शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

कर्जमाफीसाठी नाव आले खरे मात्र ऑनलाईन प्रक्रियेविना लाभापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:40 IST

जळगाव : शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा होऊन दोन वर्षांपेक्षा अधिक काळ उलटला तरी जिल्ह्यातील मयत ...

जळगाव : शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा होऊन दोन वर्षांपेक्षा अधिक काळ उलटला तरी जिल्ह्यातील मयत शेतकऱ्यांच्या वारसांना अद्यापही या कर्जमाफीची प्रतीक्षा कायम असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात जवळपास अडीच हजार वारसदार कर्जमुक्तीच्या प्रतीक्षेत असून वारंवार पाठपुरावा करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे. अशाच प्रकारे भादली बु. येथील प्रमोद चावदस पाटील यांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळालेला नाही. विशेष म्हणजे कर्जमाफीच्या यादीत त्यांचे नाव आले खरे मात्र ऑनलाईन प्रक्रियेविना ते लाभापासून वंचित असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

प्रमोद पाटील यांची सव्वा दोन एकर शेती असून कोरडवाहू जमीन असल्याने निसर्गाच्या लहरीपणामुळे त्यांना वारंवार नापिकी व इतर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या दरम्यान २०१६मध्ये पाटील यांनी जिल्हा बँकेकडून पीक कर्ज घेतले व त्याच वर्षी चावदस पाटील यांचे निधन झाले. त्यानंतर शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत चावदस पाटील यांचे नाव यादीत आले. मयत शेतकऱ्यांची माहिती एकत्रित करून जिल्हा बँकेने प्रमोद पाटील यांचे नाव या योजनेत समाविष्ट केले. मात्र त्यानंतर आधार क्रमांक, अर्ज दाखल करून घेणे अशी ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाली नाही व कर्जमाफीचाही लाभ मिळाला नाही.

जिल्ह्यात अडीच हजार वारसदार वंचित

या संदर्भात प्रमोद पाटील यांनी सहकार मंत्री, विरोधी पक्षनेते यांना निवेदन दिले असून मयत शेतकऱ्यांचे वारसदार म्हणून कर्जमाफीचा लाभ मिळावा व नवीन पीक कर्ज मिळावे, अशी मागणी केली आहे. जळगाव जिल्ह्यात जवळपास अडीच हजार तर खान्देशात पाच हजार शेतकऱ्यांच्या वारसांना कर्जमाफीची प्रतीक्षा असल्याचे चित्र आहे.