शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

यावलच्या पालिका विद्यालयात बेकायदेशीर शिक्षकेतर भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 22:03 IST

आर्थिक आमिषापोटी संगनमत करून ही भरती केल्याचा आरोप आहे.

यावल : शिक्षण विभागाची परवानगी न घेता येथील पालिका पालिका संचलित साने गुरुजी माध्यमिक विद्यालयात बेकायदेशीर शिक्षकेतर नोकर भरती केल्याचा आरोप विरोधी गटाचे नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला असून, आचारसंहितेत मागील तारखावर कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रे देवून आचारसंहितेचाही भंग केला आहे. याप्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करण्याची व भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी पाटील यांच्यासह विरोधी गटाच्या सात नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. मात्र सत्ताधाऱ्यांनी या बाबीचा इन्कार केलाआहे.सानेगुरुजी विद्यालयात कनिष्ठ लिपिक व प्रयोगशाळा सहाय्यक पदाच्या तीन अशा चार जागांसाठी शालेय समितीने भरती प्रक्रिया राबवली. गेल्या महिन्यात ८ मार्चला संबंधित इच्छुक उमेदवारांच्या लेखी व तोंडी स्वरूपात मुलाखती घेण्यात आल्या. या भरती प्रक्रीयेस शासनाच्या शिक्षण विभागाची (ना हरकत प्रमाणपत्र ) परवानगी घेण्यात आली नसल्याचा दावा नगरसेवक अतुल पाटील यांनी केला. त्यामुळेच ही नोकर भरती बेकायदेशीर असून शालेय समिती अध्यक्ष तथा नगरसेवक दीपक बेहेडे व सचिव तथा मुख्याध्यापक एस.आर.वाघ यांनी आर्थिक आमिषापोटी संगनमत करून ही नोकर भरती केल्याचा आरोप आहे.त्यांची प्रत्यक्ष नेमणूक २८ मार्चला झाली आहे. जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू असताना नोकरभरतीमुळे आचारसंहितेचा भंग झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर अतुल पाटील, उपनगराध्यक्ष राकेश कोलते, नगरसेवक पौर्णिमा फालक, रुखमाबाई भालेराव, देवयानी महाजन, रेखा चौधरी, नौशाद तडवी, शेख असलम शेख नबी यांच्या स्वाक्षºया आहेत. गिरीश महाजन, गणेश महाजन, मुबारक तडवी आदी उपस्थित होते.फेब्रुवारी महिन्यात विद्यार्थ्यासह काही पालकांनी शाळेकडे लेखी अर्ज दिला होता की, शाळेत एकही प्रयोगशाळा सहाय्यक नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या उद्देशानेच प्रशासनाकडे नोकर भरतीबाबात प्रस्ताव पाठवला. स्मरणपत्रेही दिले. रीतसर जाहिरातीचा तसेच निवड प्रक्रियेचा अहवाल सादर केला आहे आणि शासनाकडून निवड केलेल्या उमेदवारांच्या पदास मंजुरी मिळत नाही तोपर्यंत विनापगारी काम करावे लागेल, असे हमीपत्र उमेदवारांकडून घेतले आहे. शेवटी विद्यार्थ्यांच्या हितासाठीच सर्वानुमते बैठक घेऊन हा निर्णय घला आहे.-दीपक बेहेडे, अध्यक्ष, शालेय समिती