शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
2
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
3
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
4
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
5
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
6
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
7
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
8
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
9
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
10
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
11
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
12
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
13
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
14
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
15
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
16
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
17
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
18
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
19
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
20
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान

बेलगंगेच्या सातबारा उताऱ्यावर ‘अंबाजी’चे नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 18:37 IST

हरकती फेटाळल्या : चाळीसगावव तालुक्याच्या आशा पल्लवित

चाळीसगाव, जि.जळगाव : बेलगंगा साखर कारखान्याच्या सातबारा उताºयावर अखेर ‘अंबाजी शुगर इंडस्ट्रीज’चे नाव लागले असून येत्या हंगामात कारखान्यातून गाळप सुरु व्हावे, अशा अपेक्षा तालुकाभरातून पल्लवित झाल्या आहेत. मुख्य प्रवर्तक चित्रसेन पाटील यांना मंगळवारी महसूल विभागाने पत्र दिले असून सर्व हरकती फेटाळून लावल्या आहेत. ही प्रक्रिया सहा महिने चालली.जिल्हा मध्यवर्ती बँकेची मालकी असणारा बेलगंगा साखर कारखाना अंबाजी ग्रुपने लिलावात ४० कोटी रुपयांना विकत घेतला. यासाठी भूमीपुत्रांची साखळी जोडून रक्कम संकलित केली गेली. ११ जानेवारी रोजी हस्तांतर प्रक्रियादेखील पूर्ण झाली. मात्र विक्री प्रक्रियेवर हरकती घेतल्याने सातबाºयावर अंबाजीचे नाव लागले नव्हते. मंगळवारी महसूल विभागाने सातबाºयावर नाव लागल्याचे पत्र दिले. यानंतर अंबाजीच्या नावाचा आॅनलाईन सातबारा उताराही काढण्यात आला.हरकती फेटाळल्या, आशा पल्लवितबेलगंगा विक्री प्रक्रियेवर एकूण सात हरकती घेण्यात आल्या होत्या. हरकतींवर दोन ते अडीच महिने तहसीलदारांसमोर सुनावणी देखील झाली. या सर्व हरकती फेटाळण्यात आल्याने बेलगंगेच्या उताºयावर ‘अंबाजी’चे नाव लावण्यात आले. या सर्व प्रक्रियेत सहा महिने गेले.चाळीसगाव तालुक्यात सद्य:स्थितीत मोठ्या प्रमाणावर ऊस उभा आहे. गेल्या महिन्यात कारखान्यात रोल आणि गव्हाणीचे पूजन झाले. ऊसतोड मजुरांशी करारही करण्यात आला असून, त्यांना चार कोटी रुपये वाटण्यात आले आहे. कारखाना ट्रायल सिझनसाठी सज्ज होत आहे. त्यामुळे येत्या हंगामात कारखान्यातून गाळप व्हावे. अशा अपेक्षा व्यक्त होत आहे.२००९ मध्ये कारखान्याचे गाळप सुरू असतानाच त्याला कुलूप लागले. मध्यंतरीच्या १० वर्षात तालुक्याचे राजकारण कारखान्याभोवती फिरत राहिले. निवडणुकींचे जाहीरनामे असो की भाषणे बेलगंगेचा नुसता जप झाला. पदयात्राही निघाल्या. मात्र कारखान्याचे कुलूप उघडले गेले नाही, ही वस्तुस्थिती आहे.माजी चेअरमन चित्रसेन पाटील यांनी भूमीपुत्रांना एकत्र करुन लोकसहभागातून कारखाना विकत घेतला. यामुळे तालुक्याच्या राजकीय सारीपाटावर मोठी कलाटणी मिळण्याचे स्पष्ट संकेत दिसू लागले आहे. उंबरठ्यावर आलेल्या लोकसभा आणि पुढील वर्षी होणाºया विधानसभेच्या निवडणुकीत ‘बेलगंगे’च्या नावाने ‘चांगभलं’ होणार असल्याचे सूरदेखील आत्तापासूनच उमटू लागले आहे.बेलगंगा ते अंबाजी१९७८ मध्ये पहिल्यांदा बेलगंगा कारखान्यातील यंत्रे फिरली. तालुक्यात गोड अर्थकारणासह उन्नत्तीचा पाया रचला गेला. गेल्या ४० वर्षाच्या कालखंडात कारखान्यात अनेक स्थित्यंतरे घडून आली. एकेकाळी चाळीसगाव तालुक्यासाठी ‘कुबेर’ ठरलेला हा कारखाना दहा वर्षे बंदही राहिला. येत्या गाळप हंगामासाठी कारखाना सज्ज होत असतांना चाळीस वर्षाच्या प्रवासाला उजाळा मिळणार आहे.नाव असेल ‘बेलगंगा’चबेलगंगा या नावाशी तालुक्याचे भावनिक नाते जुळले आहे. ‘बेलगंगा’ ही एक अमीट ओळख असून कारखाना विकत घेतला असला तरी त्याचे नाव बदलणार नाही. यापुढेही ‘बेलगंगा’ हे नाव कायम राहणार आहे.- चित्रसेन पाटीलमाजी चेअरमन, बेलगंगा साखर कारखाना, चाळीसगाव