शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मनपा कर्मचाऱ्यांना काम दाखविल्याशिवाय मिळणार नाही दाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या चार वर्षांपासून मनपा कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर मनपा कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या चार वर्षांपासून मनपा कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर मनपा कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र वेतन आयोग लागू करण्यासाठी मनपाला काही अटी व नियम घालून दिले आहेत. या नियमांची पूर्तता केल्याशिवाय मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होणे सध्या तरी कठीण दिसून येत आहे. तसेच यासाठी मनपा कर्मचाऱ्यांना झोकून देऊन काम करावे लागणार असून, काम दाखविल्याशिवाय वाढीव दाम मिळणार नाही अशाच अटी शासनाने घालून दिल्या आहेत.

याबाबत सोमवारी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी मनपा कर्मचारी व अधिकाऱ्यांची आयुक्त दालनात बैठक घेतली. या बैठकीत उपायुक्त श्याम गोसावी, प्रशांत पाटील, संतोष वाहूळे, विद्या गायकवाड, वित्त व लेखा अधिकारी कपील पवार यांच्यासह मनपातील सर्व प्रभाग समितीचे अधिकारी, मुख्य अभियंता उपस्थित होते. शासनाने मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे. मात्र, मनपाला यासाठी काही अटींचे पालन करावे लागणार आहे. याबाबत मनपा आयुक्तांनी या बैठकीत सर्व अधिकाऱ्यांना याबाबतची कल्पना दिली.

झोकून देऊन काम करा, अटींची पूर्तता करून दाखवा

मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी या बैठकीत मनपा कर्मचाऱ्यांनी निराश होण्याची गरज नसल्याचे सांगत, जर सर्वांनी झोकून काम केले, तर निश्चितच सातव्या वेतन आयोगाचा आपल्याला लाभ मिळू शकते, असे आयुक्तांनी सांगितले. शासनाने काही अटी लावल्या आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी वेळ द्यावा लागेल, तसेच काही बाबींची पूर्तता कराव्या लागतील यासाठी प्रयत्न करू, असेही आयुक्तांनी या बैठकीत सांगितले.

या अटी-शर्तींची करावी लागणार पूर्तता

१.सातव्या वेतन आयोगानुसार निश्चित करण्यात येणाऱ्या वेतनश्रेणी राज्य शासनाकडील समकक्ष पदांना लागू करण्यात आलेल्या वेतनश्रेणीपेक्षा अधिक असणार नाहीत.

२. मनपाकडील विकासकामे, विकासकामांसाठी घेतलेले कर्ज आणि व्याज यांच्या परतफेडीसाठी मनपाकडे पुरेसा निधी असणे आवश्यक गरजेचे.

३. शहरातील सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण करून सप्टेंबर २०२१ पर्यंत १०० टक्के मालमत्ता कराच्या कक्षेत आणाव्या लागतील.

४. सातवा वेतन आयोगाचा लाभ केवळ मंजूर पदावरील कर्मचारी व अधिकाऱ्यांना मिळणार.

५. महापालिकेला डिसेंबर २०२१ पर्यंत मालमत्ता कराची ९० टक्के रक्कम वसूल करणे बंधनकारक राहणार आहे.

६. पाणीपट्टीच्या ९० टक्के रक्कम संबंधित पाणीपुरवठा योजनेची सुधारणा, पाणीपुरवठा विषयक आवश्यक कामे यावरच खर्च करणे बंधनकारक राहील.