शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

हंजीर बायोटेकने थकविलेले महावितरणचे बील भरणार मनपा प्रशासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील आव्हाणे शिवार भागातील मनपाच्या घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी तब्बल सात वर्षांपासून वीज पुरवठा नसून, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील आव्हाणे शिवार भागातील मनपाच्या घनकचरा प्रकल्पाच्या ठिकाणी तब्बल सात वर्षांपासून वीज पुरवठा नसून, २०१३ मध्ये हंजीर बायोटेक कंपनीने महावितरणचे ७ लाख ५६ हजार रुपयांचे बील थकविल्याने महावितरण प्रशासनाने मनपा प्रशासनाला याठिकाणी नवीन वीज कनेक्शन द्यायला नकार दिला आहे. दरम्यान, मनपाला आता पुढील कामासाठी वीज पुरवठा आवश्यक असल्याने हंजीर बायोटेक कंपनीने थकविलेले महावितरणचे बील आता मनपा प्रशासनाला भरावे लागणार आहे.

२०१३ मध्ये मनपा प्रशासनाने शहरातील जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी हंजीर बायोटेक कंपनीला ठेका दिला होता. मात्र, हे काम अपुर्णावस्थेत सोडून हंजीर बायोटेकने हे काम थांबविले होते. याबाबत संबधित ठेकेदार व मनपा प्रशासनामध्ये याबाबत न्यायालयात एकमेकांविरोधात दावा दाखल आहे. दरम्यान, २०१३ मध्ये प्रकल्पाच्या ठिकाणी काम करण्यासाठी हंजीर बायोटेक कंपनीने महावितरणकडून वीज कनेक्शन घेतले होते. मात्र, महावितरणचे बील संबधित कंपनीने भरले नव्हते. ही जागा मनपा प्रशासनाच्या मालकीची असल्याने या जागेवरून वापरण्यात आलेल्या वीज बीलाची रक्कम ही मनपाकडून वसुल केली जाणार आहे.

७ लाखांचे बील १५ लाखांवर

मनपा प्रशासनाने हे बील भरण्यास नकार दिला होता. महावितरणने हे बील हंजीरकडून वसुल करण्याबाबत सांगितले होते. मात्र, महावितरणने नकार दिला आहे.आता पुढील प्रकल्पाच्या ठिकाणी नव्याने वीज कनेक्शन आवश्यक असून, बील न भरल्याने महावितरण प्रशासनाने याठिकाणी वीज कनेक्शन द्यायला नकार दिला आहे. २०१३ मध्ये हंजीरकडे ७ लाख ५६ हजार रुपयांचे वीज बील थकीत होते. मात्र, आता दंडाची रक्कम मिळून आता १५ लाख ५२ हजार रुपयांपर्यंत पोहचली आहे. पालकमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत यावर तोडगा काढून मनपाने ११ लाख रुपयांचे बील महावितरणला अदा करण्याचा निर्णय घेतला आहे.

मनपा हंजीरकडून वसुल करणार बीलाची रक्कम

हंजीर बायोटेक कंपनीने थकविलेले बील मनपा प्रशासनाला भरावे लागणार असून, ही रक्कम हंजीरकडून वसुल करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. मात्र, याआधी हंजीरसोबत वाद सुरु असून, ही रक्कम वसुल होणे कठीण असल्याने, मनपाला ११ लाख रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. हे बील न भरल्यास मनपाला प्रकल्पाच्याठिकाणी वीज कनेक्शन भेटणे कठीण होईल.