शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:15 IST

जळगाव - शिवाजी नगर ते जिल्हा परिषदपर्यंत लवकरच तयार होणाऱ्या नवीन उड्डाणपुलाला ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ असे नाव द्यावे, ...

जळगाव - शिवाजी नगर ते जिल्हा परिषदपर्यंत लवकरच तयार होणाऱ्या नवीन उड्डाणपुलाला ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ असे नाव द्यावे, अशी लेखी मागणी पत्राद्वारे मराठी प्रतिष्ठानतर्फे करण्यात आली आहे. याबाबत प्रतिष्ठानतर्फे महापौर भारती सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. येत्या महासभेत विषय पटलावर हा विषय अग्रक्रमाने घ्यावा, अशी मागणी मराठी प्रतिष्ठानतर्फे महापौरांना करण्यात आली आहे.

प्रभाग ११, १२ मध्ये रस्ते दुरुस्तीला सुरुवात

जळगाव - शहरातील मुख्य वर्दळीचा रस्ता असलेल्या काव्यरत्नावली चौक ते रामानंद नगर स्टॉप रस्ता दुरुस्तीच्या कामाला गुरुवारी महापौर भारती सोनवणे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. गिरणा टाकीजवळ पूजा करून नारळ वाढवून कामाचा शुभारंभ झाला. कामाच्या शुभारंभप्रसंगी महापौर भारती सोनवणे, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, गायत्री राणे, पार्वता भील, नितीन बरडे, अनंत जोशी, संतोष पाटील, अजित राणे आदी उपस्थित होते.

कॅन्सर ट्युमर, लिव्हर फंक्शन टेस्ट तपासणी

जळगाव - माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांच्यातर्फे शनिवारी छत्रपती शाहू महाराज मार्केटमध्ये साई व्हीजनच्या कार्यालयात सिकल सेल, अनेमिया, कॅन्सर ट्युमर, लिव्हर फंक्शन टेस्ट, थायरॉईड, किडनी फंक्शन, शुगर लेव्हर तपासणी शिबिराचे आयोजन सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

कालंका माता चौक परिसरातील अतिक्रमण काढले

जळगाव - मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून गुरुवारी कालंका माता चौक ते का. ऊ. कोल्हे विद्यालय दरम्यानच्या अतिक्रमणावर जोरदार कारवाई करण्यात आली. या समांतर रस्त्यालगतदेखील मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांनी कब्जा केला आहे. यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. गुरुवारी दुपारी १२ नंतर या भागात कारवाई करण्यात आली. यावेळी काही विक्रेत्यांचा मालदेखील जप्त करण्यात आला तर काहींशी वाददेखील झाला.

थंडी परतली, पारा १२ अंशावर

जळगाव - गेल्या आठवड्यापासून गायब झालेल्या थंडीचे पुनगरागमन झाले आहे. मंगळवारी १८ अंश असलेले तापमान गुरुवारी १२ अंशापर्यंत खाली आले आहे. यामुळे थंडीची ही लाट पुन्हा काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. किमान तापमानासोबत कमाल तापमानातही घट झाली असून, पारा ३१ अंशापर्यंत खाली आला आहे. अजून तीन दिवस तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.