शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

ईशान्येकडील लोकांबाबत चुकीचा समज: मीरा कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 12:25 IST

डॉ.आचार्य ‘अविनाशी सेवा’ पुरस्कार विजेत्यांनी साधला संवाद

ठळक मुद्दे २० वर्षे आसाममध्ये सेवाकार्य प्राचार्यांचा विद्यार्थ्यासाठी १५६ किमी पायी प्रवास महिला-पुरूष भेदभाव नाही

जळगाव : ईशान्य भारतातील नागरिक भारतापासून स्वत:ला वेगळे समजतात, त्यांची भूमिका भारतविरोधी असल्याचा समज चुकीचा असून काही खास प्रशिक्षीत केलेल्या ठराविक गटांकडूनच हा अपप्रचार केला जात आहे. याउलट या भागातील नागरिक मनमिळावू असून नवीन माणसांना लगेचच सामावून घेतात, असे प्रतिपादन डॉ.आचार्य ‘अविनाशी सेवा’ पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्त्या मीरा कुलकर्णी यांनी केले.पुरस्कारवितरण सोहळ्यापूर्वी रविवार, ४ मार्च रोजी सकाळी पुरस्कारप्राप्त मीरा कुलकर्णी व दीनदयाल बहुउद्देशीय प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप वडनेरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर दीनदयाल मंडळाचे समन्वयक गजानन पळसोदकर, तसेच केशव स्मृती सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर हे देखील उपस्थित होते.मूळच्या जळगावच्या व गेली २० वर्षे आसाममध्ये सेवाकार्य करणाºया मीरा रघुनाथ कुलकर्णी यांना वैयक्तिक गटात तर यवतमाळच्या दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळाला संस्था गटात हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्या सोहळ्यानिमित्त जळगावात आलेल्या कुलकर्णी व वडनेरकर यांनी पत्रकारांशी मनमोकळेपणाने संवाद साधत त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती व अनुभव कथन केले.२० वर्षे आसाममध्ये सेवाकार्यमीरा कुलकर्णी म्हणाल्या की, भारत परिक्रमेची काही व्याख्याने १९९३ मध्ये मु.जे. महाविद्यालयात शिकत असताना ऐकली. तेव्हाच विवेकानंद केंद्राचे पूर्णकालीन काम करण्याचा निर्धार त्यांनी केला. १९९७ पासून त्यांनी या कामाला सुरूवात केली. १९९८ मध्ये आसामला गोलाघाट येथे कामाला प्रारंभ केला.सुरूवातीला तेथे विवेकानंद केंद्राच्या शाळेत अकाऊंटचे व नंतर शिकविण्याचेही काम पार पाडले. त्यानंतर जोरघाट येथे संघटक तर दिब्रुगढ येथे प्रांत संघटक म्हणून काम केले. आजपर्यंत प्रांतसंघटक म्हणून कार्यरत आहेत. या सामाजिक कार्यादरम्यान नागरिकांशी सहज संवाद साधता यावा, यासाठी त्यांनी आसामी भाषाही आत्मसात केली.कुलकर्णी यांनी एकदा दिब्रुगडहून खेमाजीला ब्रम्हपुत्रानदीतून ३ तासांचा प्रवास करून जातानाचा आलेला अनुभव सांगितला. या ठिकाणचे लोक अत्यंत साधे, सरळ व अनोळखी लोकांनाही लगेचच आपलेसे करून घेणारे असल्याचे कुलकर्णी यांनी आवर्जून सांगितले. या ठिकाणी आता शिक्षणााचा प्रसार चांगल्यापैकी होत असून सुविधा उपलब्ध होत असल्याचे सांगितले.प्राचार्यांचा विद्यार्थ्यासाठी १५६ किमी पायी प्रवासआसाम, अरूणाचलप्रदेशमधील बहुतांश भाग हा दुर्गम डोंगर-दºयांनी वेढलेला असल्याने भूस्खलन नेहमीच होत असते. अशावेळी रस्ते बंद होऊन वाहनांची ये-जा थांबते. अरूणाचल प्रदेशात एकदा असाच प्रसंग उद्भवलेला असताना विवेकानंद केंद्राच्या शाळेतील एका विद्यार्थ्याची विज्ञान स्पर्धेसाठी निवड झालेली होती. त्यामुळे प्राचार्य त्या विद्यार्थ्याला घेऊन १५६ किमी पायी चालत गेले. शिक्षणासाठी एवढी पायपीट केल्याचे अलिकडच्या काळातील हे एकमेव उदाहरण असावे, असेही त्यांनी सांगितले.महिला-पुरूष भेदभाव नाहीतुम्हाला आसामसारख्या परक्या राज्यात सामाजिक कार्याला सुरूवात करताना स्त्री म्हणून काही अडचणी आल्या का? असे विचारले असता मीरा कुलकर्णी म्हणाल्या की, ईशान्येकडील राज्यांमध्ये महिला व पुरूष असा भेद फारच कमी प्रमाणात बघावयास मिळतो. तेथे स्त्रीयांना मानाचे स्थान आहे.पारधी समाज परिवर्तनाच्या वाटेवरलोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : यवतमाळ जिल्ह्यातील पारधी समाजाच्या विकासासाठी प्रकल्पराबविण्याच्या उद्देशानेच स्थापन झालेल्यादीनदयाल बहुउद्देशीय प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप वडनेरकर म्हणाले की, बेड्यांवर (वस्त्या) राहणारा पारधी समाज मुख्य प्रवाहापासून आजही दूर आहे. या समाजात शिक्षण, आरोग्य याचा लवलेशही नाही. आंघोळ माहिती नाही. पाऊस पडून ओला झाला तरच आंघोळ, अंगात घातलेला कपडा फाटेपर्यंत अंगातून काढायचाच नाही, असाच जणू समज. अशा या मागासलेल्या समाजात अनिष्ट रूढीही मोठ्या प्रमाणावर. असा हा अशिक्षीत, मागास समाज केवळ पोटभरण्यासाठी गुन्हेगारी कृत्य करीत असे. यवतमाळ येथे एका मैदानावर वर्षानुवर्षांपासून उघड्यावरच वास्तव्य करणाºया या समाजाच्या कुटुंबांकडे पाहून या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काहीतरी करावे, असे ठरवून दीनदयाल मंडळाची स्थापना केली. या समाजात शिक्षीत, सुसंस्कारीत लोक निर्माण केले, की ते समाजाला पुढे नेतील, या उद्देशाने सुरूवातीला जेमतेम ५ मुले आणून छात्रावासाची सुरूवात केली. ती मुलेही पळून जात. मात्र नंतर या उपक्रमात हळूहळू यश येत गेले. आज २० वर्षात मोठे परिवर्तन सुरू झालेले दिसत आहे. मुले चांगली शिक्षीत, संस्कारी व्हायला लागली. आता तेच आपले गाव, घर चांगल करतील, या उद्देशाने ३०० विद्यार्थ्यांना शिकविले. त्यातील १६५ विद्यार्थी तर दीनदयाल बहुउद्देशीय प्रसारक मंडळाचेच कार्यकर्ते म्हणून काम करीत आहेत. पारधी समाजात आरोग्याबाबत जनजागृती व्हावी, यासाठी ३५ बेड्यांवर आरोग्य रक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. तसेच हा पारधी समाज हिंदू समाजाचाच भाग असल्याची जाणीव व्हावी, यासाठी बेड्यांवर जाऊन दिवाळी साजरी करण्याचा उपक्रमही साजरा केला जात असल्याचे सांगितले.आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतयवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे. आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबाला, त्यांच्या मुलांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे कामही मंडळ करीत आहे. ४०० कुटुंबांना दत्तक घेतले आहे. तर दरवर्षी ५० मुलांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीही दिली जात असल्याचे प्रदीप वडनेरकर यांनी सांगितले. शेती संशोधनासाठी केंद्र सुरू केले असून दोन आयआयटीयन्सदेखील आले असल्याचे त्यांनी सांगितले.