शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी महापालिकेचे सहा पथके राहणार तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव- शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून शुक्रवार ते रविवार दरम्यान जनता कर्फ्यू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव- शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून शुक्रवार ते रविवार दरम्यान जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. यादरम्यान शहरात कोणत्याही भागात गर्दी होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने महापालिका प्रशासनावर ही जबाबदारी सोपवली आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने देखील जनता कर्फ्यू दरम्यान शहरात गर्दी होणार नाही. यासाठी महापालिका प्रशासनाकडून सहा पथके तयार करण्यात आली आहेत. यामध्ये प्रभाग समिती अधिकाऱ्यांसह उपायुक्त संतोष वाहूळे यांच्यावर देखील जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

जनता कर्फ्यू दरम्यान शहरातील अत्यावश्यक सुविधे व्यतिरिक्त इतर व्यवसायिक दुकाने व इतर अस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. तरीही जनता कर्फ्यू दरम्यान इतर आस्थापने व दुकाने सुरू असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. महापालिकेचा सहा पथकामध्ये एकूण १५० जणांचा समावेश आहे. प्रत्येक पथकात २५ कर्मचाऱ्यांचा समावेश राहणार आहे. तसेच कोणत्याही भाजीपाला मार्केट मध्ये किंवा शहरातील रस्त्यांवर देखील गर्दी झाल्यास महापालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे.

मुख्य भागासह उपनगरांमध्ये ही राहणार लक्ष

महापालिका प्रशासनाच्या पथकाकडून शहरातील मुख्य भागासह उपनगरांमधील भागात देखील गर्दी होणार नाही किंवा इतर दुकाने सुरू राहणार नाहीत याची खबरदारी घेतली जाणार आहे. मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी शहरातील विविध भागात फिरणार असून, गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचे काम करणार आहेत. यासह जिल्हा पोलिस प्रशासनाचे कर्मचारी देखील या कामी नियुक्त करण्यात आले आहेत.