शहरं
Join us  
Trending Stories
1
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
2
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
3
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
4
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
5
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
6
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
7
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
8
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
9
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
10
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
11
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
12
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
13
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
14
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
15
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
16
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
17
अजितदादांचे मत अन् निधीबाबत विधान, CM फडणवीसांचे थेट भाष्य; म्हणाले, “त्यांचा उद्देश...”
18
शरद मोहोळ हत्येतील पिस्तूल उमरटी गावातील; पुणे पोलिसांची मध्य प्रदेशमध्ये जबरदस्त कारवाई
19
फेसबुक मैत्री नडली! फेक ट्रेडिंग ॲपवर २.९० कोटींचे इन्व्हेस्टमेंट, नोएडात व्यापाऱ्याला महिलेनं 'असं' लुटलं
20
मोबाईल दिला नाही आणि आठवीत शिकणाऱ्या दिव्याने पाळण्याच्या दोरीनेच मृत्यूला मारली मिठी, नागपुरमधील चिंताजनक घटना
Daily Top 2Weekly Top 5

यावलच्या पालिका विद्यालयात बेकायदेशीर शिक्षकेतर भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 22:03 IST

आर्थिक आमिषापोटी संगनमत करून ही भरती केल्याचा आरोप आहे.

यावल : शिक्षण विभागाची परवानगी न घेता येथील पालिका पालिका संचलित साने गुरुजी माध्यमिक विद्यालयात बेकायदेशीर शिक्षकेतर नोकर भरती केल्याचा आरोप विरोधी गटाचे नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला असून, आचारसंहितेत मागील तारखावर कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रे देवून आचारसंहितेचाही भंग केला आहे. याप्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करण्याची व भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी पाटील यांच्यासह विरोधी गटाच्या सात नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मात्र सत्ताधाऱ्यांनी या बाबीचा इन्कार केलाआहे.सानेगुरुजी विद्यालयात कनिष्ठ लिपिक व प्रयोगशाळा सहाय्यक पदाच्या तीन अशा चार जागांसाठी शालेय समितीने भरती प्रक्रिया राबवली. गेल्या महिन्यात ८ मार्चला संबंधित इच्छुक उमेदवारांच्या लेखी व तोंडी स्वरूपात मुलाखती घेण्यात आल्या. या भरती प्रक्रीयेस शासनाच्या शिक्षण विभागाची (ना हरकत प्रमाणपत्र ) परवानगी घेण्यात आली नसल्याचा दावा नगरसेवक अतुल पाटील यांनी केला. त्यामुळेच ही नोकर भरती बेकायदेशीर असून शालेय समिती अध्यक्ष तथा नगरसेवक दीपक बेहेडे व सचिव तथा मुख्याध्यापक एस.आर.वाघ यांनी आर्थिक आमिषापोटी संगनमत करून ही नोकर भरती केल्याचा आरोप आहे.त्यांची प्रत्यक्ष नेमणूक २८ मार्चला झाली आहे. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू असताना नोकरभरतीमुळे आचारसंहितेचा भंग झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर अतुल पाटील, उपनगराध्यक्ष राकेश कोलते, नगरसेवक पौर्णिमा फालक, रुखमाबाई भालेराव, देवयानी महाजन, रेखा चौधरी, नौशाद तडवी, शेख असलम शेख नबी यांच्या स्वाक्षºया आहेत. गिरीश महाजन, गणेश महाजन, मुबारक तडवी आदी उपस्थित होते.फेब्रुवारी महिन्यात विद्यार्थ्यासह काही पालकांनी शाळेकडे लेखी अर्ज दिला होता की, शाळेत एकही प्रयोगशाळा सहाय्यक नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या उद्देशानेच प्रशासनाकडे नोकर भरतीबाबात प्रस्ताव पाठवला. स्मरणपत्रेही दिले. रीतसर जाहिरातीचा तसेच निवड प्रक्रियेचा अहवाल सादर केला आहे आणि शासनाकडून निवड केलेल्या उमेदवारांच्या पदास मंजुरी मिळत नाही तोपर्यंत विनापगारी काम करावे लागेल, असे हमीपत्र उमेदवारांकडून घेतले आहे. शेवटी विद्यार्थ्यांच्या हितासाठीच सर्वानुमते बैठक घेऊन हा निर्णय घला आहे.-दीपक बेहेडे, अध्यक्ष, शालेय समिती