शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

'तिकिटा'साठी इच्छुकांची सुरू मुंबई वारी

By admin | Updated: July 28, 2014 13:56 IST

विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांकडून मुंबई वारी सुरू असून नारायण राणे यांचे सर्मथक माजी आमदार रामकृष्ण पाटील यांची उमेदवारीसाठी 'फिल्डिंग' लावली आहे.

भिका पाटील■ शिंदखेडा
 
तालुक्यात विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांकडून मुंबई वारी सुरू आहे. त्यात नारायण राणे यांचे सर्मथक माजी आमदार रामकृष्ण पाटील यांची उमेदवारीसाठी 'फिल्डिंग' लावणे सुरू आहे. तेही मुंबईत तळ ठोकून आहेत. जागा नेमकी कॉँग्रेसला की राष्ट्रवादी काँग्रेसला सुटते? या संभ्रमात कार्यकर्ते आहेत. याउलट युतीचे एकमेव दावेदार उमेदवार भाजपाचे विद्यमान आमदार जयकुमार रावल असल्याने युतीत चिंता नसल्यागत वातावरण दिसते. 
आघाडीत तिकीट मिळण्यासाठी इच्छुकांची संख्या जास्त आहे. शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ हा कोणत्या काँग्रेसकडे जाणार हे निश्‍चित नसले तरी दोन्ही काँग्रेसकडून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यात माजी आमदार व राणे सर्मथक शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले रामकृष्ण पाटील यांचीही उमेदवारीसाठी चर्चा आहे. 
काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, रामकृष्ण पाटील, प्रमोद सिसोदे इच्छुक आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ही जागा काँग्रेस पक्षाला देण्यात आली होती. या जागेवर आता राष्ट्रवादी काँग्रेस हक्क सांगत आहे. त्यामुळे राजकीय वातावरणात रंग चढला आहे. 
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे संदीप बेडसे, ज्ञानेश्‍वर भामरे इच्छुक उमेदवार आहेत. माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांची साथ इच्छुकांना असल्याची चर्चा आहे. 
राष्ट्रवादी काँग्रेसकडे दोंडाईचा नगरपालिका व पंचायत समितीचे १८ पैकी ३ राष्ट्रवादी व २ अपक्ष, असे राष्ट्रवादीचे ५ सदस्य व काँग्रेसचे ३ सदस्य आहेत. त्यात राष्ट्रवादीचे संख्याबळ जास्त असल्याने जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच सुटेल, असे कार्यकर्त्यांत म्हटले जाते. काँग्रेसलाही चांगले मतदान झाल्याने दुर्लक्षित करून चालणार नाही, असे या पक्षाचे कार्यकर्ते म्हणतात. या दोन्ही काँग्रेसच्या रस्सीखेचमध्ये जागा कोणत्या काँग्रेसला सुटेल व कोणाच्या गळ्य़ात उमेदवारीची माळ पडेल हा मतदारसंघात उत्सुकतेचा भाग ठरत आहे. 
शिंदखेडा हा राजकीदृष्ट्या संवेदनशील विधानसभा मतदारसंघ मानला जातो. त्यात दोन पंचवार्षिक निवडणुकांपासून भाजपाने सरशी राखली आहे. भाजप विरुद्ध काँग्रेस, अशी लढत झाली असताना पुन्हा राष्ट्रवादी जागा खेचण्याच्या तयारीत असल्याने राजकीय हालचालींमध्ये रंगत भरली आहे. 
यात आघाडी झाल्यास उमेदवार कोण असेल, त्याला आपल्या व आघाडीतील साथीदार पक्षांची साथ राहील का? हा प्रश्न आता आणि निवडणुकी वेळीही चर्चेत राहणारच आहे.