शहरं
Join us  
Trending Stories
1
India Lifts First ODI World Cup Trophy: हरमनप्रीतसह संघातील खेळाडूंनी खास अंदाजात उंचावली ट्रॉफी (VIDEO)
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
4
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
5
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
6
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
8
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
9
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
10
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
11
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
12
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
13
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
14
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
15
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
16
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
17
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
18
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
19
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
20
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास

मुंबई-पुण्याने वाढविली जिल्ह्याची चिंता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सध्या जिल्ह्यातील कोरोनाचा वाढलेला संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे कठोर उपाययोजना करण्यात येत असून, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सध्या जिल्ह्यातील कोरोनाचा वाढलेला संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे कठोर उपाययोजना करण्यात येत असून, आता तीन दिवसांचा लॉकडाऊनही करण्यात आला; मात्र जिल्ह्यात बाहेरगावाहून येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याने, यातून कोरोनाचा संसर्ग कमी होण्याऐवजी वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे या बाहेरून येणाऱ्या नागरिकांमुळे जिल्हा प्रशासनाच्या उपाययोजनांवर पाणी फिरत असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या आठवड्यापासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. दररोज एक हजाराहून अधिक नागरिक कोरोना बाधित आढळून येत आहेत. यामध्ये सर्वाधिक रुग्ण जळगाव शहरातील आहेत. एकीकडे शहरात प्रशासनातर्फे कडक उपाययोजना व नागरिकांमध्ये ही मास्क, सोशल डिस्टन्सिंग पाळणे व वेळोवेळी हात निर्जंतुक करण्याचे आवाहन करीत जनजागृती करण्यात येत आहे; मात्र तरीदेखील शहरात व काही तालुक्यांमध्ये दिवसागणिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे या प्रकाराला बाहेरून येणाऱ्या नागरिकांचे कारण कारणीभूत ठरत असल्याचे बोलले जात आहे. रेल्वे व ट्रॅव्हल कंपन्यांतर्फे या प्रवाशांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तपासणी करण्यात येत असली तरी, ही तपासणी म्हणावी तशी खात्रीशीर होत नाही. त्यामुळे या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट पाहूनच गावाकडे येण्याची परवानगी दिली जावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

इन्फो

एकूण कोरोना रुग्ण

८६ हजार ६८८

बरे झालेले रुग्ण - ७३ हजार ६६५

सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण - ११ हजार ४२६

गृह विलगीकरणातील रुग्ण -

७ हजार ११२

एकूण बळी - १ हजार ५९७

इन्फो :

दररोज २ ते ३ हजार प्रवासी येतात

१) एस. टी. बस

जळगाव आगारासह जिल्हाभरातील आगारातून ८ ते १० बसेस पुण्याला जात आहेत. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांचा अल्प प्रतिसाद असला तरी, २०० ते २५० प्रवासी बसने पुण्याहून येत असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

२) ट्रॅव्हल्स

एस. टी. पेक्षा प्रवाशांची ट्रॅव्हल्सच्या प्रवासाला सर्वाधिक पसंती आहे. सध्या जिल्हाभरातून विविध कंपन्यांच्या पुणे व मुंबई या ठिकाणी २० ते २५ बसेस ये-जा करतात. त्यानुसार पुणे व मुंबई या ठिकाणाहून दररोज जिल्हाभरात ७०० ते ८०० प्रवासी येत असल्याचे सांगण्यात आले.

३) रेल्वे

सध्या कोरोनामुळे रेल्वे प्रशासनातर्फे मर्यादितच गाड्या सुरू असल्या तरी पुणे व मुंबई या ठिकाणी जाण्यासाठी दिवसभरात ८ ते १० गाड्या आहेत. एसटी व ट्रॅव्हल्सपेक्षा प्रवाशांची रेल्वेला पसंती असल्यामुळे दररोज रेल्वेने पुणे व मुंबई या ठिकाणाहून दोन ते अडीच हजार प्रवासी येत असल्याचे सांगण्यात आले.

इन्फो :

रेल्वे व ट्रॅव्हल्सने येणाऱ्यांची चाचणी; मात्र महामंडळातर्फे विना चाचणी प्रवास

- सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनातर्फे तिकीट आरक्षित असणाऱ्या प्रवाशांनाच प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे. स्टेशनवर तिकीट तपासणीवेळी प्रवाशांचे तापमानही तपासण्यात येत आहे. तसेच संबंधित स्टेशनावर उतरल्यावरही प्रवाशांचे तापमान मोजण्यात येत आहे.

- तसेच खासगी ट्रॅव्हल्सने मुंबई व पुण्याहून येणाऱ्या प्रवाशांचीही संबंधित ट्रॅव्हल्स कंपन्यांतर्फे बसमध्ये प्रवासी चढण्याअगोदर तापमान मोजण्यात येत आहे, तरच ट्रॅव्हल्समध्ये प्रवेश देण्यात येत आहे.

- अशा प्रकारे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे व ट्रॅव्हल्स कंपन्यांतर्फे प्रवाशांची तपासणी करण्यात येत असताना, एस.टी.महामंडळातर्फे कुठलीही तपासणी केली जात नसल्याचे सांगण्यात आले. सध्या जळगाव आगारातून पुण्यासाठी दररोज दोन बसेस व मुंबईसाठी एक बस जात आहे; मात्र बसमधून प्रवासी नेताना, ना उतरल्यावर प्रवाशांची कुठलीही चाचणी होत नसल्याचे सांगण्यात आले.