दर्शविली.

निकालाची उत्कंठा.....

ग्रामपंचायत निवडणूक रद्द व्हावी, नगरपंचायत उद्घोषणा झाल्यामुळे आता नगरपंचायतीची निवडणूक व्हावी याकरिता औरंगाबाद हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. निकालाची उत्कंठा आहे. माघारीच्या घडामोडींमुळे होणारा संभ्रम वाढला आहे. त्यामुळे आता पुन्हा निवडणूक कोणती होणार? याविषयीची उत्सुकता असून, न्यायालयाच्या निकालाची सर्वांना प्रतीक्षा आहे.

कोरम नसल्याने बरखास्तीची शक्यता?

१६ जागा रिक्त असून, एक बिनविरोध झाली. मात्र कोरम पूर्ण नसल्याने ही ग्रामपंचायत बरखास्त होण्याची शक्यता वर्तविला जात आहे व चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे संभ्रम पुन्हा नव्याने घर करत आहे. निवडणुकीच्या सारीपाटाचा बेरंग झाला. निवडणुकीचे राजकारण तर झाले नाही ना? अशा आता कोपरखळ्या व चर्चा रंगू लागल्या आहेत.

मनधरणी ते मनस्ताप

सामूहिक माघारीकरिता गावातील अनेक दिग्गजांनी सर्वच उमेदवारांची मनधरणी केली होती. मात्र आपल्याही गावची ग्रामपंचायत निवडणूक झालीच पाहिजे होती. अशा आता चर्चेमुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा सूर उमटून येत आहे.